कुठे तरी काही दिवस तरी भटकंतीला जाऊ या असं कधी तरी कुणाला तरी वाटतंच. दुर्दैवाने, या वेळेलाही तसंच झालं! आम्ही दिल्याच्या ऑफिसात त्याच्या बायकोचा शिर्याचा प्रयोग चाखत होतो. आमचा एक मित्र, संदीप, अमेरिकेहून आला होता, त्याच्या बरोबर. इतर एनाराय मित्रांसारखीच त्याचीही, बायकोला चुकवून, आमच्या बरोबर टीपी करण्याची माफक अपेक्षा होती. परदेशातून आल्यावर एकदाचं बायका-पोरान्ना बायकोच्या माहेरी डंप केलं की बाजीरावांना रान मोकळं मिळतं. मग एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी बायको फारसं मनावर घेत नाही... किंबहुना तिलाही तेच हवं असतं. पण इथल्या सगळ्यांनी कामं टाकून त्यांच्यामागे धावावं असं या एनारायना का वाटतं? म्हणजे तसा एक काळ होता.. त्यांनी तिकडून आणलेल्या सिगरेटी आणि दारूत अवाजवी इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना वाजवी पेक्षा जास्त भाव दिला जायचा.. पण आता?
मक्या: 'ए हा संदीप सहलीचं एक प्रोजेक्ट करू या म्हणतोय!'.. कुठल्याही फालतू गोष्टीला 'प्रोजेक्ट' म्हणायची फ्याशनच झालीये हल्ली! आयटीत काम करून करून डोक्याची अशी मशागत होत असावी.. कटिंगला जाणे, एक प्रोजेक्ट! कोपर्यावरच्या दुकानातून दूध आणणे, अजून एक प्रोजेक्ट!
दिल्या: 'कुठं जायचं बोला? काश्मीर, सिमला, कोडाइकॅनाल, केरळ, उटी, कन्याकुमारी झालंच तर चतु:श्रुंगी?' दिल्यानं उडप्याच्या हॉटेलमधल्या वेटरच्या एकसुरी झपाट्यात मेन्यु सांगीतला.
संदीपः 'चतु:श्रुंगी?' चमचमीत मिष्टान्नांच्या पंक्तीत परिपाठादी काढ्याची अळी आल्यामुळे संदीपची गाडी हास्य दरीत कोसळली. आम्ही हा जोक खूप पूर्वीच 'सरताज' केला होता त्यामुळे आम्ही 'काय उगाच फालतू जोकला हसतो?' असे चेहरे केले.
दिल्या: 'हो. चतु:श्रुंगीला आमच्या अर्ध्या अर्ध्या दिवसाच्या खास बजेट टूर असतात.' दिल्याच्या तोंडून आता सराईत टूर ऑपरेटरची टुरटुर सुरू झाली.
संदीपः 'चतु:श्रुंगी चढून उतरल्यावर मग भेळ खाऊन परत यायचं का?'.. प्रत्येकाला टूरच्या पैशात फुकट काय काय आहे ते माहिती हवंच असतं.
दिल्या: 'भेळ खाणं ऑप्शनल आहे, तुमच्या बजेट प्रमाणे'.. कनवटीला डॉलर मिरविणार्या संदीपचा कचरा करण्याची संधी दिल्या कशी सोडणार?
संदीपः 'ट्रेकला जायचं का?... सिंहगड, तोरणा, राजगड, लोहगड'
'सर, एक सही हवी होती' मधेच दिल्याच्या ऑफिसातला एकजण सही घेऊन गेला.
मक्या: 'चिमण्या असेल तर ट्रेकला मी येणार नाही.'
संदीपः ('नाव चंद्रकला आणि अंगी पौर्णिमेचा घेर' अशा माझ्या नावाशी व्यस्त प्रमाण दाखविणार्या देहाला आपादमस्तक न्याहाळत) 'चिमण्या? तू ट्रेकला पण जातोस?'
मी: 'तसा मी बर्याच क्षेत्रात धडपडतो, पण कुठेच धड पडत नाही. पण ट्रेकला जायचं असेल तर मीच येणार नाही.'
संदीपः 'का रे बाबांनो?'
मी: 'कारण डोंगरावर रिक्षा मिळत नाहीत'.. डोंगर आणि रिक्षाचा संबंध लावता लावता संदीपच्या डोक्याची जिल्हा परिषद झाली.
दिल्या: 'ट्रेकला जाणं आणि भिकेचे डोहाळे लागणं यात काही फरक नाहीय्ये असं चिमणचं म्हणणं आहे!'
मी: 'अरे मागे आम्ही एका ट्रेकला गेलो होतो.. डोंगर चढून चढून माझी फासफूस झाली.. मला वाटत होतं तेवढा डोंगर चढून झाला की संपला ट्रेक.. नंतर कळालं की नुसता तेवढाच डोंगर नाही तर अजून तसे दोन डोंगर चढाय उतरायचे आहेत.. मग मात्र माझा धीर खचला.. मी भूक भूक सुरू केलं.. थोडं चरु या म्हंटलं.. मी डब्यातून गुलाबजाम, बाकरवड्या, पेढे बर्फ्या असं भरपूर आणलं होतं.. ते हाणल्यावर सगळे तिथेच आडवे झाले आणि ट्रेकचं पानिपत झालं. माझ्यामुळे ट्रेक बोंबलतो असा बिनबुडाचा आरोप हे लोक तेव्हापासून करतात.'
दिल्या: 'गपा रे! उगा शिरा ताणून ताणून बोलू नका!'
मी: 'नाही रे! मी शिरा खाऊन खाऊन बोलतोय!'
संदीपः 'बरोबर आहे. बरोबर आहे. नो ट्रेक. कुठे तरी निवांत पडायचंय. मस्त बियर ढोसायची. मनात आलं तर हिंडायचं नाही तर झोपायचं.. असं काही तरी पाहीजे.'
मक्या: 'अरे! मस्त सिमला कुलू मनाली असं कुठे तरी जाऊ या. तिथं हॉटेलात बसल्या बसल्या पण छान हिमालय दर्शन होतं. कुठं चढायची गरज नाही.'
मी: 'तिथपर्यंत जाऊन यायलाच ४ दिवस लागतील.'
संदीपः 'विमानाने जाऊन येऊ.'
मी: 'ए भाऊ! विजय मल्ल्या काही माझा सासरा नाही. आणि माझ्या सासर्याकडे खेळण्यातलं विमान पण नाही. त्यामुळे तू तिकीटं काढलीस तर मी फॅमिलीसकट येईन.' यावर सगळ्यांचं एकमत झाल्यामुळे विमान रद्द झालं.
दिल्या: 'बरं, मग कुठं जाऊ या?'
मी: 'तीन चार दिवसात कुठे जाऊन येणार? महाबळेश्वर?'
मक्या: 'नको. आमचा हनिमून तिथेच झाला.'
मी: 'तेव्हापासून तू त्याचा धसका घेतलाहेस काय?'
दिल्या: 'हां! त्या कटु आठवणींना धैर्याने, परत परत, सामोरा गेलास तरच तो आघात बोथट होईल.'
संदीपः 'मला पण महाबळेश्वर नको.'
मी: 'तुझा पण ह.मू. तिथेच झाला?'.. एक काळ होता जेव्हा सगळे महाबळेश्वरलाच हनिमूनला जायचे.
संदीपः 'हमू नाही रे. पण सारखं काय तिथंच जायचं?'
मी: 'अरे तुला तर नुस्तं ढेरी वर करून पडायचंय, वर बियर ढोसायचीय तर महाबळेश्वर काय नि गोठा काय, काय फरक पडतो?'
मक्या: 'आपण मुरुड जंजिराला जाऊ या का?'
दिल्या: 'चालेल. मी गाडी बुक करतो. किती सीटर करू या?'
मी: 'नको. गाडीचं तू नको बघू. तुझ्या गाड्या कधीही येत नाहीत'
दिल्या: 'काही नाही हां! नेहमी व्यवस्थित वेळेवर आलेल्या आहेत'.. दिल्यानं असं बोलणं म्हणजे जकात नाक्यावर व्यवस्थित पैसे खाणार्या बापाला 'तुम्हाला पैसे कमवायची अक्कल नाही' असं त्याच्याच चिरंजीवांनी ऐकविण्यातला प्रकार!
मी: 'हो का? मागे तू चांगली टेंपो ट्रॅव्हलर बुक केली होतीस. आणि आली एक जुनी पुराणी फाटकी मॅटेडोर, सिटं उसवलेली.. ती पण २ तास उशीरा! नुसत्या प्रवासालाच दुप्पट वेळ लागला आपल्याला, त्यापेक्षा घोडागाडीनं कमी वेळ लागला असता'
दिल्या: 'अरे होतं असं क्वचित कधी तरी'
मक्या: 'आणि ती दुसरी गाडी तू आणलेली? ती रस्त्यात दोन वेळा बंद पडली.. ती?.. त्यामुळे आपण 'रास्ता रोको' करतोय असं जाणार्या येणार्यांना वाटत होतं.. त्याचं काय?'
दिल्या: 'अरे गाडीला प्रॉब्लेम कधीही येऊ शकतो. एकदा तू सांगितलेली गाडी आली नाही म्हणून आपण आपल्या गाड्या घेऊन गेलो होतो. आठवतंय? तेव्हा तुझी पण गाडी बंद पडली होती की! आपण समजून घेतलं पाहीजे!'.. हा भुईनळा का त्या गाडिवाल्यांचा इतका कैवार घेतोय?
संदीपः 'डिझेलची गाडी नको. मला लागते'.
परत, सरांना 'सर'पण देणार्या ऑफिसातल्या माणसांपैकी एक, सरांची सही घेऊन गेला.
मक्या: 'मग रेल्वेने जाऊ या'
मी: 'पण बुकिंग तू करू नकोस. मागच्या दिवाळीत तू या वर्षीच्या दिवाळीच्या तारखांप्रमाणे बुकिंग केलं होतंस ते कुणाचंही कुटुंब विसरणार नाही. सगळा प्रवास मुंबईच्या लोकलच्या प्रवासासारखा वाटला होता. आठवतंय ना?'
मक्या: 'अरे तो एजंटाचा घोळ! मी काय करणार त्याला?'
मी: 'सांगितलं ना? बुकिंग तू करू नकोस.'
दिल्या: 'अरे पण मुरुड जंजिर्याला रेल्वे कुठे जाते? उगीच भांडू नका! आपण आपल्या गाड्या काढू!'
संदीपः 'गुड! पण एमटीडीसीच्या हॉटेलांमधे नको हां रहायला. कसली भिकार असतात!'.. हा संदीप म्हणजे एक 'वात'कुक्कुट आहे अगदी!
मक्या: 'बरं! मुरूडचं हॉलिडे इन मिळतंय का बघतो'
संदीपः 'अरे वा! तिथे हॉलिडे इन झालंय? मस्त!' बिच्यार्याला फिरक्या पण कळायच्या बंद झाल्यात!
दिल्या: 'हो! शिवाजी राजे जंजिर्याच्या इन्स्पेक्शनला आले की तिथेच रहायचे. त्यांच्या साठी तिथला महाराजा स्विट राखीव असायचा!'
मी: 'ए आरे, पावसाळ्यात कसले कोकणात जाताय? मी नक्कीच नाही येणार!'
संदीप: 'मुरूड नको? आयला एक साधी ट्रिप ठरवता येत नाही आपल्याला अजून?'
सगळेच थोडा वेळ शांत पडले. जांभया अनावर होत होत्या. शिर्यात काय घातलं होतं कुणास ठाऊक! अचानक मक्याच्या डोक्यात स्पार्क पडला.
मक्या: 'अरे नुस्तच पडायचंय, बियर ढोसायचीय तर पुण्यातल्याच एखाद्या हॉटेलात का नाही रहायचं?'
याला म्हणतात चाकोरी बाहेरचा विचार! आधी उगीचच विरोधासाठी विरोध केला तरी बाकीच्यांना पण तो पटलाच आणि आमची ट्रिप मुळशी जवळच्या एका रिसॉर्ट मधे सुफळ संपूर्ण झाली. ते व्हायचं एकमेव कारण म्हणजे ट्रिपला जाऊन नक्की काय करायचं हे सगळ्यांना क्लिअर होतं.. नो इफ्फस अँड बट्स!
वास्तविक, भटकंतीचा विषय निघाला की माझ्या अंगावरचे काटे बघून साळिंदरांना न्यूनगंड येतो. कारण नक्की कुठे जायचं, कधी जायचं, का जायचं, कोणी कोणी जायचं नि काय काय पहायचं हे सर्वानुमते ठरवायचं म्हणजे सत्राशे साठ सुयांच्या नेढ्यातून एकदम दोरा ओवण्याइतकं जटिल.. आणि ते जमलंच तर ती ट्रिप ठरवल्याप्रमाणे होणं म्हणजे सोन्याहून पिवळं, साखरेहून गोड, हिमालयाहून उत्तुंग वगैरे वगैरे! कारण, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा/कल्पना केवळ ग्रुपने जायचं म्हणून एका चौकटीत बसवता येत नाहीत. एखाद्या फॅमिलीची ठरलेल्या सर्व ठिकाणांना पसंती नसते, काहींना कमित कमी पैशात जास्तित जास्त बसवायचं असतं, काहींना ठरवलेली हॉटेलंच आवडत नाहीत, काही लोक इतर जनता वेळेवर तयार होत नाही म्हणून स्वतः मुद्दाम आणखी उशीर करतात.. अशी एक ना अनेक लक्तरं निघायला लागतात.. ट्रिप नंतर हळूच अमुक अमुक असतील तर आम्ही पुढच्या वेळेला येणार नाही अशा सूचना वजा धमक्या ऐकाव्या लागतात! म्हणून, 'काँप्रमाईझ मोड' मधली ट्रिप यशस्वी होत नाही.
एकूण काय? तर ट्रिपचा विषय निघाला की माझा मेंदू ट्रिप होतो आणि भटकंतीची होते भरकटंती!!
-- समाप्त --
मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्हाट! आता फक्त माझ्याशीच का? कारण सोप्प आहे. फारसं कुणी माझी भंकस ऐकून घ्यायला तयार नसतं.
Sunday, June 26, 2011
Wednesday, April 13, 2011
स्मोकिंग किल्स
जेम्स बाँडला जसं 'लायसन्स टू किल' असतं तसं आम्हाला गणपती उत्सवात 'लायसन्स टू चिल' मिळायचं. मिळायचं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. आम्ही तो आमचा जन्मसिद्ध हक्क समजायचो.. पाली जशा कुणाच्याही घरातल्या भिंतीं आपल्याच बापाच्या समजतात तसा! रात्री ११ पर्यंत घरी येण्याची घातलेली मर्यादा पहिल्या दिवशी १२, दुसर्या दिवशी १ अशी विसर्जनापर्यंत हळूहळू दुसर्या दिवशीच्या सकाळ पर्यंत रबरबँड सारखी कशी ताणायची हे पोरं आपोआप शिकतात. तेव्हा आम्ही पौगंडावस्थेतले, म्हणजेच पर्मनंट गंडलेले होतो! गणपतीच्या नावाखाली आम्ही काय काय बघायचो आणि कुठे कुठे फिरायचो हे जर आई वडिलांना कळलं असतं तर आम्हाला आमचं घर पण गणपतीसारखं लांबूनच बघायला लागलं असतं!
अशाच एका उत्सवात माझी सिगरेटशी तोंडओळख झाली आणि त्याचं पर्यवसान तिची ओढ लागण्यात झालं! तेव्हा आम्ही उच्चभ्रू लोकांसारखं धूम्रपान करायचो नाही तर बिड्या फुकायचो किंवा मद्यपान करायच्या ऐवजी बेवडा मारायचो. आमचे मध्यमवर्गीय शब्द अगदी क्रूड असले तरी नेमके होते! त्या काळी फुकणार्यांकडे न फुकणारे आदराने बघायचे, हल्ली मी इथल्या शाळेत जाणार्या पोरापोरींकडे बघतो तसंच! त्यामुळे त्यांच्या समोर बिड्या पिताना उगीचच सैन्याची मानवंदना घेणार्या पंतप्रधानासारखं ग्रेट वाटायचं. बिड्या फुकण्यातून बेफिकीर वृत्ती, धाडसीपणा, आत्मविश्वास, बंडखोर प्रवृत्ती इ. इ. अधोरेखित होते असा आमचा एक गंड होता. तसं काही नसतं हे आत्ता कळतंय!
'पीनेवालोंको पीनेका बहाना चाहीए' हे बिडी पिणार्याला देखील १००% लागू पडतं.. कधी नुसता वेळ घालवायला, कधी एखादं काम संपवलं म्हणून उदार मनाने स्वतःलाच बक्षीस म्हणून, कधी वाट पहाता पहाता, कधी एकटेपणा मिटवायला, कधी गर्दीत एकटेपणा मिळवायला, कधी विचाराला चालना देण्यासाठी, कधी विचार मिटवण्यासाठी, कधी नुसती गंमत म्हणून, कधी केवळ दुसर्याला कंपनी म्हणून, कधी केवळ आराम करायचा म्हणून तर कधी काहीही कारण नाही म्हणून.. एक बिडी माराविशीच वाटते!
बिडी ही अनेक न्यूनगंडांची भुतं भस्मसात करणारी आमची एक ज्वलंत आणि प्रभावी मशाल होती. चार्ली चॅप्लिन कसा प्रत्येक गोची नंतर आपल्या मळक्या टायची गाठ ठीक करून, गबाळे कपडे झटकत, जणू काही झालंच नाही अशा आविर्भावाने पुढे जातो? तसं केल्यानं त्याची नाचक्की टळणार असते का? नाही! पण त्याला नुसता टाय ठीक केल्याने एक मानसिक आधार मिळतो.. आणि वाटतं की स्वतःची ढासळलेली प्रतिष्ठा सावरली आहे म्हणून! तसंच आम्ही पदोपदी ढासळणार्या प्रतिष्ठेला बिडीचा आधार द्यायचो. त्यामुळे, ती अशी एकमेव गोष्ट जी माझ्या आनंदात, दु:खात, मानहानीत, भांडणात, प्रेमभंगात, उपेक्षेत.. मनाच्या सर्व अवस्थेत.. सदैव तोंडात राहिली.
त्या काळी फुंकणार्यांचा छळ होत नसे. हल्ली सारखे ते अस्पृश्य नव्हते. उलट, त्यांना आपुलकीने वागविले जाई! विमानात मागे फुकायची खास सोय असायची, रेल्वेत, बस मधे किंवा हॉटेलात कुठेही ओढता यायची. इतकंच काय पण ऑफिसात काम करताना कामाच्या बरोबरीने बिडीची पण ओढाताण चालायची.
धूर तोचि सोडिता, वलय उमटले नवे
आज लागले सखि, व्यसन हे मला नवे
असं मैत्रिणीला बिनदिक्कतपणे सांगू शकणारे काही निधड्या छातीचे बाजीराव, होणार्या बायको पुढे मात्र पळपुटे बाजीराव व्हायचे! त्यामुळे, जर भावी बायको बरोबर असताना मित्रांची गाठ पडली तर त्यांची प्रचंड कुचंबणा व्हायची. त्यात ती 'शी! काय तुझे मित्र सिगरेटी फुंकतात!' असं म्हणाली तर तोंड दाबून बुक्क्यांची शिक्षा! ओबामाला प्रेसिडेंट व्हायची मुळीच खात्री वाटत नसणार. नाहीतर त्याने त्याच्या बायकोला प्रेसिडेंट झाल्यावर सिगरेट सोडेन असं वचनच दिलं नसतं!
बिडीने मानसिक बाजू संभाळली असली तरी आर्थिक बाजू मात्र कमकुवत केली होती. बरं, नुसत्या बिडीचा खर्च नव्हता, इतर अॅक्सेसरीजचा पण खर्च असायचा.. बिडी बरोबर चहा लागायचाच.. शिवाय नंतर वास मारायला पेपरमिंट सारखं काहीतरी! मग घरी खोटं बोलून पैसे लाटणे, तसे नाही मिळाले तर चक्क चोरणे किंवा बापाच्या बिड्या ढापणे हे नोकरी लागे पर्यंत तरी अपरिहार्यच होतं.
परंतु, जगाच्या पाठीवर निर्विघ्नपणे आणि उन्मुक्तपणे बिड्या ओढणार्यांच्या आनंदाने काही लोकांच्या पोटात मळमळायला लागलं.. 'सिगरेटमुळे कॅन्सर होतो' अशी हूल उठवून ती मळमळ बाहेर आली. त्या नंतर सर्वांनी हळूहळू फुंकणार्यांची गळचेपी सुरू केली. त्यांना वाळीत टाकण्यात येऊ लागलं. इथे ओढू नका, तिथे ओढू नका.. शक्यतो कुठेच ओढू नका म्हणून आमच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी चालू केली! तो पर्यंत स्त्री-मुक्तीचं वारं प्यायलेल्या काही बायका बिड्या प्यायला लागल्या होत्या. पण फुकणार्यांनी कधीच संघटित होऊन 'फुकण्यावर बंधनं आल्यामुळे आमच्या भावना दुखावतात' असं ओरडून जाळपोळ वगैरे केली नाही त्यामुळे गळचेपी काही टळली नाही! ऑफिसात, हॉटेलात, विमानात इ. सगळीकडे ओढायला बंदी आली.. कडाक्याच्या थंडीत सत्रांदा ऑफिस बाहेर येऊन फुकायला गेंड्याची कातडी लागते हो!
हॉटेलातल्या स्मोकिंग झोनमुळे फुंकणार्या बरोबर न फुंकणारा हॉटेलात गेला तर दोघांची कुचंबणा व्हायला लागली! विमानात फुकायची बंदी पचवायला मला तरी फार अवघड गेली. आपल्याकडे बघून ती एअर होस्टेस चुकून जीवघेणी हसलीच, तर आपल्याला उलट हसता पण येत नाही.. कारण, बाबागाडीसुद्धा प्रशस्त वाटेल अशा इकॉनॉमी सीटवर बारा बारा तास कोंबून बसल्यामुळे थोबाड पण वाकडं झालेलं असतं हो!
कुठल्याही हूलीचं काय असतं, की ती खूप वेळा ऐकल्यावर आपल्याला खरीच वाटायला लागते.. वानगी दाखल पूर्वीची वाय२केची हूल घ्या नाहीतर सध्याची जोरात चाललेली ग्लोबल वॉर्मींगची हूल घ्या! परिणामी, बिडी ओढताना माझं मन मला ओढू लागलं, अपराधी वाटायला लागलं. त्यात एका इकॉनॉमिस्ट मित्राने, वेडीवाकडी गणितं मांडून, मी जर कधी सिगरेट ओढलीच नसती तर पुण्यात माझे किमान दोन फ्लॅट तरी झाले असते हे दाखवून दिलं. शिवाय, कॅन्सरमुळे पुढे होणार्या हॉस्पिटलच्या आणि उपचाराच्या आकड्यांनी त्याने माझे डोळे पांढरे केले. डॉक्टर मित्र 'सिगरेट तुझा जीव घेणार' असं बजावू लागले. मग मात्र सिगरेट सोडायला पाहीजे असं तीव्रतेने वाटायला लागलं.
प्रत्यक्षात तसं करणं किती कठीण आहे हे फुकणार्यालाच माहीती! बिडीच्या तलफेचा बीमोड करणं हे काडीमोड घेण्यापेक्षा अवघड आहे. काही जणांनी बिड्यांची तल्लफ मारण्यासाठी मावा किंवा खूप काय काय नंबरं असलेली पानं खाऊन पाहिली. काही दिवस जमलं ते! पण नंतर बिडी आणि पान या दोन्ही शिवाय त्यांचं पान हलेना! निकोटिनचा पॅच किंवा निकोटिन विरहित बिड्या असली उत्पादनं विकून काही कंपन्यांना चांगले पैसे सुटतात पण लोकांची बिडी काही सुटत नाही.. कंपन्यांनाही ती सुटायला नकोच असते म्हणा! काही दिवस सोडणं जमल्यावर आपल्या मनावर आता ताबा ठेवता येतो अशा भ्रामक समजूतीमुळे परत ओढणं चालू होतं. मला तरी, 'सिगरेट सोडणं सोप्प असतं. मी खूप वेळा सोडली आहे' या मार्क ट्वेनच्या उक्तीची भरपूर प्रचिती आली. पण धरसोड वृत्ती दाखवत शेवटी मी बिडीमुक्त झालो.
एके दिवशी, आनंदाने एका इकॉनॉमिस्ट मित्राला ही बातमी दिल्यावर त्यानं मला वेड्यात काढला. त्याच्या मते मी बिड्या फुकून देशाच्या इकॉनॉमीला हातभार लावत होतो. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर सिगरेट कंपन्या बंद पडतील, तिथले कामगार बेकार होतील, तंबाखूचे शेतकरी आत्महत्या करतील, सिगरेट पॅकेजिंग करणार्या कंपन्या गाळात जातील, सिगरेट मार्केटिंग बंद झाल्याचा परिणाम जाहिराती बनविणार्या कंपन्यांचा धंदा कमी होण्यात होईल, तंबाखू आणि सिगरेटींच्या वाहतूकदारांचा धंदा बसेल, कोपर्या कोपर्या वरच्या पानपट्ट्या आणि त्यांना सिगरेटी पुरविणारे वितरक देशोधडीला लागतील, कॅन्सरचं प्रमाण कमी झाल्यामुळे हॉस्पिटलांचा धंदा कमी होईल, त्यामुळे त्यांची डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर माणसांची गरज कमी होईल, त्याचा परिणाम शिक्षण संस्थांवर होईल. बिड्या फुकणार्यांमुळे सामान्य जनतेला टॅक्स कमी पडतो. कारण, 'धूम्रपान आरोग्याला हानीकारक आहे' या नावाखाली सरकार भरपूर टॅक्स लावून फुकणार्यांची पद्धतशीर वाटमारी करतं. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर कोट्यवधी रुपयांचं हे उत्पन्न बंद होईल आणि ते पैसे सरकारला सामान्य जनते वरचा टॅक्स वाढवून वसूल करण्या शिवाय काय पर्याय राहील बरं?.. माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून तो नष्ट झाला.
आयला, बिडी जाळल्यामुळे इतक्या लोकांच्या पोटाची आग विझत असेल? गंभीर समस्या आहे ही! यावर नीटच विचार करायला पाहीजे.. आपोआप पावलं जवळच्या पानपट्टी पाशी थांबली.. एक मोठ्ठा झुरका घेऊन खोsल सुस्कारा सोडल्यावर पहिलं काय रजिस्टर झालं असेल तर..
स्मोकिंग किल्स! अँड येस, नॉट स्मोकिंग किल्स टू!
====== समाप्त ======
अशाच एका उत्सवात माझी सिगरेटशी तोंडओळख झाली आणि त्याचं पर्यवसान तिची ओढ लागण्यात झालं! तेव्हा आम्ही उच्चभ्रू लोकांसारखं धूम्रपान करायचो नाही तर बिड्या फुकायचो किंवा मद्यपान करायच्या ऐवजी बेवडा मारायचो. आमचे मध्यमवर्गीय शब्द अगदी क्रूड असले तरी नेमके होते! त्या काळी फुकणार्यांकडे न फुकणारे आदराने बघायचे, हल्ली मी इथल्या शाळेत जाणार्या पोरापोरींकडे बघतो तसंच! त्यामुळे त्यांच्या समोर बिड्या पिताना उगीचच सैन्याची मानवंदना घेणार्या पंतप्रधानासारखं ग्रेट वाटायचं. बिड्या फुकण्यातून बेफिकीर वृत्ती, धाडसीपणा, आत्मविश्वास, बंडखोर प्रवृत्ती इ. इ. अधोरेखित होते असा आमचा एक गंड होता. तसं काही नसतं हे आत्ता कळतंय!
'पीनेवालोंको पीनेका बहाना चाहीए' हे बिडी पिणार्याला देखील १००% लागू पडतं.. कधी नुसता वेळ घालवायला, कधी एखादं काम संपवलं म्हणून उदार मनाने स्वतःलाच बक्षीस म्हणून, कधी वाट पहाता पहाता, कधी एकटेपणा मिटवायला, कधी गर्दीत एकटेपणा मिळवायला, कधी विचाराला चालना देण्यासाठी, कधी विचार मिटवण्यासाठी, कधी नुसती गंमत म्हणून, कधी केवळ दुसर्याला कंपनी म्हणून, कधी केवळ आराम करायचा म्हणून तर कधी काहीही कारण नाही म्हणून.. एक बिडी माराविशीच वाटते!
बिडी ही अनेक न्यूनगंडांची भुतं भस्मसात करणारी आमची एक ज्वलंत आणि प्रभावी मशाल होती. चार्ली चॅप्लिन कसा प्रत्येक गोची नंतर आपल्या मळक्या टायची गाठ ठीक करून, गबाळे कपडे झटकत, जणू काही झालंच नाही अशा आविर्भावाने पुढे जातो? तसं केल्यानं त्याची नाचक्की टळणार असते का? नाही! पण त्याला नुसता टाय ठीक केल्याने एक मानसिक आधार मिळतो.. आणि वाटतं की स्वतःची ढासळलेली प्रतिष्ठा सावरली आहे म्हणून! तसंच आम्ही पदोपदी ढासळणार्या प्रतिष्ठेला बिडीचा आधार द्यायचो. त्यामुळे, ती अशी एकमेव गोष्ट जी माझ्या आनंदात, दु:खात, मानहानीत, भांडणात, प्रेमभंगात, उपेक्षेत.. मनाच्या सर्व अवस्थेत.. सदैव तोंडात राहिली.
त्या काळी फुंकणार्यांचा छळ होत नसे. हल्ली सारखे ते अस्पृश्य नव्हते. उलट, त्यांना आपुलकीने वागविले जाई! विमानात मागे फुकायची खास सोय असायची, रेल्वेत, बस मधे किंवा हॉटेलात कुठेही ओढता यायची. इतकंच काय पण ऑफिसात काम करताना कामाच्या बरोबरीने बिडीची पण ओढाताण चालायची.
धूर तोचि सोडिता, वलय उमटले नवे
आज लागले सखि, व्यसन हे मला नवे
असं मैत्रिणीला बिनदिक्कतपणे सांगू शकणारे काही निधड्या छातीचे बाजीराव, होणार्या बायको पुढे मात्र पळपुटे बाजीराव व्हायचे! त्यामुळे, जर भावी बायको बरोबर असताना मित्रांची गाठ पडली तर त्यांची प्रचंड कुचंबणा व्हायची. त्यात ती 'शी! काय तुझे मित्र सिगरेटी फुंकतात!' असं म्हणाली तर तोंड दाबून बुक्क्यांची शिक्षा! ओबामाला प्रेसिडेंट व्हायची मुळीच खात्री वाटत नसणार. नाहीतर त्याने त्याच्या बायकोला प्रेसिडेंट झाल्यावर सिगरेट सोडेन असं वचनच दिलं नसतं!
बिडीने मानसिक बाजू संभाळली असली तरी आर्थिक बाजू मात्र कमकुवत केली होती. बरं, नुसत्या बिडीचा खर्च नव्हता, इतर अॅक्सेसरीजचा पण खर्च असायचा.. बिडी बरोबर चहा लागायचाच.. शिवाय नंतर वास मारायला पेपरमिंट सारखं काहीतरी! मग घरी खोटं बोलून पैसे लाटणे, तसे नाही मिळाले तर चक्क चोरणे किंवा बापाच्या बिड्या ढापणे हे नोकरी लागे पर्यंत तरी अपरिहार्यच होतं.
परंतु, जगाच्या पाठीवर निर्विघ्नपणे आणि उन्मुक्तपणे बिड्या ओढणार्यांच्या आनंदाने काही लोकांच्या पोटात मळमळायला लागलं.. 'सिगरेटमुळे कॅन्सर होतो' अशी हूल उठवून ती मळमळ बाहेर आली. त्या नंतर सर्वांनी हळूहळू फुंकणार्यांची गळचेपी सुरू केली. त्यांना वाळीत टाकण्यात येऊ लागलं. इथे ओढू नका, तिथे ओढू नका.. शक्यतो कुठेच ओढू नका म्हणून आमच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी चालू केली! तो पर्यंत स्त्री-मुक्तीचं वारं प्यायलेल्या काही बायका बिड्या प्यायला लागल्या होत्या. पण फुकणार्यांनी कधीच संघटित होऊन 'फुकण्यावर बंधनं आल्यामुळे आमच्या भावना दुखावतात' असं ओरडून जाळपोळ वगैरे केली नाही त्यामुळे गळचेपी काही टळली नाही! ऑफिसात, हॉटेलात, विमानात इ. सगळीकडे ओढायला बंदी आली.. कडाक्याच्या थंडीत सत्रांदा ऑफिस बाहेर येऊन फुकायला गेंड्याची कातडी लागते हो!
हॉटेलातल्या स्मोकिंग झोनमुळे फुंकणार्या बरोबर न फुंकणारा हॉटेलात गेला तर दोघांची कुचंबणा व्हायला लागली! विमानात फुकायची बंदी पचवायला मला तरी फार अवघड गेली. आपल्याकडे बघून ती एअर होस्टेस चुकून जीवघेणी हसलीच, तर आपल्याला उलट हसता पण येत नाही.. कारण, बाबागाडीसुद्धा प्रशस्त वाटेल अशा इकॉनॉमी सीटवर बारा बारा तास कोंबून बसल्यामुळे थोबाड पण वाकडं झालेलं असतं हो!
कुठल्याही हूलीचं काय असतं, की ती खूप वेळा ऐकल्यावर आपल्याला खरीच वाटायला लागते.. वानगी दाखल पूर्वीची वाय२केची हूल घ्या नाहीतर सध्याची जोरात चाललेली ग्लोबल वॉर्मींगची हूल घ्या! परिणामी, बिडी ओढताना माझं मन मला ओढू लागलं, अपराधी वाटायला लागलं. त्यात एका इकॉनॉमिस्ट मित्राने, वेडीवाकडी गणितं मांडून, मी जर कधी सिगरेट ओढलीच नसती तर पुण्यात माझे किमान दोन फ्लॅट तरी झाले असते हे दाखवून दिलं. शिवाय, कॅन्सरमुळे पुढे होणार्या हॉस्पिटलच्या आणि उपचाराच्या आकड्यांनी त्याने माझे डोळे पांढरे केले. डॉक्टर मित्र 'सिगरेट तुझा जीव घेणार' असं बजावू लागले. मग मात्र सिगरेट सोडायला पाहीजे असं तीव्रतेने वाटायला लागलं.
प्रत्यक्षात तसं करणं किती कठीण आहे हे फुकणार्यालाच माहीती! बिडीच्या तलफेचा बीमोड करणं हे काडीमोड घेण्यापेक्षा अवघड आहे. काही जणांनी बिड्यांची तल्लफ मारण्यासाठी मावा किंवा खूप काय काय नंबरं असलेली पानं खाऊन पाहिली. काही दिवस जमलं ते! पण नंतर बिडी आणि पान या दोन्ही शिवाय त्यांचं पान हलेना! निकोटिनचा पॅच किंवा निकोटिन विरहित बिड्या असली उत्पादनं विकून काही कंपन्यांना चांगले पैसे सुटतात पण लोकांची बिडी काही सुटत नाही.. कंपन्यांनाही ती सुटायला नकोच असते म्हणा! काही दिवस सोडणं जमल्यावर आपल्या मनावर आता ताबा ठेवता येतो अशा भ्रामक समजूतीमुळे परत ओढणं चालू होतं. मला तरी, 'सिगरेट सोडणं सोप्प असतं. मी खूप वेळा सोडली आहे' या मार्क ट्वेनच्या उक्तीची भरपूर प्रचिती आली. पण धरसोड वृत्ती दाखवत शेवटी मी बिडीमुक्त झालो.
एके दिवशी, आनंदाने एका इकॉनॉमिस्ट मित्राला ही बातमी दिल्यावर त्यानं मला वेड्यात काढला. त्याच्या मते मी बिड्या फुकून देशाच्या इकॉनॉमीला हातभार लावत होतो. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर सिगरेट कंपन्या बंद पडतील, तिथले कामगार बेकार होतील, तंबाखूचे शेतकरी आत्महत्या करतील, सिगरेट पॅकेजिंग करणार्या कंपन्या गाळात जातील, सिगरेट मार्केटिंग बंद झाल्याचा परिणाम जाहिराती बनविणार्या कंपन्यांचा धंदा कमी होण्यात होईल, तंबाखू आणि सिगरेटींच्या वाहतूकदारांचा धंदा बसेल, कोपर्या कोपर्या वरच्या पानपट्ट्या आणि त्यांना सिगरेटी पुरविणारे वितरक देशोधडीला लागतील, कॅन्सरचं प्रमाण कमी झाल्यामुळे हॉस्पिटलांचा धंदा कमी होईल, त्यामुळे त्यांची डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर माणसांची गरज कमी होईल, त्याचा परिणाम शिक्षण संस्थांवर होईल. बिड्या फुकणार्यांमुळे सामान्य जनतेला टॅक्स कमी पडतो. कारण, 'धूम्रपान आरोग्याला हानीकारक आहे' या नावाखाली सरकार भरपूर टॅक्स लावून फुकणार्यांची पद्धतशीर वाटमारी करतं. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर कोट्यवधी रुपयांचं हे उत्पन्न बंद होईल आणि ते पैसे सरकारला सामान्य जनते वरचा टॅक्स वाढवून वसूल करण्या शिवाय काय पर्याय राहील बरं?.. माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून तो नष्ट झाला.
आयला, बिडी जाळल्यामुळे इतक्या लोकांच्या पोटाची आग विझत असेल? गंभीर समस्या आहे ही! यावर नीटच विचार करायला पाहीजे.. आपोआप पावलं जवळच्या पानपट्टी पाशी थांबली.. एक मोठ्ठा झुरका घेऊन खोsल सुस्कारा सोडल्यावर पहिलं काय रजिस्टर झालं असेल तर..
स्मोकिंग किल्स! अँड येस, नॉट स्मोकिंग किल्स टू!
====== समाप्त ======
Thursday, March 10, 2011
अभिनय.. एक खाणे
पूर्वी पुण्यातल्या रूपाली/वैशाली हॉटेलात तुरळक गर्दी असायची. कधीही गेलं तरी बसायला नक्की जागा मिळायची.. शिवाय एका कॉफीवर बराच वेळ शिळोप्याच्या गप्पा ठोकता यायच्या! काही नाही घेतलं तरी वेटर हाकलायला यायचे नाहीत.. त्या मागे बहुतेक हॉटेल अगदीच रिकाम रिकाम वाटू नये हा उद्देश असावा.. 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' छाप पाट्या पण नव्हत्या. वेटरांनाही आमच्याशी गप्पा मारायला वेळ असायचा. हल्ली आत घुसायला पण रांग असते. थोडा वेळ जरी काही न घेता कुणी बसलेलं दिसलं तरी वेटर लगेच येऊन नम्रपणे 'काय आणू?' विचारतात.. चाणाक्ष लोकांना ती 'टळा आता' ची गर्भित सूचना आहे हे लगेच समजतं!
त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमी प्रमाणे शीण घालवायला मी रूपालीत धडकलो. एका टेबलावर राम्या शून्यात नजर लावून नुसताच बसला होता. राम्या म्हणजे आमच्यातला सखाराम गटणे. रोज तो तिथे एकच कॉफी घेऊन तासन तास पुस्तकं वाचत बसायचा. पुस्तक बिन राम्या म्हणजे जल बिन मछली, नांगी बिन विंचू, आयाळा बिन सिंह, सोंडे बिन हत्ती.. नाही.. ओसामा बिन लादेन नाही!
'काय राम्या? आज पुस्तक नाही? असं कसं झालं? मुंग्यानी मेरु पर्वत तर गिळला नाही ना?'.. त्याला शून्यातून बाहेर काढायचा मी एक नौटंकी प्रयत्न केला. शेजारी घुटमळणार्या वेटरला, रघूला, काय सण्णक आली कुणास ठाऊक! 'आज जरा हे वाचा'.. असं म्हणून त्यानं एक मेन्यू कार्ड राम्या समोर टाकलं. माझ्या घश्याच्या बाटलीतून शँपेन सारखं हसू उफाळलं.. इडली, डोसा व उत्तप्प्याच्या पलीकडे फारशी शब्द संपत्ती नसलेल्या माणसाकडून असा मस्त विनोद म्हणजे पोपटाच्या तोंडून पुलं ऐकण्यासारखं हो! खूष होऊन टाळी देताना त्याच्याकडे पाहीलं तर त्याला नवीनच चष्मा लागल्याचं दिसलं.
'आयला रघू! तुला चष्मा लागला? छान दिसतोय हं पण!'
'आता मला पण छान दिसतो'.. रघू त्याच्या नेहमीच्या उडपी ढंगाने बोलला.. त्याचा फॉर्म बघून त्याला ताबडतोब कॉफी आणायला पिटाळला.
दरम्यान, इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसल्यामुळे राम्यानं शून्यातून बाहेर यायच्या ऐवजी रुपालीतून बाहेर पडणे पसंत केले.. मीही कॉफी ढोसून बाहेर आलो तो दिल्या घाईघाईत येताना दिसला... माझ्याकडे बघून एकदम म्हणाला 'पर्फेक्ट!'.. या पूर्वी दिल्यानं माझ्याकडे बघून 'पर्फेक्ट!' म्हंटलं होतं तेव्हा माझ्या पलिकडे एक रेखाचं मोठ्ठं पोस्टर होतं. या खेपेला पानाची टपरी आणि आत कळकट पानवाला होता! आयला! याला या पानवाल्यात आरस्पानी सौंदर्य दिसतंय की काय? मी खलास!
'अरे, पानवाल्यात काय पर्फेक्ट? तुला काय तो साडी नेसून बसल्यासारखा दिसतोय?'
'अरे तू! तूच! हे अंगावरचे बिनइस्त्रीचे कपडे, खांद्याला शबनम, खोल गेलेले डोळे, अर्धवट दाढीचे खुंट वाढलेले! वा! एकदम पर्फेक्ट!'.. हा नक्की टिंगल करतोय की स्तुती? त्याच्या मनातलं काळबेरं समजून न घेता बोलणं हे ट्रॅम्पोलिनवर क्रिकेट खेळण्यासारखं झालं असतं म्हणून रक्षात्मक पवित्रा घेतला!
'चल आत! आपण कॉफी घेऊ म्हणजे उतरेल तुझी!'.. आत जाऊन रघूला ऑर्डर सोडली... 'हं! आता बोल!'
'अरे, इथे फर्ग्युसन कॉलेजात आज एका टिव्ही सिरीयलचं शूटिंग चाललंय. मी तिथून चाललो होतो. त्याचा डायरेक्टर माझ्या चांगल्याच ओळखीचा निघाला. त्याला एका पत्रकाराची आवश्यकता आहे. त्याच्या एका पात्राने टांग मारली वाटतं त्याला! मला म्हणाला एखादा पकडून आण! तू एकंदरीत या शबनम बॅगेमुळे फिट्ट बसशील त्यात!'.. चला, म्हणजे दिल्याला भलतच काहीतरी चढलं होतं तर! पण केवळ माझ्या शबनम पिशवी मुळे मी एका भूमिकेत फिट्ट बसणार? माझ्या अभिनय कौशल्यामुळे नाही? हे तर माझ्याकडे बॅट आहे म्हणून मला क्रिकेट खेळायला बोलावल्यासारखं झालं. आता माझ्याही इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसली. पण असं सरळ कसं म्हणणार?
'अरे! काहीही काय? उद्या तू मला भरतनाट्यम् करायला सांगशील!'
'नाही! भरतनाट्यम् मधे तू शोभणार नाहीस. एकतर तू असा खिडुक! नाचताना एक गिरकी मारलीस तर चमनचिडीसारखा हवेत उडून जाशील.'.. यॉर्कर टाकायला जावं आणि फुलटॉस पडावा तसं झालं मला!
'कोण डायरेक्टर?'
'सुहास देशपांडे!'... मनात विचार आला.. हा कोण सुहास देशपांडे? कधी नाव ऐकलेलं नाही. बहुतेक माझ्यासारखाच फर्स्ट टायमर दिसतोय. असल्या माणसाकडे काम करायचं? आपली काही लेव्हल आहे की नाही?
'हम्म्म! कधी नाव ऐकलं नाही रे हे! बरं, काय आहे कथानक?'
'मला माहीत नाही'
'कोण कोण आहेत?'.. संभाषण चालू रहावं म्हणून मी उगीचच काहीतरी पचकत होतो.. पोलिसानं पकडलं तर तो सरळ मला लाच द्या असं थोडंच म्हणतो.. कामाला कुठे? पगार किती मिळतो? असले मोडलेल्या नियमाशी दूरान्वयानेही संबंधित नसलेले प्रश्न तो विचारतो.. खरं तर, 'तुला अभिनय जमतो' या अर्थाचं काहीही तो एकदा जरी म्हणाला असता तरी मी भोपळ्यासारखा टुणुक टुणुक उड्या मारत गेलो असतो. पण लक्षात कोण घेतो?
'मोहन आगाशे, शेखर कपूर आणि काही सटरफटर! च्यायला, तू स्वत:ला अमिताभ वगैरे समजतोयस काय? लागला आपला... स्क्रिप्ट काय, हिरो कोण आहे, हिरॉईन कोण असले प्रश्न विचारायला! गप चल!'.. दिल्याला एक सुसंवाद म्हणून काही साधता येत नाही!
'पण असं कसं शूटिंगला जायचं? ते काय पिक्चरला जाण्याइतकं सोप्पं आहे काय?
मला नक्की काय करायचंय ते पण माहीत नाही. मला जमणार नाही ते! मी असं ऐनवेळेला कधी केलेलं नाही काम!'
'काय बोलतोस राव? तूच गेला होतास ना आपल्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत ऐनवेळेला!'.. अरे! हो की! मी ते साफ विसरलो होतो.. पण आत मधे कुठे तरी सुखावलो.. त्याला ते आठवलं म्हणून.
त्या स्पर्धेत आमच्या एकांकिकेच्या आधी दुसर्या एकाची एकांकिका होती.. जवळ जवळ एकपात्रीच होती.. युद्धकाळात एका जर्मन माणसाच्या आश्रयाला आलेल्या एका ज्यू वर काही तरी होतं.. त्यातला ज्यू 'तो' होता आणि जर्मन माणसाला एक किरकोळ प्रवेश होता.. तो जर्मन येऊन त्याला थोडा ब्रेड आणून देतो, काहीतरी डायलॉग मारतो आणि परत जातो, असा तो प्रवेश! त्याचं जर्मन पात्र ऐनवेळेला आलंच नाही.. त्यानं ते माझ्या गळ्यात घातलं.. काकुळतीला येऊन म्हणाला - 'या बुडत्याला तूच एक काडीचा आधार आहेस!'.. म्हणजे मी काडी! पण मी तयार झालो. मग थोडं फार जर्मन दिसण्यासाठी एकाचा शर्ट आणि दुसर्याचे बूट चढवले.. हो, कोल्हापूरी चप्पल घातलेला जर्मन बघितल्यावर बूट फेकून मारले असते लोकांनी!.. स्टेजवरून त्यानं खूण केल्यावर मी एंट्री घेतली.. तिथे अंधार होता.. मी खिशात हात घालून अंधारातून हळूहळू चालत असताना एक स्पॉटलाईट पण तेजाळत गेला.. आणि मी स्पष्ट होत गेलो.. माझी एंट्री लोकांना का आवडली कुणास ठाऊक!.. पण नुसता टाळ्यांचा कडकडाट झाला.. आता ब्रेड आणि डायलॉग टाकायचा की झालं.. पण ब्रेड कुठाय? मी घाईघाईत ब्रेडच न्यायचा विसरलो होतो.. तरी प्रसंगावधान राखून, खिशातून हात काढून ब्रेड द्यायची नुसती अॅक्शन केली आणि डायलॉग टाकला.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. माझ्या आवेशामु़ळे तो हडबडला आणि पुढचे डायलॉगच विसरला.. त्यानं ब्रेड खायच्या ऐवजी मीच त्याला खाल्ला असं लोक म्हणतात.
'कॉलेजात चालतं रे काहीही! टिव्हीवर कसं चालेल असं?'.. मी जरा जास्त गूळ लावून मिळतोय का ते बघत होतो.
'उलटं, काही चुकलं तर तिथं रिटेक घेता येतात.'
सगळे मुद्दे खोडल्यामुळे मी वरकरणी नाखुषीने त्या हॉलवर गेलो. खरच तिथं शूटिंग चाललेलं होतं. ती २ भागांची मालिका होती, पूर्ण हिंदीतून पण जास्त मराठी नट नट्या घेऊन! एका कोपर्यात खुद्द शेखर कपूर कुणाबरोबर तरी चकाट्या पिटत बसला होता. दुसरीकडे मोहन आगाशे आणि इतर एका शॉटच्या डायलॉगची प्रॅक्टीस करत बसले होते. त्यांच मराठी ढंगाचं हिंदी ऐकताना मला हसू फुटत होतं.. पण सगळेच गंभीरपणे घेत होते.. त्यांच्यात एकमेकांच्या समोर टिंगल करायची पद्धत नसल्यामुळे असेल!.. मग मी पण भिंतीला टांगलेल्या चित्रासारखा निश्चल झालो.
आगाशे आणि शेखर कपूर दोघेही एकेका कंपनीचे मालक असतात. आगाशेची कंपनी पैशाचं बळ वापरून घशात घालायचा शेखर कपूरचा प्लॅन असतो. शेअरहोल्डरच्या मिटिंगमधे आगाशेला बरेच जण छळतात त्यामुळे तो शेवटी फार चिडलेला आहे असं त्या शॉट मधे होतं. रिहर्सल संपून ४/५ टेक नंतर तो शॉट ओके झाला. शेवटी, डायरेक्टर आगाशेला म्हणाला 'डॉक्टरसाहेब, आपले डोळे दाखवा न जरा!'.. मग आगाशेच्या कमी जास्त चिडलेल्या डोळ्यांचे शॉट झाले.
या सगळ्या भानगडीत बराच वेळ चालला होता. रुपालीतून बाहेर पडून जवळ जवळ पाच एक तास होऊन गेले होते तरी माझ्या शॉटचा पत्ता नव्हता. बाहेर पडून घरी फोन करून येण्या इतका वेळ पण डायरेक्टर देत नव्हता. उशीराचं कारण 'शूटिंगला गेलो होतो' असं सांगितलं असतं तर बाबांनी मलाच शूट केला असता. प्रत्येक उभरत्या तार्याच्या नशिबी अवहेलना आणि टिंगल असल्यामुळे मी शांत राहीलो. शेवटी एकदाचा तो ऐतिहासिक शॉट आला... आज एक नवीन तारा उदयास येणार होता.
शॉट शेखर कपूरच्या पत्रकार परिषदेचा होता.. डायरेक्टरने बर्याच लोकांना पत्रकार पकडून आणायला सांगीतलं होतं असं लक्षात आलं. त्या परिषदेतले सर्वच पत्रकार माझ्यासारखेच उभरते कलाकार होते. शेखर कपूरच्या एका उत्तरा नंतर पत्रकार म्हणून मला फक्त एक डायलॉग टाकायचा होता.. 'आप क्या कुछ नहीं कर सकते, मेहतासाब?'
शॉट सुरू झाला.. सगळे नवशिके इकडे तिकडे बघत होते. डायरेक्टर ओरडला.. इकडे तिकडे बघू नका. शेखर कडे बघा, मधे मधे 'समजलं' अशा अर्थाने डोकं हलवून नोट्स लिहील्याचं अॅक्टिंग करा. दुसरा शॉट.. शेखर कपूरचं 'ते' उत्तर संपत आलं त्याच वेळेला एक स्पॉटलाईट माझ्या थोबाडाकडे वळू लागला.. मी देहभान विसरलो.. माझी तंद्री लागली.. मी हळूहळू चालत होतो.. थोड्याच वेळात प्रखर प्रकाशाने माझं सर्वांग उजळून निघालं आणि.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. काही समजायच्या आत हा डायलॉग पडला.. कसा कुणास ठाऊक! माझ्या आवेशाने या वेळेला शेखर कपूर हडबडला आणि डायलॉग विसरला. डायरेक्टरने जोरदार 'कट' 'कट' केली.. नंतर येऊन माझ्या डोळ्यात वेडाची झाक वगैरे दिसत नाही ना ते पाहून गेला. मी भयंकर ओशाळलो.. मला बघून मृत्यू पण ओशाळला असता. मला स्वतःची प्रचंड लाज वाटली आणि खूप दडपण आलं.
त्या दडपणाखाली, तिसरा शॉट मी शेखरला मेहतासाब म्हणायच्या ऐवजी कपूरसाब म्हणून घालवला. आणि चौथ्या शॉटमधे माझा डायलॉग भलत्याच ठिकाणी पॉझ घेऊन टाकला, असा.. 'आप क्या?'.. पॉझ.. 'कुछ नहीं कर सकते, मेहतासाब!'.. झालं.. त्या वेळेला तो डायरेक्टर 'कट' 'कट' ओरडायच्या ऐवजी माझ्याकडे बघून 'हल' 'कट' असं ओरडला हे मी शपथेवर सांगू शकतो. त्याच्या नशीबानं पाचवा शॉट ओके झाला आणि सगळ्यांनाच हायसं वाटलं.
१४ मार्चला माझा अद्वितीय अभिनय टीव्हीवर झळकणार असल्याचं तमाम आप्तेष्टांना आणि हितचिंतकांना कळवलं. तो दिवस आणि ती वेळ येईपर्यंत प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली होती. अखेर, टीव्हीवर ते प्रकरण झळकलं.. कधी नव्हे ते मन लावून पाहीलं.. पण माझा पार्ट त्यात आलाच नाही.. नंतर दिल्याकडून असं समजलं की मी शेखर कपूरला खाल्ला म्हणून एडिटरने मलाच खाल्ला. घनघोर निराशा!.. त्या नंतर मी परत कुठल्याही शूटिंग मधे भाग घ्यायचा नाही असा निश्चय केला. सुदैवाने कुणी विचारायला पण आलं नाही.. आणि तारा उगवायच्या आधीच त्याचा नि:पात झाला.
माझ्यामुळे उगीचच एक भिकार प्रोग्रॅम बघायला लागल्याबद्दल बर्याच जणांच्या शिव्या मी खाल्ल्या. पण काही हितचिंतकांनी 'आयला! काय काम केलंस लेका तू! मस्तच! केवळ ग्रेट! काय बेअरिंग संभाळलं होतस! खल्लास! तुझं भवितव्य उज्वल आहे' इ. इ. सांगून मात्र मलाच खाल्ला!
(टीप :- काही नाव खरी असली तरी सर्व प्रसंग बनावट आहेत. )
====== समाप्त ======
त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमी प्रमाणे शीण घालवायला मी रूपालीत धडकलो. एका टेबलावर राम्या शून्यात नजर लावून नुसताच बसला होता. राम्या म्हणजे आमच्यातला सखाराम गटणे. रोज तो तिथे एकच कॉफी घेऊन तासन तास पुस्तकं वाचत बसायचा. पुस्तक बिन राम्या म्हणजे जल बिन मछली, नांगी बिन विंचू, आयाळा बिन सिंह, सोंडे बिन हत्ती.. नाही.. ओसामा बिन लादेन नाही!
'काय राम्या? आज पुस्तक नाही? असं कसं झालं? मुंग्यानी मेरु पर्वत तर गिळला नाही ना?'.. त्याला शून्यातून बाहेर काढायचा मी एक नौटंकी प्रयत्न केला. शेजारी घुटमळणार्या वेटरला, रघूला, काय सण्णक आली कुणास ठाऊक! 'आज जरा हे वाचा'.. असं म्हणून त्यानं एक मेन्यू कार्ड राम्या समोर टाकलं. माझ्या घश्याच्या बाटलीतून शँपेन सारखं हसू उफाळलं.. इडली, डोसा व उत्तप्प्याच्या पलीकडे फारशी शब्द संपत्ती नसलेल्या माणसाकडून असा मस्त विनोद म्हणजे पोपटाच्या तोंडून पुलं ऐकण्यासारखं हो! खूष होऊन टाळी देताना त्याच्याकडे पाहीलं तर त्याला नवीनच चष्मा लागल्याचं दिसलं.
'आयला रघू! तुला चष्मा लागला? छान दिसतोय हं पण!'
'आता मला पण छान दिसतो'.. रघू त्याच्या नेहमीच्या उडपी ढंगाने बोलला.. त्याचा फॉर्म बघून त्याला ताबडतोब कॉफी आणायला पिटाळला.
दरम्यान, इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसल्यामुळे राम्यानं शून्यातून बाहेर यायच्या ऐवजी रुपालीतून बाहेर पडणे पसंत केले.. मीही कॉफी ढोसून बाहेर आलो तो दिल्या घाईघाईत येताना दिसला... माझ्याकडे बघून एकदम म्हणाला 'पर्फेक्ट!'.. या पूर्वी दिल्यानं माझ्याकडे बघून 'पर्फेक्ट!' म्हंटलं होतं तेव्हा माझ्या पलिकडे एक रेखाचं मोठ्ठं पोस्टर होतं. या खेपेला पानाची टपरी आणि आत कळकट पानवाला होता! आयला! याला या पानवाल्यात आरस्पानी सौंदर्य दिसतंय की काय? मी खलास!
'अरे, पानवाल्यात काय पर्फेक्ट? तुला काय तो साडी नेसून बसल्यासारखा दिसतोय?'
'अरे तू! तूच! हे अंगावरचे बिनइस्त्रीचे कपडे, खांद्याला शबनम, खोल गेलेले डोळे, अर्धवट दाढीचे खुंट वाढलेले! वा! एकदम पर्फेक्ट!'.. हा नक्की टिंगल करतोय की स्तुती? त्याच्या मनातलं काळबेरं समजून न घेता बोलणं हे ट्रॅम्पोलिनवर क्रिकेट खेळण्यासारखं झालं असतं म्हणून रक्षात्मक पवित्रा घेतला!
'चल आत! आपण कॉफी घेऊ म्हणजे उतरेल तुझी!'.. आत जाऊन रघूला ऑर्डर सोडली... 'हं! आता बोल!'
'अरे, इथे फर्ग्युसन कॉलेजात आज एका टिव्ही सिरीयलचं शूटिंग चाललंय. मी तिथून चाललो होतो. त्याचा डायरेक्टर माझ्या चांगल्याच ओळखीचा निघाला. त्याला एका पत्रकाराची आवश्यकता आहे. त्याच्या एका पात्राने टांग मारली वाटतं त्याला! मला म्हणाला एखादा पकडून आण! तू एकंदरीत या शबनम बॅगेमुळे फिट्ट बसशील त्यात!'.. चला, म्हणजे दिल्याला भलतच काहीतरी चढलं होतं तर! पण केवळ माझ्या शबनम पिशवी मुळे मी एका भूमिकेत फिट्ट बसणार? माझ्या अभिनय कौशल्यामुळे नाही? हे तर माझ्याकडे बॅट आहे म्हणून मला क्रिकेट खेळायला बोलावल्यासारखं झालं. आता माझ्याही इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसली. पण असं सरळ कसं म्हणणार?
'अरे! काहीही काय? उद्या तू मला भरतनाट्यम् करायला सांगशील!'
'नाही! भरतनाट्यम् मधे तू शोभणार नाहीस. एकतर तू असा खिडुक! नाचताना एक गिरकी मारलीस तर चमनचिडीसारखा हवेत उडून जाशील.'.. यॉर्कर टाकायला जावं आणि फुलटॉस पडावा तसं झालं मला!
'कोण डायरेक्टर?'
'सुहास देशपांडे!'... मनात विचार आला.. हा कोण सुहास देशपांडे? कधी नाव ऐकलेलं नाही. बहुतेक माझ्यासारखाच फर्स्ट टायमर दिसतोय. असल्या माणसाकडे काम करायचं? आपली काही लेव्हल आहे की नाही?
'हम्म्म! कधी नाव ऐकलं नाही रे हे! बरं, काय आहे कथानक?'
'मला माहीत नाही'
'कोण कोण आहेत?'.. संभाषण चालू रहावं म्हणून मी उगीचच काहीतरी पचकत होतो.. पोलिसानं पकडलं तर तो सरळ मला लाच द्या असं थोडंच म्हणतो.. कामाला कुठे? पगार किती मिळतो? असले मोडलेल्या नियमाशी दूरान्वयानेही संबंधित नसलेले प्रश्न तो विचारतो.. खरं तर, 'तुला अभिनय जमतो' या अर्थाचं काहीही तो एकदा जरी म्हणाला असता तरी मी भोपळ्यासारखा टुणुक टुणुक उड्या मारत गेलो असतो. पण लक्षात कोण घेतो?
'मोहन आगाशे, शेखर कपूर आणि काही सटरफटर! च्यायला, तू स्वत:ला अमिताभ वगैरे समजतोयस काय? लागला आपला... स्क्रिप्ट काय, हिरो कोण आहे, हिरॉईन कोण असले प्रश्न विचारायला! गप चल!'.. दिल्याला एक सुसंवाद म्हणून काही साधता येत नाही!
'पण असं कसं शूटिंगला जायचं? ते काय पिक्चरला जाण्याइतकं सोप्पं आहे काय?
मला नक्की काय करायचंय ते पण माहीत नाही. मला जमणार नाही ते! मी असं ऐनवेळेला कधी केलेलं नाही काम!'
'काय बोलतोस राव? तूच गेला होतास ना आपल्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत ऐनवेळेला!'.. अरे! हो की! मी ते साफ विसरलो होतो.. पण आत मधे कुठे तरी सुखावलो.. त्याला ते आठवलं म्हणून.
त्या स्पर्धेत आमच्या एकांकिकेच्या आधी दुसर्या एकाची एकांकिका होती.. जवळ जवळ एकपात्रीच होती.. युद्धकाळात एका जर्मन माणसाच्या आश्रयाला आलेल्या एका ज्यू वर काही तरी होतं.. त्यातला ज्यू 'तो' होता आणि जर्मन माणसाला एक किरकोळ प्रवेश होता.. तो जर्मन येऊन त्याला थोडा ब्रेड आणून देतो, काहीतरी डायलॉग मारतो आणि परत जातो, असा तो प्रवेश! त्याचं जर्मन पात्र ऐनवेळेला आलंच नाही.. त्यानं ते माझ्या गळ्यात घातलं.. काकुळतीला येऊन म्हणाला - 'या बुडत्याला तूच एक काडीचा आधार आहेस!'.. म्हणजे मी काडी! पण मी तयार झालो. मग थोडं फार जर्मन दिसण्यासाठी एकाचा शर्ट आणि दुसर्याचे बूट चढवले.. हो, कोल्हापूरी चप्पल घातलेला जर्मन बघितल्यावर बूट फेकून मारले असते लोकांनी!.. स्टेजवरून त्यानं खूण केल्यावर मी एंट्री घेतली.. तिथे अंधार होता.. मी खिशात हात घालून अंधारातून हळूहळू चालत असताना एक स्पॉटलाईट पण तेजाळत गेला.. आणि मी स्पष्ट होत गेलो.. माझी एंट्री लोकांना का आवडली कुणास ठाऊक!.. पण नुसता टाळ्यांचा कडकडाट झाला.. आता ब्रेड आणि डायलॉग टाकायचा की झालं.. पण ब्रेड कुठाय? मी घाईघाईत ब्रेडच न्यायचा विसरलो होतो.. तरी प्रसंगावधान राखून, खिशातून हात काढून ब्रेड द्यायची नुसती अॅक्शन केली आणि डायलॉग टाकला.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. माझ्या आवेशामु़ळे तो हडबडला आणि पुढचे डायलॉगच विसरला.. त्यानं ब्रेड खायच्या ऐवजी मीच त्याला खाल्ला असं लोक म्हणतात.
'कॉलेजात चालतं रे काहीही! टिव्हीवर कसं चालेल असं?'.. मी जरा जास्त गूळ लावून मिळतोय का ते बघत होतो.
'उलटं, काही चुकलं तर तिथं रिटेक घेता येतात.'
सगळे मुद्दे खोडल्यामुळे मी वरकरणी नाखुषीने त्या हॉलवर गेलो. खरच तिथं शूटिंग चाललेलं होतं. ती २ भागांची मालिका होती, पूर्ण हिंदीतून पण जास्त मराठी नट नट्या घेऊन! एका कोपर्यात खुद्द शेखर कपूर कुणाबरोबर तरी चकाट्या पिटत बसला होता. दुसरीकडे मोहन आगाशे आणि इतर एका शॉटच्या डायलॉगची प्रॅक्टीस करत बसले होते. त्यांच मराठी ढंगाचं हिंदी ऐकताना मला हसू फुटत होतं.. पण सगळेच गंभीरपणे घेत होते.. त्यांच्यात एकमेकांच्या समोर टिंगल करायची पद्धत नसल्यामुळे असेल!.. मग मी पण भिंतीला टांगलेल्या चित्रासारखा निश्चल झालो.
आगाशे आणि शेखर कपूर दोघेही एकेका कंपनीचे मालक असतात. आगाशेची कंपनी पैशाचं बळ वापरून घशात घालायचा शेखर कपूरचा प्लॅन असतो. शेअरहोल्डरच्या मिटिंगमधे आगाशेला बरेच जण छळतात त्यामुळे तो शेवटी फार चिडलेला आहे असं त्या शॉट मधे होतं. रिहर्सल संपून ४/५ टेक नंतर तो शॉट ओके झाला. शेवटी, डायरेक्टर आगाशेला म्हणाला 'डॉक्टरसाहेब, आपले डोळे दाखवा न जरा!'.. मग आगाशेच्या कमी जास्त चिडलेल्या डोळ्यांचे शॉट झाले.
या सगळ्या भानगडीत बराच वेळ चालला होता. रुपालीतून बाहेर पडून जवळ जवळ पाच एक तास होऊन गेले होते तरी माझ्या शॉटचा पत्ता नव्हता. बाहेर पडून घरी फोन करून येण्या इतका वेळ पण डायरेक्टर देत नव्हता. उशीराचं कारण 'शूटिंगला गेलो होतो' असं सांगितलं असतं तर बाबांनी मलाच शूट केला असता. प्रत्येक उभरत्या तार्याच्या नशिबी अवहेलना आणि टिंगल असल्यामुळे मी शांत राहीलो. शेवटी एकदाचा तो ऐतिहासिक शॉट आला... आज एक नवीन तारा उदयास येणार होता.
शॉट शेखर कपूरच्या पत्रकार परिषदेचा होता.. डायरेक्टरने बर्याच लोकांना पत्रकार पकडून आणायला सांगीतलं होतं असं लक्षात आलं. त्या परिषदेतले सर्वच पत्रकार माझ्यासारखेच उभरते कलाकार होते. शेखर कपूरच्या एका उत्तरा नंतर पत्रकार म्हणून मला फक्त एक डायलॉग टाकायचा होता.. 'आप क्या कुछ नहीं कर सकते, मेहतासाब?'
शॉट सुरू झाला.. सगळे नवशिके इकडे तिकडे बघत होते. डायरेक्टर ओरडला.. इकडे तिकडे बघू नका. शेखर कडे बघा, मधे मधे 'समजलं' अशा अर्थाने डोकं हलवून नोट्स लिहील्याचं अॅक्टिंग करा. दुसरा शॉट.. शेखर कपूरचं 'ते' उत्तर संपत आलं त्याच वेळेला एक स्पॉटलाईट माझ्या थोबाडाकडे वळू लागला.. मी देहभान विसरलो.. माझी तंद्री लागली.. मी हळूहळू चालत होतो.. थोड्याच वेळात प्रखर प्रकाशाने माझं सर्वांग उजळून निघालं आणि.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. काही समजायच्या आत हा डायलॉग पडला.. कसा कुणास ठाऊक! माझ्या आवेशाने या वेळेला शेखर कपूर हडबडला आणि डायलॉग विसरला. डायरेक्टरने जोरदार 'कट' 'कट' केली.. नंतर येऊन माझ्या डोळ्यात वेडाची झाक वगैरे दिसत नाही ना ते पाहून गेला. मी भयंकर ओशाळलो.. मला बघून मृत्यू पण ओशाळला असता. मला स्वतःची प्रचंड लाज वाटली आणि खूप दडपण आलं.
त्या दडपणाखाली, तिसरा शॉट मी शेखरला मेहतासाब म्हणायच्या ऐवजी कपूरसाब म्हणून घालवला. आणि चौथ्या शॉटमधे माझा डायलॉग भलत्याच ठिकाणी पॉझ घेऊन टाकला, असा.. 'आप क्या?'.. पॉझ.. 'कुछ नहीं कर सकते, मेहतासाब!'.. झालं.. त्या वेळेला तो डायरेक्टर 'कट' 'कट' ओरडायच्या ऐवजी माझ्याकडे बघून 'हल' 'कट' असं ओरडला हे मी शपथेवर सांगू शकतो. त्याच्या नशीबानं पाचवा शॉट ओके झाला आणि सगळ्यांनाच हायसं वाटलं.
१४ मार्चला माझा अद्वितीय अभिनय टीव्हीवर झळकणार असल्याचं तमाम आप्तेष्टांना आणि हितचिंतकांना कळवलं. तो दिवस आणि ती वेळ येईपर्यंत प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली होती. अखेर, टीव्हीवर ते प्रकरण झळकलं.. कधी नव्हे ते मन लावून पाहीलं.. पण माझा पार्ट त्यात आलाच नाही.. नंतर दिल्याकडून असं समजलं की मी शेखर कपूरला खाल्ला म्हणून एडिटरने मलाच खाल्ला. घनघोर निराशा!.. त्या नंतर मी परत कुठल्याही शूटिंग मधे भाग घ्यायचा नाही असा निश्चय केला. सुदैवाने कुणी विचारायला पण आलं नाही.. आणि तारा उगवायच्या आधीच त्याचा नि:पात झाला.
माझ्यामुळे उगीचच एक भिकार प्रोग्रॅम बघायला लागल्याबद्दल बर्याच जणांच्या शिव्या मी खाल्ल्या. पण काही हितचिंतकांनी 'आयला! काय काम केलंस लेका तू! मस्तच! केवळ ग्रेट! काय बेअरिंग संभाळलं होतस! खल्लास! तुझं भवितव्य उज्वल आहे' इ. इ. सांगून मात्र मलाच खाल्ला!
(टीप :- काही नाव खरी असली तरी सर्व प्रसंग बनावट आहेत. )
====== समाप्त ======
Monday, January 24, 2011
सरकार राज
सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता. संत महात्म्यांना कधी सरकारचा बडगा बघायला मिळाला नसावा नाही तर त्यांनी 'जन्म मरणाचे फेरे परवडले पण सरकारी हापिसाचे नको!' असा टाहो फोडला असता.
लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्नाआधी बर्यापैकी लवकर हजर झालो.. रजिस्टर्ड लग्नासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागते हे समजलं होतो म्हणून. आजुबाजुच्या परिसराची आणि त्या हापिसाची एकूण दैन्यावस्था पाहिल्यावर आम्हाला झोपडपट्टी निर्मूलन केंद्रापाशी आलो की काय असं वाटलं! सरकारी हापिसं अशा निवडक गलिच्छ आणि बकाल भागातच का असावीत बरे? बहुधा, तसा नियमच असावा.. कारण, त्यामुळे त्यांना कागदोपत्री लोकाभिमुख की काय ते व्हायला जमत असेल!
एकाच हापिसात मॅरेज रजिस्ट्रेशन आणि जमिनींचे व्यवहार यांची कामं होतात असं समजलं.. दोन्ही कामं करणारा कर्मचारी वर्गही एकच! मॅरेज सर्टिफिकेट ऐवजी मक्याला चुकून ७/१२ चा उतारा दिला तर काय करायचं ही शंका चाटून गेली मात्र! हापिसाच्या भिंती 'सख्या चला बागांमधी रंग खेळू चला' या गाण्याच्या शूटिंगसाठी वापरल्या सारख्या ठायी ठायी पानाच्या पिचकार्यांनी रंगलेल्या होत्या! हापिसात शिरल्यावर नजरेला प्रथम फक्त फायलींचे ढिगारेच ढिगारे दिसले. प्रकाश अंधुक होता कारण खिडक्यांसमोरही फायलीच.. अंधुक प्रकाशामुळे ट्युबा लावलेल्या.. सगळ्या धुळीने माखलेल्या.. त्यातल्या काही बंद तर काही कोंबडी सारख्या पक् पक् पकाक करणार्या.. सर्वदूर कोळ्यांची जाळी! एका कोपर्यात पाण्याचा माठ! वरती लयीत घ्रंs घ्रंs आवाज करणारे पण हवा न सोडणारे काळवंडलेले पंखे! फायलींनी अर्धी अधिक व्यापलेली कळकट टेबलं! खुर्च्यांवर मळकट उशा टाकलेल्या.. काही खुर्च्या डुगुडुगू नयेत म्हणून फायलींनीच लेव्हल केलेली.. बहुतेक फायली मळकट आणि तिथल्या कारकुंड्यांसारख्याच तट्ट फुगून कचर्याच्या डब्यासारख्या वाहणार्या!
अंधारात नीट निरीक्षण केल्यावर ढिगार्यांच्या मागे लपून बसलेले कारकून दिसले. सगळ्यांचेच चेहरे जवळचं कुणीतरी खपल्यासारखे सूतकी होते! 'एक टेबल झेलू बाई, दोन टेबलं झेलू' असा भोंडला खेळत शेवटी एका कारकूनापाशी उभे ठाकलो तेव्हा त्यांचा लंच टाईम झाला. आम्ही किती वेळेबरहुकूम काम करतो हे कर्मचारी दिवसातून फक्त दोनच वेळी दाखवतात.. एकदा लंच टाईमला आणि दुसर्यांदा हापिस सुटायच्या वेळेला! तासाभराने आम्ही परत उगवलो तेव्हा, कुत्रं जसं आपलीच शेपटी पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करून आपण किती बिझी आहोत असं भासवत असतं तसाच हा पण कार्यमग्न होता! काही वेळाने त्याला शेपटी शिवाय अजूनही काहीतरी काम आहे याची जाणीव झाली. त्याच्याशी झटापट केल्यावर समजलं की नोटीस द्यायचे फॉर्म संपले आहेत आणि ते एक आठवड्यांनी येणार आहेत.
दोन तीन आठवडे गेले तरी फॉर्म्सच दुर्भिक्ष संपेना.. या हापिसातले लोक दोन लग्नेच्छुक लोकांची ताटातूट करणारे व्हिलन अकस्मात होताहेत की काय अशी परिस्थिती व्हायला लागलेली!.. मग चाचरत चाचरत त्याला चहा प्यायचं गाजर दाखवलं.. तर पठ्ठ्या लगेच तयार झाला. चहा पिता पिता मी त्याच्या विविध अडचणीतून कामं करण्याच्या वृत्तीची उगाचच प्रशंसा केल्यावर गडी खुलला! मग त्याची 'मी किती थोर! मी कशी पटापट कामं उरकतो!' टाईप भंकस ऐकून घेताना आता तो दुर्लभ फॉर्म जादूने उपलब्ध होणार याची मला खात्रीच झाली! हळूच त्याला मक्याचं लग्न कसं जवळ आलं आहे याची अडचण सांगितली. त्यावर त्याने 'खरच फॉर्म संपले आहेत हो' असं सांगून आमच्या गनिमी काव्याचं शिरकाण केलं. फॉर्म विना मक्याचा आधुनिक रामदास कसा होणार आहे त्याचं सविस्तर वर्णन केल्यावर त्यानं आमची दया येऊन एक उपाय सुचवला! त्याच्या हापिसात एक फॉर्म फ्रेम करून ठेवला होता! का कुणास ठाऊक! कदाचित त्याला हौतात्म्य प्राप्त झालं असावं.. पण हार घातलेला दिसत नव्हता! त्यानं आम्हाला फॉर्म म्हणून त्या फ्रेमची झेरॉक्स वापरायला सांगितलं!
आनंदाने 'तो' फॉर्म घेरी नेऊन मक्याने भरला आणि आपली सही ठोकून मायाकडे सहीसाठी कुरीयर केला.. कारण ती दुसर्या गावची होती. ३/४ दिवसांनी सही झालेला फॉर्म घेऊन आम्ही परत त्याच हापिसात त्याच कारकुना समोर उभे राहीलो! फॉर्म बघितल्यावर तो खेकसला.. 'हे काय? इथे कोण सह्या करणार?'. नीट बघितलं तर फॉर्मच्या समासातल्या २/३ जागा तो दाखवत होता.. जिथे सह्या पाहीजेत असं फॉर्मवर कुठेही लिहीलेलं नव्हतं.. आणि कितीही रिडिंग बिट्विन द लाइन्स केलं असतं तरी कळालं नसतं! त्या ठिकाणी मक्याच्या आणि मायाच्या सह्या हव्या होत्या! परत कुरीयर आणि ३/४ दिवसांची निश्चिंती! हा मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसाचे जितके फेरे घालतोय तितके लग्नात घातले तर त्याला पुढच्या ७ जन्मात परत लग्नाला म्हणून उभं रहावं लागणार नाही असं मला वाटून गेलं!
एकदाचा तो सह्याबंबाळ फॉर्म त्या कारकुनाच्या पसंतीस उतरला आणि आम्हाला हुश्श होतंय न होतंय तोच त्यानं आम्हाला तो फॉर्म घेऊन त्याच्या साहेबाकडे जायला सांगितलं. साहेब म्हणजे लग्न नोंदणी आणि जमिन व्यवहार नोंदणीचा रजिस्ट्रार! त्याला भेटून लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं लग्न नोंदणीची कायदेशीर बाजू संभाळण्यासाठी! साहेबाच्या हापिसात साहेब टेबलावर आणि पुढच्या खुर्च्यांवर बरीच रिकामटेकडी मंडळी पारावर बसल्यासारखी गप्पा हाणीत बसलेली होती. साहेब फॉर्म हातात घेताच म्हणाला - 'हां! कुठं आहे जमीन?'. मक्या चांगलाच पिसाळला, पण करतो काय? रजिस्टर लग्न करून आपण कसे पुढारलेले आहोत हे दाखवायचं होतं ना! त्यानं तो लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे हे म्हंटल्यावर साहेब तो फॉर्म बघितल्यासारखा करून म्हणाला - 'आत्ताच त्या वेळेचं काही सांगता येत नाही.. अजून जवळपास सव्वा महिना आहे लग्नाला! तुम्ही मला रजिस्ट्रेशनला बोलावण्यासाठी एक अर्ज करा! आणि लग्नाच्या २ दिवस आधी या! तेव्हा मी सांगेन!". तेव्हा हा म्हसोबा काय सांगणार? जमणार नाही यायला म्हणून? या पेपर पुशर मंडळींना आपल्याला सतत प्रेशर कुकर मधे ठेवण्यात एक अलौकिक आनंद मिळतो.
मक्याला अर्ज लिहीण्यासाठी कागद हवा होता. कारकुनाकडे मागितला तर सरकारी हापिसात तो देण्याची प्रथा नाही असं ठणकावण्यात आलं. शेवटी झेरॉक्सच्या दुकानातून विकत आणला. वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा याची जिवंत उदाहरणं म्हणजे हे कारकून! त्यांच्या अंगातली एक कळ आहे ती कुठल्याही कामाला ना! ना! करण्याची.. मात्र ती आपल्याला नाना कळा देऊन जाते! घाईघाईने अर्ज खरडून साहेबाच्या हातात कोंबला.. तो वाचून तो हसत म्हणाला - 'भारी आहात तुम्ही! त्या दिवशीच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊ असं पण लिहा त्यात!'. आहे की नाही मजा? आता लग्नाला बोलावल्यावर त्याला जेवायला पण घालणारच ना? पण त्याचा जीव जाण्या-येण्याच्या खर्चात अडकला होता! ती ओळ टाकून त्याला फॉर्म देताना मक्यानं धाडस करून त्याला विचारलं की दोन दिवस आधी भेटल्यावर तो काय गुपित सांगणार आहे ते! त्यावर तो म्हणाला की मला तेव्हा तुम्हाला सांगता येईल मला कुठून पिकप करायचं ते!
शेवटी, लग्नाच्या दोन दिवस अगोदरची एक फेरी आणि लग्नानंतरच्या सर्टिफिकेट घेण्यासाठीच्या ३ फेर्या घातल्यावर आम्हाला मोक्ष मिळाला. लग्नाचं ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणून 'त्या' झेरॉक्स केलेल्या फॉर्मचीच झेरॉक्स मिळाली. त्या काळात असं वाटत होतं की राजा केळकर संग्रहालयातून एक तलवार चोरून आणावी आणि तिचं पाणी यांना पाजावं, म्हणजे त्यांच्या घोड्यांना आपण पाण्यात दिसायला लागू!
या अनुभवानंतर लगेचच मक्यानं एक सिद्धांत मांडला - सरकारी कामं पहिल्या फटक्यात होत नाही. करॉलरी, ज्यांचं काम पहिल्या फटक्यात होतं ते सरकारी ऑफिसातलं नसतं. लग्नानंतर थोड्याच दिवसात त्याला अजून एक सिद्धांत मांडण्याची वेळ आली-- नवरा बायकोच्या आवडी निवडी कधीही जुळत नाहीत. करॉलरी, ज्यांच्या आवडी निवडी जुळतात ते एकमेकांचे नवरा बायको नसतात.
====== समाप्त ======
लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्नाआधी बर्यापैकी लवकर हजर झालो.. रजिस्टर्ड लग्नासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागते हे समजलं होतो म्हणून. आजुबाजुच्या परिसराची आणि त्या हापिसाची एकूण दैन्यावस्था पाहिल्यावर आम्हाला झोपडपट्टी निर्मूलन केंद्रापाशी आलो की काय असं वाटलं! सरकारी हापिसं अशा निवडक गलिच्छ आणि बकाल भागातच का असावीत बरे? बहुधा, तसा नियमच असावा.. कारण, त्यामुळे त्यांना कागदोपत्री लोकाभिमुख की काय ते व्हायला जमत असेल!
एकाच हापिसात मॅरेज रजिस्ट्रेशन आणि जमिनींचे व्यवहार यांची कामं होतात असं समजलं.. दोन्ही कामं करणारा कर्मचारी वर्गही एकच! मॅरेज सर्टिफिकेट ऐवजी मक्याला चुकून ७/१२ चा उतारा दिला तर काय करायचं ही शंका चाटून गेली मात्र! हापिसाच्या भिंती 'सख्या चला बागांमधी रंग खेळू चला' या गाण्याच्या शूटिंगसाठी वापरल्या सारख्या ठायी ठायी पानाच्या पिचकार्यांनी रंगलेल्या होत्या! हापिसात शिरल्यावर नजरेला प्रथम फक्त फायलींचे ढिगारेच ढिगारे दिसले. प्रकाश अंधुक होता कारण खिडक्यांसमोरही फायलीच.. अंधुक प्रकाशामुळे ट्युबा लावलेल्या.. सगळ्या धुळीने माखलेल्या.. त्यातल्या काही बंद तर काही कोंबडी सारख्या पक् पक् पकाक करणार्या.. सर्वदूर कोळ्यांची जाळी! एका कोपर्यात पाण्याचा माठ! वरती लयीत घ्रंs घ्रंs आवाज करणारे पण हवा न सोडणारे काळवंडलेले पंखे! फायलींनी अर्धी अधिक व्यापलेली कळकट टेबलं! खुर्च्यांवर मळकट उशा टाकलेल्या.. काही खुर्च्या डुगुडुगू नयेत म्हणून फायलींनीच लेव्हल केलेली.. बहुतेक फायली मळकट आणि तिथल्या कारकुंड्यांसारख्याच तट्ट फुगून कचर्याच्या डब्यासारख्या वाहणार्या!
अंधारात नीट निरीक्षण केल्यावर ढिगार्यांच्या मागे लपून बसलेले कारकून दिसले. सगळ्यांचेच चेहरे जवळचं कुणीतरी खपल्यासारखे सूतकी होते! 'एक टेबल झेलू बाई, दोन टेबलं झेलू' असा भोंडला खेळत शेवटी एका कारकूनापाशी उभे ठाकलो तेव्हा त्यांचा लंच टाईम झाला. आम्ही किती वेळेबरहुकूम काम करतो हे कर्मचारी दिवसातून फक्त दोनच वेळी दाखवतात.. एकदा लंच टाईमला आणि दुसर्यांदा हापिस सुटायच्या वेळेला! तासाभराने आम्ही परत उगवलो तेव्हा, कुत्रं जसं आपलीच शेपटी पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करून आपण किती बिझी आहोत असं भासवत असतं तसाच हा पण कार्यमग्न होता! काही वेळाने त्याला शेपटी शिवाय अजूनही काहीतरी काम आहे याची जाणीव झाली. त्याच्याशी झटापट केल्यावर समजलं की नोटीस द्यायचे फॉर्म संपले आहेत आणि ते एक आठवड्यांनी येणार आहेत.
दोन तीन आठवडे गेले तरी फॉर्म्सच दुर्भिक्ष संपेना.. या हापिसातले लोक दोन लग्नेच्छुक लोकांची ताटातूट करणारे व्हिलन अकस्मात होताहेत की काय अशी परिस्थिती व्हायला लागलेली!.. मग चाचरत चाचरत त्याला चहा प्यायचं गाजर दाखवलं.. तर पठ्ठ्या लगेच तयार झाला. चहा पिता पिता मी त्याच्या विविध अडचणीतून कामं करण्याच्या वृत्तीची उगाचच प्रशंसा केल्यावर गडी खुलला! मग त्याची 'मी किती थोर! मी कशी पटापट कामं उरकतो!' टाईप भंकस ऐकून घेताना आता तो दुर्लभ फॉर्म जादूने उपलब्ध होणार याची मला खात्रीच झाली! हळूच त्याला मक्याचं लग्न कसं जवळ आलं आहे याची अडचण सांगितली. त्यावर त्याने 'खरच फॉर्म संपले आहेत हो' असं सांगून आमच्या गनिमी काव्याचं शिरकाण केलं. फॉर्म विना मक्याचा आधुनिक रामदास कसा होणार आहे त्याचं सविस्तर वर्णन केल्यावर त्यानं आमची दया येऊन एक उपाय सुचवला! त्याच्या हापिसात एक फॉर्म फ्रेम करून ठेवला होता! का कुणास ठाऊक! कदाचित त्याला हौतात्म्य प्राप्त झालं असावं.. पण हार घातलेला दिसत नव्हता! त्यानं आम्हाला फॉर्म म्हणून त्या फ्रेमची झेरॉक्स वापरायला सांगितलं!
आनंदाने 'तो' फॉर्म घेरी नेऊन मक्याने भरला आणि आपली सही ठोकून मायाकडे सहीसाठी कुरीयर केला.. कारण ती दुसर्या गावची होती. ३/४ दिवसांनी सही झालेला फॉर्म घेऊन आम्ही परत त्याच हापिसात त्याच कारकुना समोर उभे राहीलो! फॉर्म बघितल्यावर तो खेकसला.. 'हे काय? इथे कोण सह्या करणार?'. नीट बघितलं तर फॉर्मच्या समासातल्या २/३ जागा तो दाखवत होता.. जिथे सह्या पाहीजेत असं फॉर्मवर कुठेही लिहीलेलं नव्हतं.. आणि कितीही रिडिंग बिट्विन द लाइन्स केलं असतं तरी कळालं नसतं! त्या ठिकाणी मक्याच्या आणि मायाच्या सह्या हव्या होत्या! परत कुरीयर आणि ३/४ दिवसांची निश्चिंती! हा मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसाचे जितके फेरे घालतोय तितके लग्नात घातले तर त्याला पुढच्या ७ जन्मात परत लग्नाला म्हणून उभं रहावं लागणार नाही असं मला वाटून गेलं!
एकदाचा तो सह्याबंबाळ फॉर्म त्या कारकुनाच्या पसंतीस उतरला आणि आम्हाला हुश्श होतंय न होतंय तोच त्यानं आम्हाला तो फॉर्म घेऊन त्याच्या साहेबाकडे जायला सांगितलं. साहेब म्हणजे लग्न नोंदणी आणि जमिन व्यवहार नोंदणीचा रजिस्ट्रार! त्याला भेटून लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं लग्न नोंदणीची कायदेशीर बाजू संभाळण्यासाठी! साहेबाच्या हापिसात साहेब टेबलावर आणि पुढच्या खुर्च्यांवर बरीच रिकामटेकडी मंडळी पारावर बसल्यासारखी गप्पा हाणीत बसलेली होती. साहेब फॉर्म हातात घेताच म्हणाला - 'हां! कुठं आहे जमीन?'. मक्या चांगलाच पिसाळला, पण करतो काय? रजिस्टर लग्न करून आपण कसे पुढारलेले आहोत हे दाखवायचं होतं ना! त्यानं तो लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे हे म्हंटल्यावर साहेब तो फॉर्म बघितल्यासारखा करून म्हणाला - 'आत्ताच त्या वेळेचं काही सांगता येत नाही.. अजून जवळपास सव्वा महिना आहे लग्नाला! तुम्ही मला रजिस्ट्रेशनला बोलावण्यासाठी एक अर्ज करा! आणि लग्नाच्या २ दिवस आधी या! तेव्हा मी सांगेन!". तेव्हा हा म्हसोबा काय सांगणार? जमणार नाही यायला म्हणून? या पेपर पुशर मंडळींना आपल्याला सतत प्रेशर कुकर मधे ठेवण्यात एक अलौकिक आनंद मिळतो.
मक्याला अर्ज लिहीण्यासाठी कागद हवा होता. कारकुनाकडे मागितला तर सरकारी हापिसात तो देण्याची प्रथा नाही असं ठणकावण्यात आलं. शेवटी झेरॉक्सच्या दुकानातून विकत आणला. वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा याची जिवंत उदाहरणं म्हणजे हे कारकून! त्यांच्या अंगातली एक कळ आहे ती कुठल्याही कामाला ना! ना! करण्याची.. मात्र ती आपल्याला नाना कळा देऊन जाते! घाईघाईने अर्ज खरडून साहेबाच्या हातात कोंबला.. तो वाचून तो हसत म्हणाला - 'भारी आहात तुम्ही! त्या दिवशीच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊ असं पण लिहा त्यात!'. आहे की नाही मजा? आता लग्नाला बोलावल्यावर त्याला जेवायला पण घालणारच ना? पण त्याचा जीव जाण्या-येण्याच्या खर्चात अडकला होता! ती ओळ टाकून त्याला फॉर्म देताना मक्यानं धाडस करून त्याला विचारलं की दोन दिवस आधी भेटल्यावर तो काय गुपित सांगणार आहे ते! त्यावर तो म्हणाला की मला तेव्हा तुम्हाला सांगता येईल मला कुठून पिकप करायचं ते!
शेवटी, लग्नाच्या दोन दिवस अगोदरची एक फेरी आणि लग्नानंतरच्या सर्टिफिकेट घेण्यासाठीच्या ३ फेर्या घातल्यावर आम्हाला मोक्ष मिळाला. लग्नाचं ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणून 'त्या' झेरॉक्स केलेल्या फॉर्मचीच झेरॉक्स मिळाली. त्या काळात असं वाटत होतं की राजा केळकर संग्रहालयातून एक तलवार चोरून आणावी आणि तिचं पाणी यांना पाजावं, म्हणजे त्यांच्या घोड्यांना आपण पाण्यात दिसायला लागू!
या अनुभवानंतर लगेचच मक्यानं एक सिद्धांत मांडला - सरकारी कामं पहिल्या फटक्यात होत नाही. करॉलरी, ज्यांचं काम पहिल्या फटक्यात होतं ते सरकारी ऑफिसातलं नसतं. लग्नानंतर थोड्याच दिवसात त्याला अजून एक सिद्धांत मांडण्याची वेळ आली-- नवरा बायकोच्या आवडी निवडी कधीही जुळत नाहीत. करॉलरी, ज्यांच्या आवडी निवडी जुळतात ते एकमेकांचे नवरा बायको नसतात.
====== समाप्त ======
Wednesday, December 15, 2010
पेशाचे भोग
'कंप्युटर विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो' असं मास्तरने सांगितल्यावर एका नवशिक्याने, निरागसपणे, 'पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन किती वाजता सुटते?' असा सोप्पा प्रश्न कंप्युटरला टाकला. त्यावर कंप्युटरने एरर! एरर! असा, दाराच्या फटीत शेपटी चिणल्यासारखा, जीवघेणा आक्रोश केल्यावर तो नवशिक्या त्याच्या विरुद्ध फतवा निघाल्यासारखा टरकला. त्यावर त्या मास्तरने, 'कंप्युटर मधे आपणच आधी माहिती भरायची असते, मग कंप्युटर तीच माहिती आपल्याला परत देतो' अशी सारवासारवी केली. कसली सॉलीड गेम टाकली की नाही? जी माहिती आपल्याला आधी पासूनच आहे ती प्रथम कंप्युटर मधे भरायची, नंतर तीच, प्रश्न विचारून काढून घ्यायची?
कितीही चमत्कारिक वाटली तरी आवळा देऊन आवळाच काढायची कला मला जमलीच! कारण पूर्वी कॉलेजमधे प्रॅक्टिकल्स न करता फक्त बरोब्बर उत्तरं देणारीच ऑब्झर्व्हेशन्स जर्नल मधे लिहायची चालुगिरी! त्यानंतर मात्र माझं घोडं अल्गोरिदम नामक दलदलीत जे फसलंय ते अजून पर्यंत!
कंप्युटर नवसाला पावावा म्हणून अल्गोरिदम नामक र्हिदम कोणत्याही ड्रमवर वाजवला जात नाही.. हे सुरवातीलाच मुद्दाम सांगतोय, नंतर तक्रार चालणार नाही! तर, अल्गोरिदम म्हणजे एखादी कृती कशी करायची याबद्दल कंप्युटरला दिलेल्या सविस्तर सूचना! आपल्या मते त्या कितीही सविस्तर आणि बिनचूक असल्या तरी कंप्युटर एखाद्या मोलकरणी प्रमाणे घालायचा तो घोळ घालतोच! कुणाला नुसती रेसिपी वाचून पहील्या फटक्यात उत्तम पदार्थ करायला जमलंय का कधी? तसंच!
अल्गोरिदमची भानगड कळण्यासाठी असं समजा की कंप्युटर एका फूटपाथवर आहे आणि त्याला पायी रस्ता कसा क्रॉस करायचा आहे. तर काय काय सूचना द्याल? थोडं सामान्यज्ञान वापरलं तर प्रथम झेब्रा क्रॉसिंग शोधायला सांगता येईल, नंतर आधी उजवीकडे मग डावीकडे गाडी नाही ना याची खात्री करून मग रस्ता क्रॉस करायला सांगता येईल. प्रथम दर्शनी या सूचना पुरेशा वाटतात पण या सूचना देऊन कंप्युटरला समजा टिळक रोडच्या फूटपाथवर उभा केला तर त्याला गंज चढेल पण तो रस्ता क्रॉस करू शकण्याची खात्री नाही. का? कारण पहिलीच सूचना! झेब्रा क्रॉसिंग शोधा! पुण्यात ते सापडण्यासाठी अस्तित्वात असलं पाहीजे ना? असलंच तर दिसलं पाहीजे. पुण्यामधे सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नाही उभी केली तर आपल्याला पुढे जाऊच देणार नाहीत असं समजतात.
समजा, क्रॉसिंग दिसलं तरी पुढे लफडा आहेच! उजवीकडे बघितल्यावर एखादी पार्क केलेली गाडी दिसली तर कंप्युटर 'युगे अठ्ठावीस फुटपाथ वरी उभा' राहील. त्यासाठी ती सूचना 'स्वतःच्या दिशेने येणारी गाडी दिसली तर ती जाई पर्यंत उभे रहा' अशी बदलायला पाहीजे. हा अल्गोरिदम घालून कंप्युटरला अमेरिकेत रस्ता क्रॉस करायला लावला तर तो कदाचित पलिकडच्या फूटपाथ ऐवजी स्वर्गात सापडेल कारण तिकडे गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवतात. त्यामुळे तिकडे आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे बघायला लागेल. अशा प्रकारे, प्रत्येक सूचना कुठे आणि कधी चालेल याचा कंटाळा येई पर्यंत उहापोह करून अल्गोरिदम लिहीला तरच डोक्याचा भावी ताप कमी होतो. हुश्श!
हे सगळं मी तुम्हाला माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून सांगत नाहीये.. वेल! म्हणजे, ते अगदीच खोटं नाहीये.. म्हंटलं तर झालाय, म्हंटलं तर नाही! त्याचं काय आहे, कंप्युटरला अल्गोरिदम भरवायचं माझं रोजचंच काम आहे. म्हणूनच प्रत्येक सूचनेला काय काय विघ्न येतील याचाच येता जाता विचार माझ्या डोक्यात सतत चालतो. ती कशी आणि कुठे झोपेल हे सारखं बघायचं.. असंभाव्य किंवा अतर्क्य गोष्टी घडतील असं गृहीत धरून!
त्या सवयीचा इतका गुलाम झालोय मी की साध्या साध्या कामांमधे देखील कीस काढतो अगदी! बायकोने नुसतं पोराला शाळेत सोडायला सांगितलं तरी माझ्या डोक्यात असंख्य विचारभुंगे भुणभुणायला लागतात.. ट्रॅफिक किती असेल?.. दुसरा रस्ता आहे का जायला?.. वेळेवर पोचणार का?.. पोरगा तयार होणार का लवकर?.. स्कूटर न्यावी की कार?.. पेट्रोल आहे का?.. पेट्रोल भरायची वेळ आली तर वेळ गाठणार का?.. पाऊस आला तर?.. वेळेवर पोचलो नाही तर काय करायचं?.. मला ऑफिसला पोचायला किती उशीर होईल?.. ऑफिसात आज काय करायचंय सकाळी?.. तंद्रीमधे पोराला ऑफिसलाच घेऊन गेलो तर?
असो. साधारण कल्पना आली ना तुम्हाला? इथंच ते प्रकरण थांबत नाही, तर त्या विचार भोवर्यात मी पूर्ण गुरफटतो. बायकोकडे तोंड अर्धवट उघडं टाकून पहात रहातो पण प्रत्यक्षात शून्यात पहात असतो. त्यामुळे पुढच्या सूचना न्युट्रिनो सारख्या कुठेही न अडखळता डोक्याच्या आरपार सरळ निघून जातात. त्या पुढच्या नाट्याचे यशस्वी प्रयोग घराघरातून सतत होत असतात त्यामुळे ते इथे सांगत बसत नाही.
मला वाटतं की हे पेशाचे भोग फक्त माझ्याच नशिबी असावेत. कारण, इतर लोकांना त्यांच्या पेशाचा घरगुती आयुष्यात उपद्रव झालेला मी तरी ऐकलेला नाही. उदा.. ट्रॅफिक पोलीस.. त्याच्या बायकोने जर 'स्वयंपाक करायला जाते' म्हणून घराच्या बाहेरचा रस्ता धरला तर तो जोरजोरात शिट्टी मारून तिला 'बाजूला' घेईल का? किंवा वीजमंडळातल्या कारकुनाच्या बायकोने त्याला विजेचं बिल भरायला सांगितलं तर तो तिला दुसर्या टेबलावर जा म्हणेल का? वाण्याला घरात कागदाचा तुकडा दिसला तर तो समोर दिसेल ती वस्तू त्यात गुंडाळून मोकळा होईल का? एखादा वकील, त्याला गावाहून परत येण्यास जास्त दिवस लागणार असतील तर असं पत्र बायकोला लिहीताना पाहीलं आहे का ?..
My Dear Shubha(Mrs. Shubha Vinayak Dange, Aged 34, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'Darling'.)
I, (Mr. Vinayak Shreedhar Dange, Aged 35, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'I'.), came to Delhi for official work on Monday the 28th of Oct. 2010, and whereas, the work was delayed because of the act of God, and whereas, I am not able to get train and plane tickets, and whereas, it is not clear when I can leave from here, I am not sure when I can be home.
______ (स्वाक्षरी)
(Mr. Vinayak Shreedhar Dange) Dated: 5 Nov 2010
Witness: _______ (Mr. Jayram Ramram Taliram, Aged 43, resident of 8502/41, Aarakshan road, Connaught place, New Delhi- 110092.)
Dated: 5 Nov 2010
कॉल सेंटर मधे काम करणार्या एखाद्या बाईला, घरी, तिच्या नवर्याचा फोन आला तर तिनं त्याला.. तुमची जन्मतारीख काय?.. तुमच्या आईचं लग्नापूर्वीच नाव काय?.. तुमचा पत्ता काय? इ. इ. प्रश्न विचारून हैराण केलेलं कुणी ऐकलं आहे काय? एखादा वेटर, घरी बायकोने खाण्यासंबंधी काहीही विचारलं तर 'इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, कांदा उत्तप्पा, टोमॅटो आमलेट....' अशी सरबत्ती करेल काय? शाळा मास्तराने घरी बायकोला अंगठे धरून उभं रहाण्याची शिक्षा दिल्याचं ऐकलं आहे काय? घराच्या दाराची घंटा वाजल्यावर बस ड्रायव्हरला कधी गिअर टाकण्याची हालचाल करताना पाहीलं आहे काय? गारुड्याला बायकोसमोर पुंगी वाजवताना पाहीलंत का? रिकाम्या न्हाव्याला उगीचच कात्रीचा चुकचुकाट करीत बसलेला पाहीलाय का कुणी?
नाही ना? तेच तर मी म्हणतोय की इतर लोकांचं जिणं त्यांच्या पेशाच्या प्रदूषणापासून मुक्त आहे. तुम्हाला एखादी केस माहिती असलीच तर ती मी एक्सेप्शन प्रुव्हस द रूल म्हणून सोडून देईन. तुमचे केस जातील पण माझ्या सारखी केस नाही मिळणार! मला कंप्युटरनं झपाटलंय! कंप्युटरचं प्रोग्रॅमिंग करता करता त्यानंच माझं डोकं फॉर्मॅट करून तिथं चक्क नवीन ओएस टाकली आहे. आता तर, कुठलीही काम करण्याआधी मी नुसतं काय बोंबलेल याचा विचार करून थांबत नाही तर त्या प्रसंगी मार्ग कसा काढता येईल त्याचंही चर्वितचर्वण करायला लागलोय! इतका सगळा सखोल विचार केला तरी ते काम बोंबलायचं थांबत नाहीच शेवटी! फरक इतकाच की बोंबलण्याचं कारण आधी विचार न केलेल्या पैकी असतं. तरीही विक्रमादित्याचा आदर्श ठेवून, तेच काम पुढच्या वेळेस करायच्या वेळेला बोंबलण्याच्या नवीन कारणाचाही समावेश करायला जातो. याचा परिणाम फक्त अख्ख्या फॅमिलीची डोकी तापवण्यात होतो.. आणि माझंही!
उदाहरणार्थ, मंडईतून भाजी आणण्याची साधी गोष्ट! आयुष्यात पहिल्यांदा मी भाजी आणायला निघालो तेव्हा तुफान डोकं चालवल्यावर मला आणायच्या भाज्यांची यादी करायचं सुचलं. ती यादी एखाद्या कवितेच्या रसग्रहणासारखी लांबलचक झाली. पण प्रत्येक भाजी किती किलो घ्यायची हे न लिहील्यामुळे संजीवनी न शोधू शकणार्या हताश हनुमानाप्रमाणे घरी द्रोणागिरी एवढ्या भाज्या आल्या. त्याचं वेगळं रामायण झालं आणि माझे गाल, मारुती प्रमाणे, पुढचे बरेच दिवस फुगलेले राहीले. पुढच्या वेळेस यादीत सगळं नीट लिहून घेऊन गेलो पण माठ नामक भाजी ऐवजी पाण्याचा माठ नेण्याचा माठपणा केला. कुणा लेकाला माहिती माठ हे भाजीचं पण नाव असतं ते?
पुढच्या वेळेस गेलो तेव्हा मी भाजीवाल्यासमोर आणि माठ कसा ओळखायचा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर एकदमच उभे ठाकले. भाजी विकण्याची गरज त्याला जास्त आहे त्यामुळे तो योग्य ती भाजी देण्याचं काम चोख करेल असं समजून निर्धास्तपणे मी त्याला माठ मागितला. पुष्कळशा टोपल्या आजुबाजूला पसरून बर्याच आत मध्यभागी तो कोळ्यासारखा बसलेला होता. उत्तरादाखल त्यानं फक्त एक टोपली माझ्याकडे फेकली. एका यकश्चित भाजीवाल्या समोर माठ नावाखाली मायाळू घेऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं नव्हतं मला! शिवाय, त्यानं भर मंडईत माझं शैक्षणिक वस्त्रहरण केलं असतं तर ते केव्हढ्याला गेलं असतं? मग माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी माठ सोडून तिथून ताठ मानेने सटकलो. पण घरी बायकोशी गाठ होती.. हो, लग्नापासून बांधलेली! तिच्या लाथाळ्या खाल्ल्या. पुरुष हा क्षणकालाचा पती आणि अनंत काळाचा फुटबॉल असतो, हे मूलभूत ज्ञान मला तेव्हा झालं! शाळा कॉलेजात आई बाप, मोठी भावंड, मास्तर, नातेवाईक.. तारुण्यात बॉस, बायको, पोरंबाळं.. म्हातारपणी पोरांच्या बायका इ. इ. सगळे पुरुषांवर यथेच्छ पाय धुवून घेतात. नाही म्हणायला फक्त शैशवातच काय ते थोडं फार कोडकौतुक होतं पुरुषांच! म्हणूनच प्रौढत्वी निज शैशवास जपायला सांगतात की काय न कळे!
कधी सांगितलेली भाजी मंडईत नसणे तर कधी अधपाव म्हणजे नेमके किती असा प्रश्न पडणे अशा नवनवीन समस्या उद्भवणं काही थांबत नाही आणि त्या वेळेला मख्खपणे काम जमत नाही हे पण सांगता येत नाही! घोर कुचंबणा! कंप्युटरचं माणसापेक्षा बरं असतं. कुठेही तो अडकला की एरर फेकून हात झटकून रिकामा होतो. आठवा, मायक्रोसॉफ्टचे 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' हे तीन अगम्य शब्द! ते स्क्रीनवर नाचले की एक्सप्रेस वे वरून भरधाव जाता जाता अचानक समोर मोठ्ठं विवर दिसल्यावर जसं फेफरं येईल तसं येतं. विचार करा, ओबामाची सुरक्षा व्यवस्था मायक्रोसॉफ्टकडे असताना त्याच्यावर हल्ला झाला तर ते 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' ही भीषण एरर देऊन त्यातून अंग काढू शकतील का? असा सुलभ ऑप्शन माणसांना नसतो.
तरीही मी विचार करायचा थांबत नाही. मला ते व्यसन लागलंय. हेच बघाना, एकाने मला याच वेडावर लेख लिहायला सांगितलं तर लगेच.. कादंबरी लिहावी की साधा लेख?.. लिखाण टाकताना मधेच सर्व्हर झोपला तर?.. लोकांना अश्लील वाटला तर?.. हा लेख दुसर्या कुठल्या लेखाची कॉपी वाटला तर?.. .. .. .. .. ..
====== समाप्त ======
कितीही चमत्कारिक वाटली तरी आवळा देऊन आवळाच काढायची कला मला जमलीच! कारण पूर्वी कॉलेजमधे प्रॅक्टिकल्स न करता फक्त बरोब्बर उत्तरं देणारीच ऑब्झर्व्हेशन्स जर्नल मधे लिहायची चालुगिरी! त्यानंतर मात्र माझं घोडं अल्गोरिदम नामक दलदलीत जे फसलंय ते अजून पर्यंत!
कंप्युटर नवसाला पावावा म्हणून अल्गोरिदम नामक र्हिदम कोणत्याही ड्रमवर वाजवला जात नाही.. हे सुरवातीलाच मुद्दाम सांगतोय, नंतर तक्रार चालणार नाही! तर, अल्गोरिदम म्हणजे एखादी कृती कशी करायची याबद्दल कंप्युटरला दिलेल्या सविस्तर सूचना! आपल्या मते त्या कितीही सविस्तर आणि बिनचूक असल्या तरी कंप्युटर एखाद्या मोलकरणी प्रमाणे घालायचा तो घोळ घालतोच! कुणाला नुसती रेसिपी वाचून पहील्या फटक्यात उत्तम पदार्थ करायला जमलंय का कधी? तसंच!
अल्गोरिदमची भानगड कळण्यासाठी असं समजा की कंप्युटर एका फूटपाथवर आहे आणि त्याला पायी रस्ता कसा क्रॉस करायचा आहे. तर काय काय सूचना द्याल? थोडं सामान्यज्ञान वापरलं तर प्रथम झेब्रा क्रॉसिंग शोधायला सांगता येईल, नंतर आधी उजवीकडे मग डावीकडे गाडी नाही ना याची खात्री करून मग रस्ता क्रॉस करायला सांगता येईल. प्रथम दर्शनी या सूचना पुरेशा वाटतात पण या सूचना देऊन कंप्युटरला समजा टिळक रोडच्या फूटपाथवर उभा केला तर त्याला गंज चढेल पण तो रस्ता क्रॉस करू शकण्याची खात्री नाही. का? कारण पहिलीच सूचना! झेब्रा क्रॉसिंग शोधा! पुण्यात ते सापडण्यासाठी अस्तित्वात असलं पाहीजे ना? असलंच तर दिसलं पाहीजे. पुण्यामधे सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नाही उभी केली तर आपल्याला पुढे जाऊच देणार नाहीत असं समजतात.
समजा, क्रॉसिंग दिसलं तरी पुढे लफडा आहेच! उजवीकडे बघितल्यावर एखादी पार्क केलेली गाडी दिसली तर कंप्युटर 'युगे अठ्ठावीस फुटपाथ वरी उभा' राहील. त्यासाठी ती सूचना 'स्वतःच्या दिशेने येणारी गाडी दिसली तर ती जाई पर्यंत उभे रहा' अशी बदलायला पाहीजे. हा अल्गोरिदम घालून कंप्युटरला अमेरिकेत रस्ता क्रॉस करायला लावला तर तो कदाचित पलिकडच्या फूटपाथ ऐवजी स्वर्गात सापडेल कारण तिकडे गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवतात. त्यामुळे तिकडे आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे बघायला लागेल. अशा प्रकारे, प्रत्येक सूचना कुठे आणि कधी चालेल याचा कंटाळा येई पर्यंत उहापोह करून अल्गोरिदम लिहीला तरच डोक्याचा भावी ताप कमी होतो. हुश्श!
हे सगळं मी तुम्हाला माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून सांगत नाहीये.. वेल! म्हणजे, ते अगदीच खोटं नाहीये.. म्हंटलं तर झालाय, म्हंटलं तर नाही! त्याचं काय आहे, कंप्युटरला अल्गोरिदम भरवायचं माझं रोजचंच काम आहे. म्हणूनच प्रत्येक सूचनेला काय काय विघ्न येतील याचाच येता जाता विचार माझ्या डोक्यात सतत चालतो. ती कशी आणि कुठे झोपेल हे सारखं बघायचं.. असंभाव्य किंवा अतर्क्य गोष्टी घडतील असं गृहीत धरून!
त्या सवयीचा इतका गुलाम झालोय मी की साध्या साध्या कामांमधे देखील कीस काढतो अगदी! बायकोने नुसतं पोराला शाळेत सोडायला सांगितलं तरी माझ्या डोक्यात असंख्य विचारभुंगे भुणभुणायला लागतात.. ट्रॅफिक किती असेल?.. दुसरा रस्ता आहे का जायला?.. वेळेवर पोचणार का?.. पोरगा तयार होणार का लवकर?.. स्कूटर न्यावी की कार?.. पेट्रोल आहे का?.. पेट्रोल भरायची वेळ आली तर वेळ गाठणार का?.. पाऊस आला तर?.. वेळेवर पोचलो नाही तर काय करायचं?.. मला ऑफिसला पोचायला किती उशीर होईल?.. ऑफिसात आज काय करायचंय सकाळी?.. तंद्रीमधे पोराला ऑफिसलाच घेऊन गेलो तर?
असो. साधारण कल्पना आली ना तुम्हाला? इथंच ते प्रकरण थांबत नाही, तर त्या विचार भोवर्यात मी पूर्ण गुरफटतो. बायकोकडे तोंड अर्धवट उघडं टाकून पहात रहातो पण प्रत्यक्षात शून्यात पहात असतो. त्यामुळे पुढच्या सूचना न्युट्रिनो सारख्या कुठेही न अडखळता डोक्याच्या आरपार सरळ निघून जातात. त्या पुढच्या नाट्याचे यशस्वी प्रयोग घराघरातून सतत होत असतात त्यामुळे ते इथे सांगत बसत नाही.
मला वाटतं की हे पेशाचे भोग फक्त माझ्याच नशिबी असावेत. कारण, इतर लोकांना त्यांच्या पेशाचा घरगुती आयुष्यात उपद्रव झालेला मी तरी ऐकलेला नाही. उदा.. ट्रॅफिक पोलीस.. त्याच्या बायकोने जर 'स्वयंपाक करायला जाते' म्हणून घराच्या बाहेरचा रस्ता धरला तर तो जोरजोरात शिट्टी मारून तिला 'बाजूला' घेईल का? किंवा वीजमंडळातल्या कारकुनाच्या बायकोने त्याला विजेचं बिल भरायला सांगितलं तर तो तिला दुसर्या टेबलावर जा म्हणेल का? वाण्याला घरात कागदाचा तुकडा दिसला तर तो समोर दिसेल ती वस्तू त्यात गुंडाळून मोकळा होईल का? एखादा वकील, त्याला गावाहून परत येण्यास जास्त दिवस लागणार असतील तर असं पत्र बायकोला लिहीताना पाहीलं आहे का ?..
My Dear Shubha(Mrs. Shubha Vinayak Dange, Aged 34, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'Darling'.)
I, (Mr. Vinayak Shreedhar Dange, Aged 35, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'I'.), came to Delhi for official work on Monday the 28th of Oct. 2010, and whereas, the work was delayed because of the act of God, and whereas, I am not able to get train and plane tickets, and whereas, it is not clear when I can leave from here, I am not sure when I can be home.
______ (स्वाक्षरी)
(Mr. Vinayak Shreedhar Dange) Dated: 5 Nov 2010
Witness: _______ (Mr. Jayram Ramram Taliram, Aged 43, resident of 8502/41, Aarakshan road, Connaught place, New Delhi- 110092.)
Dated: 5 Nov 2010
कॉल सेंटर मधे काम करणार्या एखाद्या बाईला, घरी, तिच्या नवर्याचा फोन आला तर तिनं त्याला.. तुमची जन्मतारीख काय?.. तुमच्या आईचं लग्नापूर्वीच नाव काय?.. तुमचा पत्ता काय? इ. इ. प्रश्न विचारून हैराण केलेलं कुणी ऐकलं आहे काय? एखादा वेटर, घरी बायकोने खाण्यासंबंधी काहीही विचारलं तर 'इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, कांदा उत्तप्पा, टोमॅटो आमलेट....' अशी सरबत्ती करेल काय? शाळा मास्तराने घरी बायकोला अंगठे धरून उभं रहाण्याची शिक्षा दिल्याचं ऐकलं आहे काय? घराच्या दाराची घंटा वाजल्यावर बस ड्रायव्हरला कधी गिअर टाकण्याची हालचाल करताना पाहीलं आहे काय? गारुड्याला बायकोसमोर पुंगी वाजवताना पाहीलंत का? रिकाम्या न्हाव्याला उगीचच कात्रीचा चुकचुकाट करीत बसलेला पाहीलाय का कुणी?
नाही ना? तेच तर मी म्हणतोय की इतर लोकांचं जिणं त्यांच्या पेशाच्या प्रदूषणापासून मुक्त आहे. तुम्हाला एखादी केस माहिती असलीच तर ती मी एक्सेप्शन प्रुव्हस द रूल म्हणून सोडून देईन. तुमचे केस जातील पण माझ्या सारखी केस नाही मिळणार! मला कंप्युटरनं झपाटलंय! कंप्युटरचं प्रोग्रॅमिंग करता करता त्यानंच माझं डोकं फॉर्मॅट करून तिथं चक्क नवीन ओएस टाकली आहे. आता तर, कुठलीही काम करण्याआधी मी नुसतं काय बोंबलेल याचा विचार करून थांबत नाही तर त्या प्रसंगी मार्ग कसा काढता येईल त्याचंही चर्वितचर्वण करायला लागलोय! इतका सगळा सखोल विचार केला तरी ते काम बोंबलायचं थांबत नाहीच शेवटी! फरक इतकाच की बोंबलण्याचं कारण आधी विचार न केलेल्या पैकी असतं. तरीही विक्रमादित्याचा आदर्श ठेवून, तेच काम पुढच्या वेळेस करायच्या वेळेला बोंबलण्याच्या नवीन कारणाचाही समावेश करायला जातो. याचा परिणाम फक्त अख्ख्या फॅमिलीची डोकी तापवण्यात होतो.. आणि माझंही!
उदाहरणार्थ, मंडईतून भाजी आणण्याची साधी गोष्ट! आयुष्यात पहिल्यांदा मी भाजी आणायला निघालो तेव्हा तुफान डोकं चालवल्यावर मला आणायच्या भाज्यांची यादी करायचं सुचलं. ती यादी एखाद्या कवितेच्या रसग्रहणासारखी लांबलचक झाली. पण प्रत्येक भाजी किती किलो घ्यायची हे न लिहील्यामुळे संजीवनी न शोधू शकणार्या हताश हनुमानाप्रमाणे घरी द्रोणागिरी एवढ्या भाज्या आल्या. त्याचं वेगळं रामायण झालं आणि माझे गाल, मारुती प्रमाणे, पुढचे बरेच दिवस फुगलेले राहीले. पुढच्या वेळेस यादीत सगळं नीट लिहून घेऊन गेलो पण माठ नामक भाजी ऐवजी पाण्याचा माठ नेण्याचा माठपणा केला. कुणा लेकाला माहिती माठ हे भाजीचं पण नाव असतं ते?
पुढच्या वेळेस गेलो तेव्हा मी भाजीवाल्यासमोर आणि माठ कसा ओळखायचा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर एकदमच उभे ठाकले. भाजी विकण्याची गरज त्याला जास्त आहे त्यामुळे तो योग्य ती भाजी देण्याचं काम चोख करेल असं समजून निर्धास्तपणे मी त्याला माठ मागितला. पुष्कळशा टोपल्या आजुबाजूला पसरून बर्याच आत मध्यभागी तो कोळ्यासारखा बसलेला होता. उत्तरादाखल त्यानं फक्त एक टोपली माझ्याकडे फेकली. एका यकश्चित भाजीवाल्या समोर माठ नावाखाली मायाळू घेऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं नव्हतं मला! शिवाय, त्यानं भर मंडईत माझं शैक्षणिक वस्त्रहरण केलं असतं तर ते केव्हढ्याला गेलं असतं? मग माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी माठ सोडून तिथून ताठ मानेने सटकलो. पण घरी बायकोशी गाठ होती.. हो, लग्नापासून बांधलेली! तिच्या लाथाळ्या खाल्ल्या. पुरुष हा क्षणकालाचा पती आणि अनंत काळाचा फुटबॉल असतो, हे मूलभूत ज्ञान मला तेव्हा झालं! शाळा कॉलेजात आई बाप, मोठी भावंड, मास्तर, नातेवाईक.. तारुण्यात बॉस, बायको, पोरंबाळं.. म्हातारपणी पोरांच्या बायका इ. इ. सगळे पुरुषांवर यथेच्छ पाय धुवून घेतात. नाही म्हणायला फक्त शैशवातच काय ते थोडं फार कोडकौतुक होतं पुरुषांच! म्हणूनच प्रौढत्वी निज शैशवास जपायला सांगतात की काय न कळे!
कधी सांगितलेली भाजी मंडईत नसणे तर कधी अधपाव म्हणजे नेमके किती असा प्रश्न पडणे अशा नवनवीन समस्या उद्भवणं काही थांबत नाही आणि त्या वेळेला मख्खपणे काम जमत नाही हे पण सांगता येत नाही! घोर कुचंबणा! कंप्युटरचं माणसापेक्षा बरं असतं. कुठेही तो अडकला की एरर फेकून हात झटकून रिकामा होतो. आठवा, मायक्रोसॉफ्टचे 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' हे तीन अगम्य शब्द! ते स्क्रीनवर नाचले की एक्सप्रेस वे वरून भरधाव जाता जाता अचानक समोर मोठ्ठं विवर दिसल्यावर जसं फेफरं येईल तसं येतं. विचार करा, ओबामाची सुरक्षा व्यवस्था मायक्रोसॉफ्टकडे असताना त्याच्यावर हल्ला झाला तर ते 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' ही भीषण एरर देऊन त्यातून अंग काढू शकतील का? असा सुलभ ऑप्शन माणसांना नसतो.
तरीही मी विचार करायचा थांबत नाही. मला ते व्यसन लागलंय. हेच बघाना, एकाने मला याच वेडावर लेख लिहायला सांगितलं तर लगेच.. कादंबरी लिहावी की साधा लेख?.. लिखाण टाकताना मधेच सर्व्हर झोपला तर?.. लोकांना अश्लील वाटला तर?.. हा लेख दुसर्या कुठल्या लेखाची कॉपी वाटला तर?.. .. .. .. .. ..
====== समाप्त ======
Tuesday, November 9, 2010
कोडग्यांची शाळा
'तुमच्या वेळेला कंप्युटर होता?'.. नव्या युगातल्या एका सळसळत्या रक्ताच्या अजाण कोडग्याने (प्रोग्रॅमरने) आश्चर्याने मला हा प्रश्न चॅट करताना विचारल्यावर हे नेट दुभंगून त्याला पोटात घेईल तर बरं असं वाटलं. हा शेंबड्या किती बोलतो? माझ्या लग्नाला जितकी वर्ष झालीयेत तेव्हढं याचं वय पण नाही. आणि हा त्या कालातल्या पुण्याच्या आयटीतल्या स्थानाबद्दल हे उद्गार काढतो? क्षणभर, गुहेतून बाहेर पडून वल्कलं संभाळत लकडी पुलापाशी शिकारीला जाण्याची दृश्यं तरळून गेली. पण क्षणभरच, मग विचार केला.. हल्लीचे लोक एखादी माहिती गुगलून नाही मिळाली तर ती अस्तित्वातच नव्हती असं सर्रास समजतात. नशीबानं, या बालकानं त्याचं अज्ञान माझ्यासमोर उघड केलं. अजून माझ्यासारखे, पुण्यातल्या आयटी रेव्होल्युशनचा पाया रचणारे, जुन्या पीढीतले कोडगे जिवंत आहेत. त्या काळी सुवर्णाक्षरांनी लिहीलेला आणि आत्ताच काळाच्या पडद्याआड चाललेला तो इतिहास आम्ही पुनरुज्जीवित करू शकतो. नाही केला तर पुढे याचं पण अयोध्या प्रकरण होऊ शकेल. तस्मात्, हा लेख तमाम कोडग्यांच्या डोक्यातली अज्ञानाची जळमटं व्हॅक्यूमने खेचून तिथे योग्य इतिहासाची लागवड करण्यासाठी लिहीला आहे.
तर, तुमच्या वेळेला कंप्युटर होता का? याचं थोडक्यात उत्तर 'हो' असं आहे. पुण्यात तर टीव्ही यायच्या आधीपासून कंप्युटर अस्तित्वात होता हे विधान मी कुठलही नशापाणी न करता करतो आहे. तुम्हाला ते 'वेदांमधे सगळ्या शोधांबद्दल माहिती आहे' छाप वाटू शकेल.
मी एसेस्स्तीत (१९७२) असताना पहिल्यांदा कंप्युटर पाहीला तेव्हा बाबा एसेस्सी बोर्डातच कामाला होते. त्या वेळेला त्यांनी, बोर्डात घेतलेला नवीन कंप्युटर दाखवायला, मला रंगलेल्या खेळातून ओढून, हट्टाने नेलं होतं. हल्ली पोरांना कंप्युटर वरच्या खेळातून ओढून मैदानावर न्यावं लागतं! आम्ही गेलो तेव्हा बोर्डातली दोन माणसं त्या कंप्युटरच्या एका सर्किट बोर्ड सदृश ठोकळ्याला वायरी जोडत होती. अनंत वायरींनी लगडलेला तो ठोकळा जटा पिंजारलेल्या साधूच्या डोक्यासारखा दिसत होता. नवीन वायर खुपसायची नेमकी जागा पहाण्यासाठी त्यांना केस बाजूला सारून ऊ शोधण्याची कसरत करावी लागत होती. त्यांनी मला खूपशा वायरी दाखवून जे बरच काहीबाही सांगीतलं त्या वरून कंप्युटरचं काम करायला इलेक्ट्रिशियन व्हायला लागतं हे पक्क ठसलं. पुढे मी एसेस्सीचा अडथळा निर्विघ्नपणे पार केला. त्या मागे माझ्या बाबांचा मोठा हात आहे असं माझ्या हितचिंतकांच ठाम मत आहे.. मला ते त्या कंप्युटरचं चुकून झालेलं चुकीचं वायरिंग वाटतं. पण ते काही मी त्यांना पटवू शकलो नाही! आजच्या कंप्युटरची बरोबरी जर माणसाशी केली तर त्या कंप्युटरला माकड म्हणायला लागेल इतक्या प्राथमिक अवस्थेतला तो होता.
मी जेव्हा कंप्युटरचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्या काळात एक विलक्षण गूढ वलय होतं कंप्युटर भोवती आणि शिकणार्यांभोवती! त्यामुळे सर्वसामान्यांमधे जरी एक आदराची भावना होती तरी आतल्या गाठीचे, खास मासलेवाईक, प्रश्न शनवार/सदाशिव पेठी लोकांकडूनच यायचे.. कंप्युटर तर सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं देतोच मग तुमचा काय उपयोग? गणित चांगलं आल्याशिवाय कंप्युटर येत नाही अशी, सारसबागेच्या गणपतीला गेल्याशिवाय पेपर चांगला जात नाही सारखी, हूल कुणी तरी (बहुतेक गणिताच्या मास्तरांनी) उठवलेली होती. त्या सर्व गैरसमजुतींचा फायदा घेऊन काही धूर्त लोक आपल्या चुका बिनबोभाटपणे कंप्युटरवर ढकलायचे. पेपरात 'कंप्युटरच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास' अशा सनसनाटी बातम्या झळकायच्या. कामगार संघटना 'नोकर्या जाणार, नोकर्या जाणार' म्हणून कंप्युटर धोपटायला बघायच्या. पूर्वीच्या आई बापांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून दुसरं काही शिक्षण जगात असतं हे माहितीच नव्हतं.
हल्ली सगळं बदललंय. हल्ली सन्मान्य कोर्सचं शिक्षण पोरांना झेपत नसेल तर कंप्युटर शिकायचा सल्ला मिळतो! नेटभर बागडून आणि नाही नाही ते पाहून डोळे बिघडले तरी ठपका मॉनिटरवर ठेवला जातो. त्याचं भांडवल करून, वाढीव पैशाच्या मोबदल्यात, कामगार संघटना लोकांच्या नोकर्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात.
माझ्या माहितीत तेव्हाच्या पुण्यात दोनच कंप्युटर होते.. एक एसएससी बोर्डात आणि दुसरा विद्यापीठात.. बाकी अजून एक दोन पुण्याच्या खाजगी कंपनीत असावेत. विद्यापीठातला ICL 1904 नामक एक मेनफ्रेम कंप्युटर होता. त्याच सगळंच अवाढव्य होतं. स्वेटर न घालता गेलं तर थंडी भरून न्युमोनिया होईल अश्या गारढोण आणि भल्या मोठ्या जागेत तो बंदिस्त होता. तिथे फक्त कंप्युटर सेंटरच्या लोकांना प्रवेश होता. त्यांना पायताणं बाहेर काढून वेगळ्या सपाता घालून आत जावं लागे. आत जाणारे लोक बाहेरच्या गर्दीकडे तुच्छ नजरा टाकत आत जायचे. आत मधे, भिंतीच्या एका बाजूला मोठ्या वॉशिंग मशीनसारखी दिसणारी ४ कपाटं होती. एक कपाट म्हणजे ६४ एमबी इतकी दांडगी जागा असलेली हार्ड डिस्क होती.. त्या काळी ६४ एमबी म्हणजे अगदी झोपायला जागा आहे असं वाटायचं! आता असं वाटतं की त्या कपाटात मधाच्या पोळ्यासारखी खुराडी करून, पोळ्याच्या प्रत्येक षटकोनात एकेक बाईट ठेवला तरी ६४ एमबी पेक्षा जास्त बसले असते.
भिंतीच्या दुसर्या बाजूला, भस्म्या रोग झाल्यासारखा सतत कार्ड खाणारा कार्ड रीडर होता. दर मिनीटाला सुमारे हजारेक कार्ड तो फस्त करायचा. त्याच्याच शेजारी, स्वच्छ भिंतीवर ग्राफिटी करणार्यांची हलकी मनोवृत्ती असलेला आणि सतत कागदांच्या भेंडोळ्या ओकणारा प्रिंटर होता. तो छापखाना इतका कर्णकर्कश्य आवाज करायचा की ऑपरेटर बाहेर आल्यावर पण ओरडूनच बोलायचे. एकदा, बीएससीच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाल होता.. एक जानेवारीला लावणार होते. आदल्या आठवड्यात रात्रभर बसून कित्येक हजार पानांचा तो निकाल छापला.. नंतर तो प्रत्येक सेंटर प्रमाणे पाकिटात घालताना लक्षात आलं की त्या वरची तारीख एक जानेवारी असली तरी वर्ष जुनच आहे.
तिसर्या बाजूला दोन महाकाय टेप ड्राईव्हज होते.. कॅसेट रेकॉर्डर समोर ते टॉर्च पुढे गॅसबत्ती सारखे वाटायचे. शेजारच्या मोठ्या कपाटात टेपा ठेवायची व्यवस्था होती. चौथ्या बाजूला सीपीयू आणि इतर गोष्टी असलेलं कपाट आणि एक ऑपरेटर कंसोल. त्या कंसोलला एक वेगळा प्रिंटर होता.. त्यावर कंप्युटर कडून ऑपरेटरला सूचना यायच्या. त्या वाचून ऑपरेटरची सीपीयू, टेप, रीडर आणि प्रिंटर यांच्यामधे पळापळ चालायची. कंप्युटरची मेन मेमरी १२८ केबी इतकी जबरा होती. या कंप्युटरला टर्मिनल्स नव्हती. प्रोग्रॅम आणि त्याला लागणारी माहिती कार्डांनी पुरवली जायची आणि प्रोग्रॅमचे फलित (आउटपुट) छापील कागदावर मिळायचं! हल्लीच्या काळात त्याला मेनफ्रेम म्हणणं म्हणजे डासाला डायनासॉर म्हणण्यासारखं वाटेल.
विद्यापीठात सामान्यत: कुठल्याही कोर्सची जबाबदारी एखाद्या विभागाकडे असते. त्या वेळेला कंप्युटर शिक्षणासाठी वेगळा विभाग नव्हता. त्यामुळे आमच्या या अनौरस कोर्सचं व्यवस्थापन इतर विभागातल्या एखाद्या मास्तरच्या गळ्यात घातलं जायचं. विषयांचे मास्तर बाहेरून आयात केले जायचे. आमच्या कोर्सचं सर्व प्रोग्रॅमिंग मेनफ्रेम वर चालायचं. प्रोग्रॅम पळवण्यासाठी आधी कार्डं पंच करायची. त्यासाठी प्रोग्रॅम हा प्रोग्रॅमिंग शीट वर लिहायचा आणि ते कागद पंच ऑपरेटरला (आमच्या भाषेत पंचर) द्यायचे. प्रोग्रॅमिंग शीटवरची एक ओळ म्हणजे एक कार्ड. पंचरच्या दुकानात सिद्धिविनायकासारखी मोठी रांग असायची. कधी कधी प्रोग्रॅम पंच होऊन मिळायला आठवडा पण लागायचा. स्वतःचा प्रोग्रॅम स्वतः पंच करायची सोय होती. पण त्यासाठी स्वतःची कार्ड वापरायला लागत. एका कार्डाला ५ पैसे पडायचे, तेव्हा ३०-३५ कार्डांच्या प्रोग्रॅमचे पैसे पाहीले की तोंडाला फेस यायचा हो! पंचरकडे काम दिलं की कसं सगळं फुकटात व्हायचं!
पंच झालेला प्रोग्रॅम, म्हणजे एका रबर बँडने मुसक्या बांधलेला कार्डांचा गठ्ठा, हातात पडला की तो कंप्युटर ऑपरेटरला नेऊन द्यायचा. अल्पावधीतच आमच्याकडे ढिगानी रबर बँड जमली.. कुठल्याही खिशात हात घातला तरी पैसे नाही पण रबर बँड नक्कीच सापडायचं. आम्हा बँडवाल्यांना त्या ढिगाचं काय करायचं हा यक्ष प्रश्न होता. थोड्याच दिवसात, रबर बँड विशिष्ट पद्धतीने बोटांना अडकवलं तर गोळीसारखे मारता येतं असा शोध काही अत्राप कार्ट्यांनी लावला. मग काय? जरा वेळ मिळाला की तुंबळ बँड वॉर सुरू व्हायचं. (रबर बँड कसं मारायचं याच्या अधिक माहिती साठी मला भेटा अगर लिहा. चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक!).
कोर्सचे प्रोग्रॅम दळण्याच्या दोनच वेळा होत्या, सकाळी ११ आणि दुपारी ३. बाकीच्या सर्व वेळ खाजगी कंपन्यांना आणि विद्यापीठाला वापरायला दिलेला होता. या वेळांच्या आत कार्डांचे गठ्ठे देण्यासाठी धुमश्चक्री चालायची.. त्यात पंचरला पटविण्यापासून त्याच्याकडच्या रांगेचं अवैध मॅनिप्युलेशन पर्यंत सर्व चालायचं. गठ्ठे दळायला आत गेले की तिथे मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेरचं वातावरण व्हायचं. सगळ्यांच्या चेहर्यावर काळजी मिश्रीत हुरहुर आणि शंका... कस्सं होणार? या वेळेला तरी टॅहँ ऐकू येणार का?
कार्डांच्या गठ्ठ्याला बांधलेली फलिताची (प्रिंटाउटची) सुरळी या स्वरूपात दळण बाहेर यायचं. कधी कधी, गहू दिल्यावर हळद दळून मिळाल्यासारखं, आपल्या कार्डांना भलत्याचीच सुरळी चिकटून यायची. तसं झालं की 'माझ्या प्रोग्रॅमची सुरळी हरवली, ती मला सापडली' असल्या बडबडगीतांनी सेंटर आणि कँटिन दणाणून जायचं. दळण आलं की उत्सुकतेने सुरळी उघडून बघितली जाई. बहुतेक वेळेला काही ना काही तरी चुकलेलंच असायचंच. त्यामुळे टॅहँ ऐवजी टाहोच जास्ती ऐकू यायचा. मग काय चुकलंय ते चहा बिडी मारून सुप्त मेंदुला चालना दिल्या शिवाय समजायचं नाही.
चूक सापडली की गठ्ठ्यातली चुकीची कार्ड शोधून त्याजागी नवीन कार्डं पंचून घालायला लागायची.. ते काम पंचरला दिलं तर ते कधी मिळेल त्याचा भरवसा नसायचा. त्यावर आम्ही एक जालीम उपाय शोधून काढला होता. एका कार्डावर १२ ओळी व ८० कॉलम असतात. एका कॉलम मधे एकच कॅरॅक्टर पंच करता येतं. एका कॉलम मधे कुठल्या ओळीवर भोकं मारली आहेत त्यावरून कुठलं कॅरॅक्टर पंच केलंय ते कळतं. एका कॉलममधे जास्तीत जास्त ३ ओळींवरच भोकं असतात. एकही भोक नसेल तर ते स्पेस कॅरॅक्टर. पोथी वाचणारे काय वाचतील इतक्या सराईतपणे आम्ही नुसती भोकं बघून कार्ड वाचायला शिकलो होतो. त्यामुळे कोर्स संपल्यावर सेंटर मधे निदान स्टँडबाय कार्ड रीडरची नोकरी पक्की होती. आम्ही पंचिंग रूम मधून भोकं पाडल्यावर पडतात त्या टिकल्या जमा करायचो. त्या टिकल्यांनी फॉल्टी कार्डावरची अनावश्यक भोकं बुजवून परत योग्य भोकं पाडून वापरायचो. अशी होलिस्टिकली मॉडिफाईड कार्ड रीडरला चालायची. फक्त, कार्ड थोडं ओलं असेल किंवा वापरून वापरून मऊ पडलं असेल तर रीडर मधे ते अडकायचं आणि पुढचे २०-२५ गठ्ठ्यांच्या राई राई एवढ्या चिंधड्या मिळायच्या. 'हेचि फळ काय मम प्रोग्रॅमला' अशी खंत करत कोडगे ते तुकडे कवटाळत भग्न हृदयाने कँटीनला जायचे.
या सर्व प्रक्रियेमधे एक प्रोग्रॅम सुरळीत व्हायला (तसे सर्व प्रोग्रॅम सुरळीतच मिळायचे, पण इथे सुरळीतचा रूढ अर्थ अपेक्षित आहे.) किमान दोन आठवडे तरी जायचेच. ही परिस्थिती जरा तरी बरी होती. कंप्युटर आणायच्या आधी विद्यापीठात फोर्ट्रान प्रोग्रॅमिंगचा एक कोर्स चालायचा. त्याचे प्रोग्रॅम तर मुंबईत टिआयएफारला दळायला जायचे. पंचर सगळे प्रोग्रॅम घेऊन मंगळवारी सकाळी मुंबईला जायचा, दळण झालं की सुरळ्या घेऊन रात्री पुण्यात यायचा. बुधवारी सगळ्यांनी चुका दुरुस्त करून दिल्या की गुरुवारी अजून एक दळण व्हायचं. यातच दळणवळण शब्दाची उत्पत्ती दडली आहे की काय कोण जाणे! अशा प्रकारे एक प्रोग्रॅम बरोबर चालायला किती आठवडे लागतील त्याचा हिशेब वाचकांना गृहपाठ म्हणून दिलेला आहे!
प्रोग्रॅम सुरळीत होण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, आम्ही लिहीलेला प्रोग्रॅम १०-१० वेळा तपासून मगच पंचरला द्यायचो. पंच झालेला गठ्ठा स्वतःच वाचून त्यातली चुकीची कार्ड आधीच दुरुस्त करायचो. या पद्धतीने शिकण्याचा एक प्रचंड फायदा झाला.. तो म्हणजे, स्वतःच्या प्रोग्रॅमला 'आपला तो बाळ्या' अशी पक्षपाती वागणूक न देण्याची सवय आपोआपच लागली. हल्लीच्या कोडग्यांसारखं १० ओळी लिहून लगेच डिबगर खाली त्या चालवणं म्हणजे कन्याकुमारी ते दिल्ली बस प्रवासात दर १० मिनीटांनी, 'आलं का दिल्ली?' असं विचारण्यासारखं वाटतं मला!
जितकी मजा कंप्युटरला जोडलेली यंत्रं करायची तितकीच आमचे मास्तर आणि पोरं करायची. मला फोर्ट्रान शिकवायला एक अत्यंत तिरसट, खडूस आणि विक्षिप्त मास्तर होता. बोलायच्या ऐवजी तो खेकसायचाच! जर का एखाद्याची चूक त्याला दिसली तर तो त्याला कार्ड रीडरसारखा फाडून खायचा. त्याला आम्ही तिरसिंगराव म्हणायचो. कोर्स सुरू होऊन महिना होऊन गेला तरी पठ्ठ्या शिकवायला उगवलाच नाही. पोरांनी कंटाळून लेक्चरला येणं बंद केलं. कुणी तरी 'वर' तक्रार वगैरे केल्यावर एक दिवस तो उगवला. वर्गात कमी पोरं बघून लगेच खेकसला.. 'बाकीचे कुठे आहेत? सगळे आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही'.. आणि गेला. पुढच्या लेक्चरला सगळ्या पोरांना बाबापुता करून जमवलं. वर्गात आल्या आल्या तो गरजला 'प्रत्येकाकडे फुलस्केप वही आणि पेन्सील पाहीजे. त्या शिवाय मी लेक्चर घेणार नाही.' आयला! पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे की शाळा? पण करतो काय? आलिया तिरसटाशी असावे सादर! पुढच्या लेक्चरला सगळे वही पेन्सील घेऊन हजर! म्हंटलं, चला! आता तरी याची सगळी कारणं संपली असतील.
पण कसचं काय? तो सवाई तिरसिंगराव निघाला. लेक्चरला आल्या आल्या त्यानं फळ्यावर लिहीलं 'I = 1' आणि गुरकावला 'सांगा, याचा अर्थ काय होतो?'. पहिलीतल्या पोरांना वर्गमूळ काढायला सांगितल्यावर त्यांचं जे काय होईल तेच आमचं झालं. बरेच जण माना खाली घालून बसले. खरे कोडगे खिडकी बाहेरच्या हिरवळीचं रसग्रहण करत बसले. दोन मिनिटातच तो 'याचं उत्तर आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही' असं ठणकावून निघून गेला. मग परत सगळे 'वर' गेल्यावर तो 'खाली' आला आणि पुढचं शिक्षण नीट सुरू झालं. लवकरच 'I = 1' म्हणजे काय ते समजलं पण गाडी 'I = I + 1' वर अडली. दोन्ही कडचे I कॅन्सल होऊन 0 = 1 होतं आणि तरीही कंप्युटरला ते चालतं हे समजण्यात आणखी काही दिवस गेले. बाकी, त्याचा मूड चांगला असला तर तो शिकवायचा मात्र उत्तम!
काही वर्षानंतर मी मुंबईहून डेक्कन क्वीनने पुण्याला येत असताना माझ्या वर्गातली दोन तीन मुलं भेटली. गप्पाटप्पात तिरसिंगरावाचा विषय निघाला. सगळे त्याची नक्कल करत करत त्याचे किस्से सांगून मनमुराद खिदळत होते.. इतक्यात, समोरचा एक वृद्ध माणूस पुसता झाला.. 'तुम्ही हे त्या विद्यापीठातल्या अमुक अमुक प्रोफेसरबद्दल बोलताय का?'. होकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्या गृहस्थांनी गुगली टाकला.. 'नशीबवान आहात, थोडक्यात सुटलात'. आँ! म्हणजे काय? हा माणूस बालवाडीपासून त्याचा विद्यार्थी आहे की काय? कुणालाच काही समजलं नाही. भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे पाहिल्यावर एकाने विचारलं 'म्हणजे? तुमचं म्हणणं समजलं नाही हो नीट!'. त्यावर तो कळवळून 'अहो! तो माझा जावई आहे हो!' म्हणताच एकदम सगळ्यांचा कडेलोट झाला.
आमचा दुसरा एक मास्तर अगदी हसतमुख होता, कधीही चिडायचा नाही. तो विद्यापीठा जवळच रहायचा, खूप हुषार होता आणि खूप वेगवेगळे विषय शिकवू शकायचा. साहजिकच, प्रत्येक वर्षाला काहीना काही तरी तो शिकवायचाच. फक्त, प्रचंड विसरभोळेपणा हा एकच त्याचा प्रॉब्लेम होता.. त्याचा म्हणण्यापेक्षा आमचा! त्याला लेक्चरची वेळ कधीही आठवायची नाही. आठवलीच तर काय विषय शिकवतोय ते आठवायचं नाही. आणि चुकून हे सगळं आठवलंच तर मागच्या लेक्चरला कुठपर्यंत शिकवलं होतं ते आठवायचं नाही. कित्येक वेळेला लेक्चरच्या वेळेला तो आम्हाला न सांगता बाहेर गेलेला असायचा. त्यामुळे त्याचा विषय मागे पडायचा. मग रविवारी जादा लेक्चर व्हायची. एका रविवारी सकाळी ११ वाजता त्याच्या लेक्चरला गेलो.. नेहमी प्रमाणे त्याचा पत्ताच नव्हता. मग घरी बोलवायला गेलो.. पायजमा शर्ट असल्या कपड्यात तो घरी निवांत होता. आम्हाला दारात पहाताच हसत हसत म्हणाला 'मी काहीतरी विसरलोय ना? काय विसरलोय?'. हा इसम, खुद्द त्याच्या बायकोला दिलेला शब्द पण विसरायचा. हे तो मुद्दाम करायचा की नाही याबद्दल तज्ज्ञात मतभेद आहेत. तरीही अजून त्यांचा संसार मात्र सुरळीत चालू आहे.
कोबॉलचा प्रोग्रॅम म्हणजे एक मोठ्ठाच्या मोठ्ठा निबंध असतो. त्यात सुरुवातीच्या भागात CONFIGURATION SECTION आणि त्या नंतर SOURCE-COMPUTER असं लिहून कंप्युटरचं नाव लिहायचं असतं. एका पोराने त्याच्या प्रोग्रॅम मधे एकदा SOURCE-COMPUTER चं स्पेलिंग चुकवलं. साहजिकच, कंप्युटरने झापड मारली 'SOURCE-COMPUTER MISSING'. त्याला त्याचा अर्थच कळाला नाही. बिच्चारा! जातीचा सरदार होता तो, अगदी त्यांच्या लौकिकाला साजेलसं वागला.. ऑपरेटरला कंप्युटर हरवला आहे का असं विचारून आला!
मी पास झाल्यावर (या खेपेला कंप्युटरची काहीही चूक नव्हती, कारण निकाल मुळात कंप्युटरवर काढलेला नव्हता) काही वर्षांनी कंप्युटर शिक्षणाचा स्वतंत्र विभाग झाला. त्या विभागाने त्यांच्या कोर्सेस साठी स्वतंत्र कंप्युटर घेतला. कालांतराने मेनफ्रेमचे ते सेंटर बंद होऊन ती जागा सीडॅकला देण्यात आली.
== समाप्त ==
तर, तुमच्या वेळेला कंप्युटर होता का? याचं थोडक्यात उत्तर 'हो' असं आहे. पुण्यात तर टीव्ही यायच्या आधीपासून कंप्युटर अस्तित्वात होता हे विधान मी कुठलही नशापाणी न करता करतो आहे. तुम्हाला ते 'वेदांमधे सगळ्या शोधांबद्दल माहिती आहे' छाप वाटू शकेल.
मी एसेस्स्तीत (१९७२) असताना पहिल्यांदा कंप्युटर पाहीला तेव्हा बाबा एसेस्सी बोर्डातच कामाला होते. त्या वेळेला त्यांनी, बोर्डात घेतलेला नवीन कंप्युटर दाखवायला, मला रंगलेल्या खेळातून ओढून, हट्टाने नेलं होतं. हल्ली पोरांना कंप्युटर वरच्या खेळातून ओढून मैदानावर न्यावं लागतं! आम्ही गेलो तेव्हा बोर्डातली दोन माणसं त्या कंप्युटरच्या एका सर्किट बोर्ड सदृश ठोकळ्याला वायरी जोडत होती. अनंत वायरींनी लगडलेला तो ठोकळा जटा पिंजारलेल्या साधूच्या डोक्यासारखा दिसत होता. नवीन वायर खुपसायची नेमकी जागा पहाण्यासाठी त्यांना केस बाजूला सारून ऊ शोधण्याची कसरत करावी लागत होती. त्यांनी मला खूपशा वायरी दाखवून जे बरच काहीबाही सांगीतलं त्या वरून कंप्युटरचं काम करायला इलेक्ट्रिशियन व्हायला लागतं हे पक्क ठसलं. पुढे मी एसेस्सीचा अडथळा निर्विघ्नपणे पार केला. त्या मागे माझ्या बाबांचा मोठा हात आहे असं माझ्या हितचिंतकांच ठाम मत आहे.. मला ते त्या कंप्युटरचं चुकून झालेलं चुकीचं वायरिंग वाटतं. पण ते काही मी त्यांना पटवू शकलो नाही! आजच्या कंप्युटरची बरोबरी जर माणसाशी केली तर त्या कंप्युटरला माकड म्हणायला लागेल इतक्या प्राथमिक अवस्थेतला तो होता.
मी जेव्हा कंप्युटरचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्या काळात एक विलक्षण गूढ वलय होतं कंप्युटर भोवती आणि शिकणार्यांभोवती! त्यामुळे सर्वसामान्यांमधे जरी एक आदराची भावना होती तरी आतल्या गाठीचे, खास मासलेवाईक, प्रश्न शनवार/सदाशिव पेठी लोकांकडूनच यायचे.. कंप्युटर तर सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं देतोच मग तुमचा काय उपयोग? गणित चांगलं आल्याशिवाय कंप्युटर येत नाही अशी, सारसबागेच्या गणपतीला गेल्याशिवाय पेपर चांगला जात नाही सारखी, हूल कुणी तरी (बहुतेक गणिताच्या मास्तरांनी) उठवलेली होती. त्या सर्व गैरसमजुतींचा फायदा घेऊन काही धूर्त लोक आपल्या चुका बिनबोभाटपणे कंप्युटरवर ढकलायचे. पेपरात 'कंप्युटरच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास' अशा सनसनाटी बातम्या झळकायच्या. कामगार संघटना 'नोकर्या जाणार, नोकर्या जाणार' म्हणून कंप्युटर धोपटायला बघायच्या. पूर्वीच्या आई बापांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून दुसरं काही शिक्षण जगात असतं हे माहितीच नव्हतं.
हल्ली सगळं बदललंय. हल्ली सन्मान्य कोर्सचं शिक्षण पोरांना झेपत नसेल तर कंप्युटर शिकायचा सल्ला मिळतो! नेटभर बागडून आणि नाही नाही ते पाहून डोळे बिघडले तरी ठपका मॉनिटरवर ठेवला जातो. त्याचं भांडवल करून, वाढीव पैशाच्या मोबदल्यात, कामगार संघटना लोकांच्या नोकर्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात.
माझ्या माहितीत तेव्हाच्या पुण्यात दोनच कंप्युटर होते.. एक एसएससी बोर्डात आणि दुसरा विद्यापीठात.. बाकी अजून एक दोन पुण्याच्या खाजगी कंपनीत असावेत. विद्यापीठातला ICL 1904 नामक एक मेनफ्रेम कंप्युटर होता. त्याच सगळंच अवाढव्य होतं. स्वेटर न घालता गेलं तर थंडी भरून न्युमोनिया होईल अश्या गारढोण आणि भल्या मोठ्या जागेत तो बंदिस्त होता. तिथे फक्त कंप्युटर सेंटरच्या लोकांना प्रवेश होता. त्यांना पायताणं बाहेर काढून वेगळ्या सपाता घालून आत जावं लागे. आत जाणारे लोक बाहेरच्या गर्दीकडे तुच्छ नजरा टाकत आत जायचे. आत मधे, भिंतीच्या एका बाजूला मोठ्या वॉशिंग मशीनसारखी दिसणारी ४ कपाटं होती. एक कपाट म्हणजे ६४ एमबी इतकी दांडगी जागा असलेली हार्ड डिस्क होती.. त्या काळी ६४ एमबी म्हणजे अगदी झोपायला जागा आहे असं वाटायचं! आता असं वाटतं की त्या कपाटात मधाच्या पोळ्यासारखी खुराडी करून, पोळ्याच्या प्रत्येक षटकोनात एकेक बाईट ठेवला तरी ६४ एमबी पेक्षा जास्त बसले असते.
भिंतीच्या दुसर्या बाजूला, भस्म्या रोग झाल्यासारखा सतत कार्ड खाणारा कार्ड रीडर होता. दर मिनीटाला सुमारे हजारेक कार्ड तो फस्त करायचा. त्याच्याच शेजारी, स्वच्छ भिंतीवर ग्राफिटी करणार्यांची हलकी मनोवृत्ती असलेला आणि सतत कागदांच्या भेंडोळ्या ओकणारा प्रिंटर होता. तो छापखाना इतका कर्णकर्कश्य आवाज करायचा की ऑपरेटर बाहेर आल्यावर पण ओरडूनच बोलायचे. एकदा, बीएससीच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाल होता.. एक जानेवारीला लावणार होते. आदल्या आठवड्यात रात्रभर बसून कित्येक हजार पानांचा तो निकाल छापला.. नंतर तो प्रत्येक सेंटर प्रमाणे पाकिटात घालताना लक्षात आलं की त्या वरची तारीख एक जानेवारी असली तरी वर्ष जुनच आहे.
तिसर्या बाजूला दोन महाकाय टेप ड्राईव्हज होते.. कॅसेट रेकॉर्डर समोर ते टॉर्च पुढे गॅसबत्ती सारखे वाटायचे. शेजारच्या मोठ्या कपाटात टेपा ठेवायची व्यवस्था होती. चौथ्या बाजूला सीपीयू आणि इतर गोष्टी असलेलं कपाट आणि एक ऑपरेटर कंसोल. त्या कंसोलला एक वेगळा प्रिंटर होता.. त्यावर कंप्युटर कडून ऑपरेटरला सूचना यायच्या. त्या वाचून ऑपरेटरची सीपीयू, टेप, रीडर आणि प्रिंटर यांच्यामधे पळापळ चालायची. कंप्युटरची मेन मेमरी १२८ केबी इतकी जबरा होती. या कंप्युटरला टर्मिनल्स नव्हती. प्रोग्रॅम आणि त्याला लागणारी माहिती कार्डांनी पुरवली जायची आणि प्रोग्रॅमचे फलित (आउटपुट) छापील कागदावर मिळायचं! हल्लीच्या काळात त्याला मेनफ्रेम म्हणणं म्हणजे डासाला डायनासॉर म्हणण्यासारखं वाटेल.
विद्यापीठात सामान्यत: कुठल्याही कोर्सची जबाबदारी एखाद्या विभागाकडे असते. त्या वेळेला कंप्युटर शिक्षणासाठी वेगळा विभाग नव्हता. त्यामुळे आमच्या या अनौरस कोर्सचं व्यवस्थापन इतर विभागातल्या एखाद्या मास्तरच्या गळ्यात घातलं जायचं. विषयांचे मास्तर बाहेरून आयात केले जायचे. आमच्या कोर्सचं सर्व प्रोग्रॅमिंग मेनफ्रेम वर चालायचं. प्रोग्रॅम पळवण्यासाठी आधी कार्डं पंच करायची. त्यासाठी प्रोग्रॅम हा प्रोग्रॅमिंग शीट वर लिहायचा आणि ते कागद पंच ऑपरेटरला (आमच्या भाषेत पंचर) द्यायचे. प्रोग्रॅमिंग शीटवरची एक ओळ म्हणजे एक कार्ड. पंचरच्या दुकानात सिद्धिविनायकासारखी मोठी रांग असायची. कधी कधी प्रोग्रॅम पंच होऊन मिळायला आठवडा पण लागायचा. स्वतःचा प्रोग्रॅम स्वतः पंच करायची सोय होती. पण त्यासाठी स्वतःची कार्ड वापरायला लागत. एका कार्डाला ५ पैसे पडायचे, तेव्हा ३०-३५ कार्डांच्या प्रोग्रॅमचे पैसे पाहीले की तोंडाला फेस यायचा हो! पंचरकडे काम दिलं की कसं सगळं फुकटात व्हायचं!
पंच झालेला प्रोग्रॅम, म्हणजे एका रबर बँडने मुसक्या बांधलेला कार्डांचा गठ्ठा, हातात पडला की तो कंप्युटर ऑपरेटरला नेऊन द्यायचा. अल्पावधीतच आमच्याकडे ढिगानी रबर बँड जमली.. कुठल्याही खिशात हात घातला तरी पैसे नाही पण रबर बँड नक्कीच सापडायचं. आम्हा बँडवाल्यांना त्या ढिगाचं काय करायचं हा यक्ष प्रश्न होता. थोड्याच दिवसात, रबर बँड विशिष्ट पद्धतीने बोटांना अडकवलं तर गोळीसारखे मारता येतं असा शोध काही अत्राप कार्ट्यांनी लावला. मग काय? जरा वेळ मिळाला की तुंबळ बँड वॉर सुरू व्हायचं. (रबर बँड कसं मारायचं याच्या अधिक माहिती साठी मला भेटा अगर लिहा. चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक!).
कोर्सचे प्रोग्रॅम दळण्याच्या दोनच वेळा होत्या, सकाळी ११ आणि दुपारी ३. बाकीच्या सर्व वेळ खाजगी कंपन्यांना आणि विद्यापीठाला वापरायला दिलेला होता. या वेळांच्या आत कार्डांचे गठ्ठे देण्यासाठी धुमश्चक्री चालायची.. त्यात पंचरला पटविण्यापासून त्याच्याकडच्या रांगेचं अवैध मॅनिप्युलेशन पर्यंत सर्व चालायचं. गठ्ठे दळायला आत गेले की तिथे मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेरचं वातावरण व्हायचं. सगळ्यांच्या चेहर्यावर काळजी मिश्रीत हुरहुर आणि शंका... कस्सं होणार? या वेळेला तरी टॅहँ ऐकू येणार का?
कार्डांच्या गठ्ठ्याला बांधलेली फलिताची (प्रिंटाउटची) सुरळी या स्वरूपात दळण बाहेर यायचं. कधी कधी, गहू दिल्यावर हळद दळून मिळाल्यासारखं, आपल्या कार्डांना भलत्याचीच सुरळी चिकटून यायची. तसं झालं की 'माझ्या प्रोग्रॅमची सुरळी हरवली, ती मला सापडली' असल्या बडबडगीतांनी सेंटर आणि कँटिन दणाणून जायचं. दळण आलं की उत्सुकतेने सुरळी उघडून बघितली जाई. बहुतेक वेळेला काही ना काही तरी चुकलेलंच असायचंच. त्यामुळे टॅहँ ऐवजी टाहोच जास्ती ऐकू यायचा. मग काय चुकलंय ते चहा बिडी मारून सुप्त मेंदुला चालना दिल्या शिवाय समजायचं नाही.
चूक सापडली की गठ्ठ्यातली चुकीची कार्ड शोधून त्याजागी नवीन कार्डं पंचून घालायला लागायची.. ते काम पंचरला दिलं तर ते कधी मिळेल त्याचा भरवसा नसायचा. त्यावर आम्ही एक जालीम उपाय शोधून काढला होता. एका कार्डावर १२ ओळी व ८० कॉलम असतात. एका कॉलम मधे एकच कॅरॅक्टर पंच करता येतं. एका कॉलम मधे कुठल्या ओळीवर भोकं मारली आहेत त्यावरून कुठलं कॅरॅक्टर पंच केलंय ते कळतं. एका कॉलममधे जास्तीत जास्त ३ ओळींवरच भोकं असतात. एकही भोक नसेल तर ते स्पेस कॅरॅक्टर. पोथी वाचणारे काय वाचतील इतक्या सराईतपणे आम्ही नुसती भोकं बघून कार्ड वाचायला शिकलो होतो. त्यामुळे कोर्स संपल्यावर सेंटर मधे निदान स्टँडबाय कार्ड रीडरची नोकरी पक्की होती. आम्ही पंचिंग रूम मधून भोकं पाडल्यावर पडतात त्या टिकल्या जमा करायचो. त्या टिकल्यांनी फॉल्टी कार्डावरची अनावश्यक भोकं बुजवून परत योग्य भोकं पाडून वापरायचो. अशी होलिस्टिकली मॉडिफाईड कार्ड रीडरला चालायची. फक्त, कार्ड थोडं ओलं असेल किंवा वापरून वापरून मऊ पडलं असेल तर रीडर मधे ते अडकायचं आणि पुढचे २०-२५ गठ्ठ्यांच्या राई राई एवढ्या चिंधड्या मिळायच्या. 'हेचि फळ काय मम प्रोग्रॅमला' अशी खंत करत कोडगे ते तुकडे कवटाळत भग्न हृदयाने कँटीनला जायचे.
या सर्व प्रक्रियेमधे एक प्रोग्रॅम सुरळीत व्हायला (तसे सर्व प्रोग्रॅम सुरळीतच मिळायचे, पण इथे सुरळीतचा रूढ अर्थ अपेक्षित आहे.) किमान दोन आठवडे तरी जायचेच. ही परिस्थिती जरा तरी बरी होती. कंप्युटर आणायच्या आधी विद्यापीठात फोर्ट्रान प्रोग्रॅमिंगचा एक कोर्स चालायचा. त्याचे प्रोग्रॅम तर मुंबईत टिआयएफारला दळायला जायचे. पंचर सगळे प्रोग्रॅम घेऊन मंगळवारी सकाळी मुंबईला जायचा, दळण झालं की सुरळ्या घेऊन रात्री पुण्यात यायचा. बुधवारी सगळ्यांनी चुका दुरुस्त करून दिल्या की गुरुवारी अजून एक दळण व्हायचं. यातच दळणवळण शब्दाची उत्पत्ती दडली आहे की काय कोण जाणे! अशा प्रकारे एक प्रोग्रॅम बरोबर चालायला किती आठवडे लागतील त्याचा हिशेब वाचकांना गृहपाठ म्हणून दिलेला आहे!
प्रोग्रॅम सुरळीत होण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, आम्ही लिहीलेला प्रोग्रॅम १०-१० वेळा तपासून मगच पंचरला द्यायचो. पंच झालेला गठ्ठा स्वतःच वाचून त्यातली चुकीची कार्ड आधीच दुरुस्त करायचो. या पद्धतीने शिकण्याचा एक प्रचंड फायदा झाला.. तो म्हणजे, स्वतःच्या प्रोग्रॅमला 'आपला तो बाळ्या' अशी पक्षपाती वागणूक न देण्याची सवय आपोआपच लागली. हल्लीच्या कोडग्यांसारखं १० ओळी लिहून लगेच डिबगर खाली त्या चालवणं म्हणजे कन्याकुमारी ते दिल्ली बस प्रवासात दर १० मिनीटांनी, 'आलं का दिल्ली?' असं विचारण्यासारखं वाटतं मला!
जितकी मजा कंप्युटरला जोडलेली यंत्रं करायची तितकीच आमचे मास्तर आणि पोरं करायची. मला फोर्ट्रान शिकवायला एक अत्यंत तिरसट, खडूस आणि विक्षिप्त मास्तर होता. बोलायच्या ऐवजी तो खेकसायचाच! जर का एखाद्याची चूक त्याला दिसली तर तो त्याला कार्ड रीडरसारखा फाडून खायचा. त्याला आम्ही तिरसिंगराव म्हणायचो. कोर्स सुरू होऊन महिना होऊन गेला तरी पठ्ठ्या शिकवायला उगवलाच नाही. पोरांनी कंटाळून लेक्चरला येणं बंद केलं. कुणी तरी 'वर' तक्रार वगैरे केल्यावर एक दिवस तो उगवला. वर्गात कमी पोरं बघून लगेच खेकसला.. 'बाकीचे कुठे आहेत? सगळे आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही'.. आणि गेला. पुढच्या लेक्चरला सगळ्या पोरांना बाबापुता करून जमवलं. वर्गात आल्या आल्या तो गरजला 'प्रत्येकाकडे फुलस्केप वही आणि पेन्सील पाहीजे. त्या शिवाय मी लेक्चर घेणार नाही.' आयला! पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे की शाळा? पण करतो काय? आलिया तिरसटाशी असावे सादर! पुढच्या लेक्चरला सगळे वही पेन्सील घेऊन हजर! म्हंटलं, चला! आता तरी याची सगळी कारणं संपली असतील.
पण कसचं काय? तो सवाई तिरसिंगराव निघाला. लेक्चरला आल्या आल्या त्यानं फळ्यावर लिहीलं 'I = 1' आणि गुरकावला 'सांगा, याचा अर्थ काय होतो?'. पहिलीतल्या पोरांना वर्गमूळ काढायला सांगितल्यावर त्यांचं जे काय होईल तेच आमचं झालं. बरेच जण माना खाली घालून बसले. खरे कोडगे खिडकी बाहेरच्या हिरवळीचं रसग्रहण करत बसले. दोन मिनिटातच तो 'याचं उत्तर आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही' असं ठणकावून निघून गेला. मग परत सगळे 'वर' गेल्यावर तो 'खाली' आला आणि पुढचं शिक्षण नीट सुरू झालं. लवकरच 'I = 1' म्हणजे काय ते समजलं पण गाडी 'I = I + 1' वर अडली. दोन्ही कडचे I कॅन्सल होऊन 0 = 1 होतं आणि तरीही कंप्युटरला ते चालतं हे समजण्यात आणखी काही दिवस गेले. बाकी, त्याचा मूड चांगला असला तर तो शिकवायचा मात्र उत्तम!
काही वर्षानंतर मी मुंबईहून डेक्कन क्वीनने पुण्याला येत असताना माझ्या वर्गातली दोन तीन मुलं भेटली. गप्पाटप्पात तिरसिंगरावाचा विषय निघाला. सगळे त्याची नक्कल करत करत त्याचे किस्से सांगून मनमुराद खिदळत होते.. इतक्यात, समोरचा एक वृद्ध माणूस पुसता झाला.. 'तुम्ही हे त्या विद्यापीठातल्या अमुक अमुक प्रोफेसरबद्दल बोलताय का?'. होकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्या गृहस्थांनी गुगली टाकला.. 'नशीबवान आहात, थोडक्यात सुटलात'. आँ! म्हणजे काय? हा माणूस बालवाडीपासून त्याचा विद्यार्थी आहे की काय? कुणालाच काही समजलं नाही. भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे पाहिल्यावर एकाने विचारलं 'म्हणजे? तुमचं म्हणणं समजलं नाही हो नीट!'. त्यावर तो कळवळून 'अहो! तो माझा जावई आहे हो!' म्हणताच एकदम सगळ्यांचा कडेलोट झाला.
आमचा दुसरा एक मास्तर अगदी हसतमुख होता, कधीही चिडायचा नाही. तो विद्यापीठा जवळच रहायचा, खूप हुषार होता आणि खूप वेगवेगळे विषय शिकवू शकायचा. साहजिकच, प्रत्येक वर्षाला काहीना काही तरी तो शिकवायचाच. फक्त, प्रचंड विसरभोळेपणा हा एकच त्याचा प्रॉब्लेम होता.. त्याचा म्हणण्यापेक्षा आमचा! त्याला लेक्चरची वेळ कधीही आठवायची नाही. आठवलीच तर काय विषय शिकवतोय ते आठवायचं नाही. आणि चुकून हे सगळं आठवलंच तर मागच्या लेक्चरला कुठपर्यंत शिकवलं होतं ते आठवायचं नाही. कित्येक वेळेला लेक्चरच्या वेळेला तो आम्हाला न सांगता बाहेर गेलेला असायचा. त्यामुळे त्याचा विषय मागे पडायचा. मग रविवारी जादा लेक्चर व्हायची. एका रविवारी सकाळी ११ वाजता त्याच्या लेक्चरला गेलो.. नेहमी प्रमाणे त्याचा पत्ताच नव्हता. मग घरी बोलवायला गेलो.. पायजमा शर्ट असल्या कपड्यात तो घरी निवांत होता. आम्हाला दारात पहाताच हसत हसत म्हणाला 'मी काहीतरी विसरलोय ना? काय विसरलोय?'. हा इसम, खुद्द त्याच्या बायकोला दिलेला शब्द पण विसरायचा. हे तो मुद्दाम करायचा की नाही याबद्दल तज्ज्ञात मतभेद आहेत. तरीही अजून त्यांचा संसार मात्र सुरळीत चालू आहे.
कोबॉलचा प्रोग्रॅम म्हणजे एक मोठ्ठाच्या मोठ्ठा निबंध असतो. त्यात सुरुवातीच्या भागात CONFIGURATION SECTION आणि त्या नंतर SOURCE-COMPUTER असं लिहून कंप्युटरचं नाव लिहायचं असतं. एका पोराने त्याच्या प्रोग्रॅम मधे एकदा SOURCE-COMPUTER चं स्पेलिंग चुकवलं. साहजिकच, कंप्युटरने झापड मारली 'SOURCE-COMPUTER MISSING'. त्याला त्याचा अर्थच कळाला नाही. बिच्चारा! जातीचा सरदार होता तो, अगदी त्यांच्या लौकिकाला साजेलसं वागला.. ऑपरेटरला कंप्युटर हरवला आहे का असं विचारून आला!
मी पास झाल्यावर (या खेपेला कंप्युटरची काहीही चूक नव्हती, कारण निकाल मुळात कंप्युटरवर काढलेला नव्हता) काही वर्षांनी कंप्युटर शिक्षणाचा स्वतंत्र विभाग झाला. त्या विभागाने त्यांच्या कोर्सेस साठी स्वतंत्र कंप्युटर घेतला. कालांतराने मेनफ्रेमचे ते सेंटर बंद होऊन ती जागा सीडॅकला देण्यात आली.
== समाप्त ==
Thursday, October 14, 2010
जिवाची मुंबई
'काल नेहमी प्रमाणे सायकलवरून घरी चाललो होतो.. भरपूर ढग होते.. गच्च अंधार होता.. आणि तेव्हाच एका गल्लीतून एक सायकलवाली भसकन माझ्या समोर आली'.. माझ्या ऑफिसातला एक सहकारी डिसेंबरातल्या एके दिवशी सांगत होता.. 'तिच्या सायकलला दिवा नाही.. डोक्यावर हेल्मेट नाही.. अंगावर फ्ल्युरोसंट जॅकेट नाही.. काहीच नाही.. मी म्हणालो.. माय गॉड! हाऊ इज शी गॉना सर्व्हाइव्ह?'.. हो ना! इकडे सायकल चालवायची असली तरी हेल्मेट लागतं, सायकलला दिवा लागतो शिवाय अंधारात इतरांना तुम्ही दिसावेत म्हणून अंगात फ्ल्युरोसंट जॅकेट लागतं. त्याच्या ष्टोरीवर बाकीचे संमती दर्शक माना डोलावत शेरेबाजी करत होते आणि मला मात्र आपल्याकडचं सायकलिंग आठवत होतं. एकदम मन सुमारे ३०/३५ वर्ष मागे गेलं.. कॉलेज मधल्या काळात.
[टीप :- आता फ्लॅशबॅक चालू होणार आहे. तरी प्रत्येकांने इथे आपल्या आवडी प्रमाणे आपल्याला हवा तसा फ्लॅशबॅक मारून घ्यावा. तुम्हाला काही सुचत नसल्यास पुढील मान्य फ्लॅशबॅक पद्धतीतून निवड करा .. चालू सीन पाण्यावर डचमळून डचमळून एकदम भूतकाळातल्या सीनला खो देण्याची एक पद्धत. दुसरी, भूतकाळातला सीन सरळ ब्लॅक अँड व्हाईट मधे सुरू करण्याची. वाचकांना अशी कस्टमायझेशनची सोय देऊन त्यांना लेखात प्रत्यक्ष सहभागी करून घेणारा हा पहीलाच लेख असावा बहुधा!]
आम्ही नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर चकाट्या पिटत बसलो होतो. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी जाम बोअर होत होतं.. कशातच मजा राहिली नव्हती.. लेक्चरना दांड्या मारून पिक्चरला जाणे.. दुसर्या कॉलेजच्या लेक्चरांना बसणे.. कॉलेजला सरळ यायच्या ऐवजी व्हाया गुत्ता येणे.. सगळ्या सगळ्याचा घनघोर कंटाळा आलेला होता.. अगदी, सुंदर मुलगी दिसल्यावर केसांची झुलपं ठीक करायला देखील हात उठत नव्हता.
आणि, अचानक, कसलीही पूर्वकल्पना न देता मक्यानं 'आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं का?' असा बाँब टाकला. बाँब नाहीतर काय? कारण, आमच्या पॉकेटमनीच्या पैशात आम्ही फार फार तर हडपसर पर्यंत जाऊन आलो असतो. त्या काळी आमचा पॉकेटमनी आठवड्याला तीन किंवा चार रुपये इतका घसघशीत असायचा. 'लागतोय कशाला पॉकेटमनी?' हा समस्त आईबापांचा युक्तिवाद! 'बाहेरचं खायला? शीss! कळकट्टं हॉटेलातलं ते त्याच त्याच तेलात तळलेलं खाणं? छे! त्यापेक्षा पोराने डबा घेऊन जावा!'. तेव्हा चहा फक्त १५ पैशाला मिळायचा हो, पण आम्हाला बिड्या प्यायलाही पैसे लागायचे.. अर्थात, ते कळालं असतं तर मी कुठल्या तरी गॅरेजवर गाड्या पुसत बसलो असतो.
या पार्श्वभूमिवर, ट्रेनच्या तिकीटाचे आणि मुंबईत हिंडण्याफिरण्याचे पैसे घरी मागितले असते तर पैसे सोडाच वर हक्काचा पॉकेटमनी पण बंद झाला असता.. शिवाय, कुचकटपणे 'हॅ! मुंबईत काय जायचंय? पाहिली नाही का कधी आपण? त्यापेक्षा अभ्यास करा जरा! मागच्या परीक्षेत किती मार्क पडलेत ते माहिती आहे ना?' असली मुक्ताफळं ऐकायला मिळाली असती. 'परीक्षेतले मार्क' हे समस्त आईबापांच सुदर्शन चक्र! त्यांनी ते तोंडातून भिरकावलं की सपशेल शरणागती पत्करल्या शिवाय गत्यंतर नसायचं.
तरीही गंमत म्हणून आमचे खर्चाचे हिशेब सुरू झाल्यावर मक्याने खरा बाँब टाकला.. याच्या मानाने मागचा लवंगी बाँब होता.. 'अरे गाढवान्नो! ट्रेनने नाही, सायकलने जायचंय'. सायकलने मुंबई? माणसानं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवण्या इतकीच ही आयडिया जगावेगळी होती. इथे जवळपास जायला सायकल ठीक आहे, पण मुंबई? जरा विचार केल्यावर ती कल्पना थ्रिलिंग वाटली मात्र!
बाकी मक्याच्या कल्पना नेहमी चित्तथरारक आणि उत्स्फुर्त असायच्या. त्याच्यामुळे पुण्याच्या आसपासच्या गावांना आमच्या सायकलवार्या झाल्या होत्या. लोणावळ्याला तर तीन चार वेळा जाणं झालं होतं. एकदा तर संध्याकाळी ६ वाजता आम्ही अचानक निघालो आणि शिवापूरला सायकलवर जाऊन रात्री ११ वाजता परत आलो होतो. पण सायकलने मुंबईला एका दिवसात काही जाऊन येणं शक्य नव्हतं, शिवाय पैसे पण लागले असतेच. मग घरी काय बंडला मारायच्या? मुंबईत कुठं रहायचं? पैसे कसे जमवायचे? कोण कोण येणार? असल्या अनंत प्रश्नांचा उहापोह सुरू झाला.
हो नाही करता करता ५ जण तयार झाले. मी, दिल्या, मक्या, उल्हास आणि सतीश. जायला किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. लोणावळ्याला जायला चार साडे चार तास लागायचे इतकाच अनुभव होता. शांतपणे सायकल चालविली तर वेग तासाला सुमारे १५/१६ किमी पडतो. त्यावेळी पनवेल ते चेंबूर खाडी पुला वरून जाणारा रस्ता नुकताच तयार झाला होता. त्या पुलाचं उदघाटन नेहमी प्रमाणे रखडलेलं होतं पण वाहनांची ये जा सुरू झाली आहे असं ऐकून होतो. तसंच त्या पुलावरून जायला टोल भरावा लागतो हे समजलं होतं आणि सायकलला किती टोल पडेल त्याची माहिती कुणालाच नव्हती. एक दिवस जायला, एक यायला आणि एक दिवस तिथे रहायला असा ३ दिवसांचा प्लॅन झाला. उल्हासची बहीण दादरला रहायची तिच्याकडे रहायचं ठरलं.
मुंबईला सायकलने सोडाच पण ट्रेनने जायला सुद्धा घरून परवानगी मिळाली नसती म्हणून घरी 'सिंहगडावर जाणार आहोत.. तिथे एका मित्राच्या शेतावर रात्री राहून दुसरे दिवशी परत येऊ' अशी बंडल ठोकली. फक्त उल्हासच्या घरी आम्ही मुंबईला जाणार आहोत हे माहीत होतं. पैशासाठी वेगवेगळ्या पुड्या सोडल्या! मला पुस्तकं घ्यावी लागणार होती, मक्याला केमिस्ट्री प्रॅक्टिकल करण्यासाठी डिपॉझिट भरावं लागणार होतं, दिल्याला कॉलेजच्या एका कार्यक्रमाची वर्गणी भरायला लागणार होती. सावधगिरी म्हणून प्रत्येकानं इतरांनी घरी काय बंडला मारल्या आहेत ते लक्षात ठेवलं होतं!
ठरल्या दिवशी पहाटे ६ ला निघालो. एकाच दिवसाचे कपडे घेऊ शकत असल्यामुळे प्रत्येकाच्या खांद्याला एकच शबनम पिशवी होती! त्याकाळात शबनम पिशवीची क्रेझ होती.. बॅकपॅक सारखी उच्चभ्रू लोकांची वस्तू फारशी कुणाला माहीत नव्हती.. आणि शबनम बॅकपॅकेसारखी पाठीवर टाकता यायची. थोडं खाणं बरोबर घेतलं होतं.. पुरी भाजी, शिरा असलं काही तरी.. कामशेतला चहा/बिड्या प्यायला थांबलो तेव्हाच ते संपलं.
नेहमी होणार्या अपघातांमुळे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बर्यापैकी कुप्रसिद्ध होता. सतत येणार्या जाणार्या ट्रक आणि गाड्यांमुळे सायकली पॅरलल चालवणं म्हणजे गंगेच पाणी वर्तमानपत्राने अडवायला गेल्यासारखं झालं असतं. सायकली एका पाठोपाठ एक अशाच चालवत होतो तरीही मागून येणार्या गाड्यांना त्यांचा त्रास व्हायचाच.. समोरून गाडी येत असेल तर जास्तच. कित्येक वेळा ट्रकवाले आम्हाला ओव्हरटेक केल्यावर मुद्दाम आमच्या जवळून आत येऊन रस्त्यावरून खाली उतरवून द्यायचे.. बाजुच्या जमिनीपासून रस्ता एक दीड इंच उंच असल्यामुळे सायकल डांबरी भागावर ठेवायची कसरत केल्यास कपाळमोक्ष होण्याची शक्यताच जास्त होती. तीच कथा सायकल परत डांबरी रस्त्यावर घेताना! त्यामुळे ट्रकने झाँसा दिला रे दिला की लगोलग त्याच्या ड्रायव्हर/क्लीनरचा मुक्तपणे कुळोद्धार व्हायचा.
मक्याच्या सायकलचा फक्त मागचा ब्रेक लागायचा.. पुढचा ब्रेक अस्तित्वात नव्हता.. फक्त हँडल जवळची दांडी होती.. मक्या ती गोल गोल फिरवत उगाचच एखाद्याला ओव्हरटेक करायचा आणि वर 'टॉप गिअर टाकलाय रे' म्हणून खिजवायचा. मग दुसरा खुन्नसने त्याला ओव्हरटेक करायचा. पण कामशेत नंतर मक्याची सायकल पंक्चर झाली आणि त्याच्या चेहर्यातली हवा गेली. परत कामशेतला मागे जाण्याचं धैर्य कुणात नब्हतं. मग एकाने मक्याला डबलसीट घेतलं आणि दुसर्याने त्याची सायकल डबल कॅरी केली. ते दमले की दुसर्या दोन जणांची पाळी! मधे मधे ट्रकवाले नको इतकी जवळीक दाखवत होतेच. असं करत करत वरात पार लोणावळ्या पर्यंत आल्यावर एक सायकलचं दुकान दिसलं आणि आम्ही कपडे न काढता 'युरेका! युरेका' म्हणून ओरडलो. सायकलवाल्यानं मख्खपणे टायर ट्यूबचा राडा झाल्याचं सांगीतलं. दोन्ही नवीन टाकून मग खंडाळा गाठे पर्यंत बारा साडे-बारा झाले आणि कुणाला तरी बिअर बार दिसला.. भूकही लागली होतीच.. एकेक बिअर आणि जेवण रिचवून दीड दोनच्या सुमारास गाडी उताराला लागली.
घाटातून अशक्य बुंगाट वेगाने सायकली सुटल्या.. ते इवलेसे ब्रेक वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अपुरे पडत होते.. आमच्या हातात फार काही नव्हतं, आम्ही उतारपतित होतो.. एखाद्या ब्लॅकहोलच्या तळाकडे जसे काही प्रचंड वेगाने खेचले जात होतो.. मधे येणार्या सगळ्या गाड्यांना कधी डावी तर कधी उजवी घालत आमच्या सायकली एखाद्या उल्के सारख्या खोपोलीत येऊन धडकल्या. हा रोलरकोस्टरचा पहीला वहीला अनुभव! सायकली थांबवून ब्रेक बघायला गेलो तर रबर जळल्याचा वास आला.. ते चांगले चटका बसण्या इतके गरम लागत होते आणि त्यावरचं रबर वितळलं होतं. मक्या त्या भीषण उतारावरून एकाच ब्रेकवर कसा उतरला त्याचं त्याला माहिती.. फक्त उतरताना तो येडा टॉप गिअर टाकत ट्रकांना ओव्हरटेक करीत होता.
ब्रेकांच डॅमेज विशेष नाहीये हे पाहील्यावर आगेकूच सुरू झाली.. खोपोली मागे पडलं आणि टँशsss!.. या वेळेला दिल्याच्या चाकाने राम म्हंटलं. पण आता आम्ही अनुभवी होतो. परत डबल कॅरी डबल सीट करत करत संध्याकाळच्या सुमारास पनवेल गाठलं. तिथे टायर ट्यूब बदले पर्यंत सगळ्यांच्या चहा बिड्या मारून झाल्या. पनवेल सोडून खाडी पुलाचा रस्ता शोधेपर्यंत चक्क अंधार पडला. बॅटरी आणण्याची अक्कल कुणीच दाखवली नव्हती आणि आता अकलेचा प्रकाश पाडण्याला पर्याय नव्हता. रस्ता नवीन असल्यामुळे आणि पूर्ण तयार झाला नसल्यामुळे तिकडे फारशी वर्दळ नव्हती, शिवाय कडेला बर्यापैकी खड्डे होते. मागून गाडी आली तर तिच्या प्रकाशात थोडा रस्ता तरी दिसायचा पण पुढून आली तर सायकलवर आंधळी कोशिंबीर खेळायला लागायचं.
थोड्या वेळाने पूर्ण चंद्र आला आणि त्यातल्या त्यात थोडं दिसायला लागलं. अजूनही आम्ही एका मागून एक असेच चाललो होतो. पुढच्याच्या मागून बिनबोभाट जायचं हा नियम असल्यामुळे पुढचा खड्ड्यातून गेला की मागून आणखी ४ जण त्याच खड्ड्यातून तसेच यंत्रवत जायचे. सगळ्यात पुढे सतीश अभिनव पद्धतीने सायकल हाणत होता.. हाताची दोन्ही कोपरं हँडलवर ठेवली होती आणि हनुवटीला तळव्यांचा आधार दिला होता.. सर्किटपणाचा कळस नुसता!.. केवळ हँडल हाताने धरायचा कंटाळा आला म्हणून! लवकरच, एका मोठ्याशा खड्ड्याने जादू दाखवली आणि सतीशचा एक दात भूमिगत झाला.
इतका वेळ चाललेलं सायकलिंग आता आपले रंग दाखवायला लागलं होतं. कधी एकदाचे पोचतोय असं झालं होतं. शरीरातला घाम संपत आला होता. अंगावर धुळीची असंख्य पुटं चढली होती. आमच्या पायांना सतत पेडल मारायची सवय झाली होती. चालताना विचित्र वाटायचं कारण पेडल मारल्यासारखी पावलं पडायची. तहान कायम लागलेली असायची आणि पाण्याची बाटली कुणाकडेही नव्हती.
आणि, एकदाचा तो खाडी पुलाचा टोल बूथ आला. बूथवरच्या माणसाकडे 'सायकलला किती टोल?' अशी पृच्छा करताच त्यानं स्वतःला चिमटा काढून तो झोपेत नसल्याची खात्री केली नि टोलच्या रेट कार्डावर नजर फिरवली. या पुलावरून कधी कुणी सायकलवाला जाईल अशी अपेक्षा सरकारला नसावी कारण सायकलचा रेट नव्हता. 'कुठून आलात?' त्यानं आम्हाला जाता जाता विचारलं. 'पुण्याहून' हे उत्तर ऐकताच तो स्वप्नात असल्याबद्दल त्याची खात्रीच झाली असणार.
पुलावर दिवे होते पण ते खाडी दाखवायला असमर्थ होते. लांबलचक पूल पार करून चेंबुरात शिरलो. उल्हासचं लहानपण दादर मधे गेलेलं होतं. त्यामुळे चेंबूर पुढे कसं जायचं हे उल्हासला माहीती असेल या समजुतीला धक्का बसला. एका दुकानात विचारून प्रवास सुरू झाला. दिव्यांचा लखलखाट, खूप गाड्या/बसेस आणि मोठे रस्ते पाहून 'आता पोचलोच की आपण' याचा आनंद झाला होता. त्यात, बाजुनी जाणार्या बस मधल्या प्रवाशांनी ओरडून आणि हात हलवून चिअरिंग सुरू केल्यावर आमचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. सगळे हिरीरीने सायकल मारायला लागले.. मक्याच्या गिअर टाकण्याला ऊत आला. प्रचंड चिअरिंग चाललय आणि आम्ही एखादी मोठी रेस जिंकत असल्यासारखे सायकली हाणतोय हे दृश्य आजही मनात ताजं आहे. सायकल नामक यंत्र त्यांनी कधी पाहिलं नव्हतं की काय कुणास ठाऊक. माझं इतकं चांगलं स्वागत मुंबईच्या लोकांनी त्या नंतर कधीही केलं नाही.
उल्हासचं अजूनही मधेच उतरून रस्ते विचारणं चालू होतं आणि आमचं चिडवणं पण! 'इतकी वर्ष मुंबईत शिकायला ठेवलं पण साधे रस्ते पण माहीत नाहीत तुला?' असली हेटाळणी एकीकडे चालू होती. पण दुसरीकडे 'आयला, अजून किती जायचय?' हा विचार पिंगा घालायला लागला होता. उल्हास सोडता आमच्या पैकी कुणालाच मुंबईच्या आकाराची कल्पना नव्हती हे खरं! शेवटी उल्ह्याला ओळखीची खूण दिसली एकदाची आणि आम्ही थोड्याच वेळात त्याच्या बहिणीच्या दारात उभे राहीलो. रात्रीचे सुमारे साडे-नऊ दहा झाले होते.
घरात अंधार दिसत होता. झोपले की काय सगळे? बेल दाबल्यावर कुणीच दार उघडलं नाही. परत एकदा बेल दाबून घरात कुणी नाही याची खात्री केली. उल्ह्याने शेजारच्या घरात चौकशी केल्यावर बहीण आणि तिचा नवरा सिनेमाला गेल्याचं कळलं. किल्ली त्यांच्याकडे नव्हती. परत एकदा उल्ह्याला 'फोन करून का नाही सांगीतलस?' म्हणून भोसडण्यात आलं. पण ते येई पर्यंत काय करायचं? मग उल्ह्यानंच दादर चौपाटीवर टीपी करायची आयडिया टाकली. सायकली तिथेच ठेवून पेडल मारत मारत चौपाटीवर आलो. मस्त गार वारं वहात होतं, आकाशात चंद्र तारे शायनिंग करत होते, लाटांनी खर्ज लावला होता आणि आम्ही प्रवासाच्या आठवणीत दंग झालो.
कुणीतरी कशाने तरी मला ढोसत होतं.. 'कॉलेजला जायचं नाहीये, आई!'.. मी बरळलो.. तरी ढोसणं चालूच होतं.. काय त्रास आहे च्यायला!.. वैतागून डोळे किलकिले करून पाहीलं तर एक पोलीस लाठीने ढोसत होता.. आयला पोलीस घरी येऊन का ढोसतोय? पूर्ण जाग आल्यावर आम्ही चौपाटीवर असल्याचा साक्षात्कार झाला.. रात्री १० नंतर चौपाटीवर बसायची परवानगी नसते, कोजागिरी आहे म्हणून आज १२ पर्यंत होती.. तो पोलीस सांगत होता.. अरेच्च्या! म्हणजे आज कोजागिरी होती? किती वाजले होते कुणास ठाऊक!.. आमच्या पैकी फक्त उल्ह्याकडे घड्याळ होतं. रात्रीचा १ वाजला होता. अर्धवट झोपेत पेडल मारत घरी गेलो.. नशीबानं बहीण आलेली होती. तिला अर्थातच आम्ही येणार असल्याची काहीच कल्पना नव्हती. जुजबी ओळख परेड होताच क्षणाचाही विलंब न लावता सगळे मेल्यासारखे झोपले.
सकाळी उशीराच जाग आली तेव्हा घरी फक्त बहीण होती, नवरा कामावर गेला होता. पाय आहेत की नाहीत याचा नक्की अंदाज येत नव्हता. काबाडकष्ट करून सकाळचे कार्यक्रम उरकले नि बिड्या फुकायला बाहेर पडलो. 'आपण घरी फोन करायला पाहीजे'.. कुणाला तरी अचानकपणे समंजसपणाची भरती आली. फोन फक्त माझ्या आणि मक्याच्या घरीच होता. घरच्यांना इतर घरी सांगायला पाठवायचं ठरवलं. उल्ह्याच्या घरी माहितीच होतं. बाबा घरी असण्याची शक्यता नसल्यामुळे हीच वेळ फोन करायला योग्य होती. पब्लिक फोनवरून फोन लावल्यावर अपेक्षेप्रमाणे आईने उचलला.
'आई! मी आज घरी येत नाहीये'
'बरं! का रे पण? अजून एक दिवस शेतावर घालवणार आहात का?'
'अं अं अं हो! नाही! मी शेतावर नाहीये'
'आँ? शेतावर नाहीयेस? मग कुठे आहेस तू?'.. आवाजातून रागाची छटा जाणवायला लागली होती.. पण खरं काय ते सांगणं भाग होतं.
'मुंबईत!'.. त्यानंतर तिकडे काय घडलं ते माहीत नाही.. सिनेमात जसं हातातून ट्रे पडून सगळ्या कपबशा खळकन फुटताना दाखवतात तसं काहीसं झालं असावं! नंतर मक्याच्या घरच्याही फुटल्या. बहुधा, नजिकच्या भविष्य काळात आमची टाळकी फुटण्याची ती नांदी असावी.
रात्री पायांना चांगलं तेल रगडून झोपलो.. दुसरे दिवशी परतीचा प्रवास सुरू केला. पाय दुखत असल्यामुळे प्रवास निवांतपणे रमत गमत चालला होता. घाट लागल्यावर मात्र बोंबाबोंब झाली. पेडलवर पूर्ण उभं राहीलं तरीही चाक एक मिलीमीटर पण पुढे जात नव्हतं.. असला भयानक चढ! कात्रजपेक्षाही भीषण! सायकलवर कात्रजचा चढ पुण्याच्या बाजूने देखील व्यवस्थित चढता येतो. मात्र खंडाळ्याच्या घाटाने पार वाट लावली.. ट्रकच्या साखळ्या धरून जायचा प्रयत्न केला जरा.. पण डावीकडे खोल दरी, उजवीकडे रँव रँवणारा ट्रक आणि मधे सायकल जेमतेम मावेल अशी रस्त्याची चिंचोळी पट्टी हे दृश्य एक दोनदा अनुभवल्यावर सगळा माज उतरला. सगळे हातात सायकल धरून मुकाटपणे चालायला लागले. बराच वेळ चालल्यावर शेवटी खंडाळा आलं. यापुढील प्रवास वेगाने होतो कारण खंडाळ्यापासून थेट पुण्यापर्यंत सतत थोडा थोडा उतार आहे. त्यामुळे परतीचा वेग आपोआपच वाढून तासाला सुमारे २०/२१ किमी पडतो.
रात्री ९ वाजता घरी ठेपलो. भीत भीत घरात पाऊल ठेवलं. 'पायात गोळे बिळे नाही आले का रे?'.. घरच्यांनी विशेषतः बाबांनी प्रेमाने चौकशी केल्यावर सगळं टेन्शन गेलं. 'तेल लावून चोळ पाय चांगले'.. 'गरम पाण्यात पाय बुडवून ठेव'.. मधेच एक प्रेमळ दटावणी आली.. 'अरे पण सांगून गेला असतास तर आम्ही काही नाही म्हंटलं नसतं!'.. त्यात काही तथ्य नव्हतं हे आम्हा दोघांनाही चांगलं माहीत होतं. दुतर्फा प्रेम ओसंडत असताना बाबांनी एकदम 'कुठली पुस्तकं घेतलीस ती दाखव बघू!' म्हणून ६.३ रिश्टर स्केलचा धक्का दिला आणि माझा चेहरा सूळी जाणार्या माणसासारखा झाला.
'तुला काय वाटतंय चिमण?' माझा हरवलेला चेहरा पाहून ऑफिसातला सहकारी पुसता झाला आणि मी भानावर आलो.
'अं अं, वि वेअर लकी'.. आता भंजाळायची पाळी त्याची होती.
तळटीपः
या सायकलवारीच्या उत्तुंग यशामुळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकला जायचं ठरवलं. तो सायकल प्रवास थोडक्यात पुढे देतोय...
या खेपेला एकही बंडल मारली नाही. कारण, आपला पोरगा काही तरी करू शकतो असा विश्वास कधी नव्हे ते घरच्यांना वाटत असेल असा विश्वास आम्हाला वाटला. परीक्षेचा रिझल्ट लागलेला नव्हता म्हणूनच परवानगी मिळाली. मक्या, मी आणि दिल्या असे तिघेच तयार झाले. पहाटे निघालो. त्या दिवशी मला थोडं बरं वाटत नव्हतं, तोंड पण आलेलं होतं. तरीही निघालो. मागच्या वारी पासून म्हणावा असा काही बोध घेतला नव्हता. म्हणजे बॅटरी किंवा पाण्याची बाटली असं काहीही या ही वेळेला बरोबर नव्हतं. सतत डावीकडून उजवीकडे आडवा वारा वहात असल्यामुळे सायकल रस्त्यामधे ढकलली जात होती. सायकल चालवणं अवघड जात होतं. तिच्या मुसक्या बांधून परत परत तिला कडेला आणावं लागत होतं.
चार साडे-चार तास सायकल मारल्यावर मंचर आलं. तिथल्या एस.टी. स्टँडवरच्या कँटीनमधे एक थेंब चाखला तरी १००० व्होल्टचा दणका देणारं पाव-शॅंपल ऑर्डर केलं. मला ते खाणं शक्यच नव्हतं.. इथेच माझा धीर खचला. मी कुठेही काहीही खाऊ शकेन असं वाटत नव्हतं. मी फक्त चहा बिडी मारली आणि परतीचा निर्णय घेतला. मक्या आणि दिल्यानं पुढे जायचं ठरवलं. मी एकटा नंतरचे चार तास सायकल मारत घरी परतलो. ते दोघे त्या दिवशी नाशिकला पोचू शकले नाहीत हे नंतर कळालं. वाटेत एका गावातल्या देवळात रात्रीचे झोपले आणि दुसरे दिवशी पोचले. येताना सायकली बसवर टाकून आले.
====== समाप्त======
[टीप :- आता फ्लॅशबॅक चालू होणार आहे. तरी प्रत्येकांने इथे आपल्या आवडी प्रमाणे आपल्याला हवा तसा फ्लॅशबॅक मारून घ्यावा. तुम्हाला काही सुचत नसल्यास पुढील मान्य फ्लॅशबॅक पद्धतीतून निवड करा .. चालू सीन पाण्यावर डचमळून डचमळून एकदम भूतकाळातल्या सीनला खो देण्याची एक पद्धत. दुसरी, भूतकाळातला सीन सरळ ब्लॅक अँड व्हाईट मधे सुरू करण्याची. वाचकांना अशी कस्टमायझेशनची सोय देऊन त्यांना लेखात प्रत्यक्ष सहभागी करून घेणारा हा पहीलाच लेख असावा बहुधा!]
आम्ही नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर चकाट्या पिटत बसलो होतो. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी जाम बोअर होत होतं.. कशातच मजा राहिली नव्हती.. लेक्चरना दांड्या मारून पिक्चरला जाणे.. दुसर्या कॉलेजच्या लेक्चरांना बसणे.. कॉलेजला सरळ यायच्या ऐवजी व्हाया गुत्ता येणे.. सगळ्या सगळ्याचा घनघोर कंटाळा आलेला होता.. अगदी, सुंदर मुलगी दिसल्यावर केसांची झुलपं ठीक करायला देखील हात उठत नव्हता.
आणि, अचानक, कसलीही पूर्वकल्पना न देता मक्यानं 'आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं का?' असा बाँब टाकला. बाँब नाहीतर काय? कारण, आमच्या पॉकेटमनीच्या पैशात आम्ही फार फार तर हडपसर पर्यंत जाऊन आलो असतो. त्या काळी आमचा पॉकेटमनी आठवड्याला तीन किंवा चार रुपये इतका घसघशीत असायचा. 'लागतोय कशाला पॉकेटमनी?' हा समस्त आईबापांचा युक्तिवाद! 'बाहेरचं खायला? शीss! कळकट्टं हॉटेलातलं ते त्याच त्याच तेलात तळलेलं खाणं? छे! त्यापेक्षा पोराने डबा घेऊन जावा!'. तेव्हा चहा फक्त १५ पैशाला मिळायचा हो, पण आम्हाला बिड्या प्यायलाही पैसे लागायचे.. अर्थात, ते कळालं असतं तर मी कुठल्या तरी गॅरेजवर गाड्या पुसत बसलो असतो.
या पार्श्वभूमिवर, ट्रेनच्या तिकीटाचे आणि मुंबईत हिंडण्याफिरण्याचे पैसे घरी मागितले असते तर पैसे सोडाच वर हक्काचा पॉकेटमनी पण बंद झाला असता.. शिवाय, कुचकटपणे 'हॅ! मुंबईत काय जायचंय? पाहिली नाही का कधी आपण? त्यापेक्षा अभ्यास करा जरा! मागच्या परीक्षेत किती मार्क पडलेत ते माहिती आहे ना?' असली मुक्ताफळं ऐकायला मिळाली असती. 'परीक्षेतले मार्क' हे समस्त आईबापांच सुदर्शन चक्र! त्यांनी ते तोंडातून भिरकावलं की सपशेल शरणागती पत्करल्या शिवाय गत्यंतर नसायचं.
तरीही गंमत म्हणून आमचे खर्चाचे हिशेब सुरू झाल्यावर मक्याने खरा बाँब टाकला.. याच्या मानाने मागचा लवंगी बाँब होता.. 'अरे गाढवान्नो! ट्रेनने नाही, सायकलने जायचंय'. सायकलने मुंबई? माणसानं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवण्या इतकीच ही आयडिया जगावेगळी होती. इथे जवळपास जायला सायकल ठीक आहे, पण मुंबई? जरा विचार केल्यावर ती कल्पना थ्रिलिंग वाटली मात्र!
बाकी मक्याच्या कल्पना नेहमी चित्तथरारक आणि उत्स्फुर्त असायच्या. त्याच्यामुळे पुण्याच्या आसपासच्या गावांना आमच्या सायकलवार्या झाल्या होत्या. लोणावळ्याला तर तीन चार वेळा जाणं झालं होतं. एकदा तर संध्याकाळी ६ वाजता आम्ही अचानक निघालो आणि शिवापूरला सायकलवर जाऊन रात्री ११ वाजता परत आलो होतो. पण सायकलने मुंबईला एका दिवसात काही जाऊन येणं शक्य नव्हतं, शिवाय पैसे पण लागले असतेच. मग घरी काय बंडला मारायच्या? मुंबईत कुठं रहायचं? पैसे कसे जमवायचे? कोण कोण येणार? असल्या अनंत प्रश्नांचा उहापोह सुरू झाला.
हो नाही करता करता ५ जण तयार झाले. मी, दिल्या, मक्या, उल्हास आणि सतीश. जायला किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. लोणावळ्याला जायला चार साडे चार तास लागायचे इतकाच अनुभव होता. शांतपणे सायकल चालविली तर वेग तासाला सुमारे १५/१६ किमी पडतो. त्यावेळी पनवेल ते चेंबूर खाडी पुला वरून जाणारा रस्ता नुकताच तयार झाला होता. त्या पुलाचं उदघाटन नेहमी प्रमाणे रखडलेलं होतं पण वाहनांची ये जा सुरू झाली आहे असं ऐकून होतो. तसंच त्या पुलावरून जायला टोल भरावा लागतो हे समजलं होतं आणि सायकलला किती टोल पडेल त्याची माहिती कुणालाच नव्हती. एक दिवस जायला, एक यायला आणि एक दिवस तिथे रहायला असा ३ दिवसांचा प्लॅन झाला. उल्हासची बहीण दादरला रहायची तिच्याकडे रहायचं ठरलं.
मुंबईला सायकलने सोडाच पण ट्रेनने जायला सुद्धा घरून परवानगी मिळाली नसती म्हणून घरी 'सिंहगडावर जाणार आहोत.. तिथे एका मित्राच्या शेतावर रात्री राहून दुसरे दिवशी परत येऊ' अशी बंडल ठोकली. फक्त उल्हासच्या घरी आम्ही मुंबईला जाणार आहोत हे माहीत होतं. पैशासाठी वेगवेगळ्या पुड्या सोडल्या! मला पुस्तकं घ्यावी लागणार होती, मक्याला केमिस्ट्री प्रॅक्टिकल करण्यासाठी डिपॉझिट भरावं लागणार होतं, दिल्याला कॉलेजच्या एका कार्यक्रमाची वर्गणी भरायला लागणार होती. सावधगिरी म्हणून प्रत्येकानं इतरांनी घरी काय बंडला मारल्या आहेत ते लक्षात ठेवलं होतं!
ठरल्या दिवशी पहाटे ६ ला निघालो. एकाच दिवसाचे कपडे घेऊ शकत असल्यामुळे प्रत्येकाच्या खांद्याला एकच शबनम पिशवी होती! त्याकाळात शबनम पिशवीची क्रेझ होती.. बॅकपॅक सारखी उच्चभ्रू लोकांची वस्तू फारशी कुणाला माहीत नव्हती.. आणि शबनम बॅकपॅकेसारखी पाठीवर टाकता यायची. थोडं खाणं बरोबर घेतलं होतं.. पुरी भाजी, शिरा असलं काही तरी.. कामशेतला चहा/बिड्या प्यायला थांबलो तेव्हाच ते संपलं.
नेहमी होणार्या अपघातांमुळे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बर्यापैकी कुप्रसिद्ध होता. सतत येणार्या जाणार्या ट्रक आणि गाड्यांमुळे सायकली पॅरलल चालवणं म्हणजे गंगेच पाणी वर्तमानपत्राने अडवायला गेल्यासारखं झालं असतं. सायकली एका पाठोपाठ एक अशाच चालवत होतो तरीही मागून येणार्या गाड्यांना त्यांचा त्रास व्हायचाच.. समोरून गाडी येत असेल तर जास्तच. कित्येक वेळा ट्रकवाले आम्हाला ओव्हरटेक केल्यावर मुद्दाम आमच्या जवळून आत येऊन रस्त्यावरून खाली उतरवून द्यायचे.. बाजुच्या जमिनीपासून रस्ता एक दीड इंच उंच असल्यामुळे सायकल डांबरी भागावर ठेवायची कसरत केल्यास कपाळमोक्ष होण्याची शक्यताच जास्त होती. तीच कथा सायकल परत डांबरी रस्त्यावर घेताना! त्यामुळे ट्रकने झाँसा दिला रे दिला की लगोलग त्याच्या ड्रायव्हर/क्लीनरचा मुक्तपणे कुळोद्धार व्हायचा.
मक्याच्या सायकलचा फक्त मागचा ब्रेक लागायचा.. पुढचा ब्रेक अस्तित्वात नव्हता.. फक्त हँडल जवळची दांडी होती.. मक्या ती गोल गोल फिरवत उगाचच एखाद्याला ओव्हरटेक करायचा आणि वर 'टॉप गिअर टाकलाय रे' म्हणून खिजवायचा. मग दुसरा खुन्नसने त्याला ओव्हरटेक करायचा. पण कामशेत नंतर मक्याची सायकल पंक्चर झाली आणि त्याच्या चेहर्यातली हवा गेली. परत कामशेतला मागे जाण्याचं धैर्य कुणात नब्हतं. मग एकाने मक्याला डबलसीट घेतलं आणि दुसर्याने त्याची सायकल डबल कॅरी केली. ते दमले की दुसर्या दोन जणांची पाळी! मधे मधे ट्रकवाले नको इतकी जवळीक दाखवत होतेच. असं करत करत वरात पार लोणावळ्या पर्यंत आल्यावर एक सायकलचं दुकान दिसलं आणि आम्ही कपडे न काढता 'युरेका! युरेका' म्हणून ओरडलो. सायकलवाल्यानं मख्खपणे टायर ट्यूबचा राडा झाल्याचं सांगीतलं. दोन्ही नवीन टाकून मग खंडाळा गाठे पर्यंत बारा साडे-बारा झाले आणि कुणाला तरी बिअर बार दिसला.. भूकही लागली होतीच.. एकेक बिअर आणि जेवण रिचवून दीड दोनच्या सुमारास गाडी उताराला लागली.
घाटातून अशक्य बुंगाट वेगाने सायकली सुटल्या.. ते इवलेसे ब्रेक वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अपुरे पडत होते.. आमच्या हातात फार काही नव्हतं, आम्ही उतारपतित होतो.. एखाद्या ब्लॅकहोलच्या तळाकडे जसे काही प्रचंड वेगाने खेचले जात होतो.. मधे येणार्या सगळ्या गाड्यांना कधी डावी तर कधी उजवी घालत आमच्या सायकली एखाद्या उल्के सारख्या खोपोलीत येऊन धडकल्या. हा रोलरकोस्टरचा पहीला वहीला अनुभव! सायकली थांबवून ब्रेक बघायला गेलो तर रबर जळल्याचा वास आला.. ते चांगले चटका बसण्या इतके गरम लागत होते आणि त्यावरचं रबर वितळलं होतं. मक्या त्या भीषण उतारावरून एकाच ब्रेकवर कसा उतरला त्याचं त्याला माहिती.. फक्त उतरताना तो येडा टॉप गिअर टाकत ट्रकांना ओव्हरटेक करीत होता.
ब्रेकांच डॅमेज विशेष नाहीये हे पाहील्यावर आगेकूच सुरू झाली.. खोपोली मागे पडलं आणि टँशsss!.. या वेळेला दिल्याच्या चाकाने राम म्हंटलं. पण आता आम्ही अनुभवी होतो. परत डबल कॅरी डबल सीट करत करत संध्याकाळच्या सुमारास पनवेल गाठलं. तिथे टायर ट्यूब बदले पर्यंत सगळ्यांच्या चहा बिड्या मारून झाल्या. पनवेल सोडून खाडी पुलाचा रस्ता शोधेपर्यंत चक्क अंधार पडला. बॅटरी आणण्याची अक्कल कुणीच दाखवली नव्हती आणि आता अकलेचा प्रकाश पाडण्याला पर्याय नव्हता. रस्ता नवीन असल्यामुळे आणि पूर्ण तयार झाला नसल्यामुळे तिकडे फारशी वर्दळ नव्हती, शिवाय कडेला बर्यापैकी खड्डे होते. मागून गाडी आली तर तिच्या प्रकाशात थोडा रस्ता तरी दिसायचा पण पुढून आली तर सायकलवर आंधळी कोशिंबीर खेळायला लागायचं.
थोड्या वेळाने पूर्ण चंद्र आला आणि त्यातल्या त्यात थोडं दिसायला लागलं. अजूनही आम्ही एका मागून एक असेच चाललो होतो. पुढच्याच्या मागून बिनबोभाट जायचं हा नियम असल्यामुळे पुढचा खड्ड्यातून गेला की मागून आणखी ४ जण त्याच खड्ड्यातून तसेच यंत्रवत जायचे. सगळ्यात पुढे सतीश अभिनव पद्धतीने सायकल हाणत होता.. हाताची दोन्ही कोपरं हँडलवर ठेवली होती आणि हनुवटीला तळव्यांचा आधार दिला होता.. सर्किटपणाचा कळस नुसता!.. केवळ हँडल हाताने धरायचा कंटाळा आला म्हणून! लवकरच, एका मोठ्याशा खड्ड्याने जादू दाखवली आणि सतीशचा एक दात भूमिगत झाला.
इतका वेळ चाललेलं सायकलिंग आता आपले रंग दाखवायला लागलं होतं. कधी एकदाचे पोचतोय असं झालं होतं. शरीरातला घाम संपत आला होता. अंगावर धुळीची असंख्य पुटं चढली होती. आमच्या पायांना सतत पेडल मारायची सवय झाली होती. चालताना विचित्र वाटायचं कारण पेडल मारल्यासारखी पावलं पडायची. तहान कायम लागलेली असायची आणि पाण्याची बाटली कुणाकडेही नव्हती.
आणि, एकदाचा तो खाडी पुलाचा टोल बूथ आला. बूथवरच्या माणसाकडे 'सायकलला किती टोल?' अशी पृच्छा करताच त्यानं स्वतःला चिमटा काढून तो झोपेत नसल्याची खात्री केली नि टोलच्या रेट कार्डावर नजर फिरवली. या पुलावरून कधी कुणी सायकलवाला जाईल अशी अपेक्षा सरकारला नसावी कारण सायकलचा रेट नव्हता. 'कुठून आलात?' त्यानं आम्हाला जाता जाता विचारलं. 'पुण्याहून' हे उत्तर ऐकताच तो स्वप्नात असल्याबद्दल त्याची खात्रीच झाली असणार.
पुलावर दिवे होते पण ते खाडी दाखवायला असमर्थ होते. लांबलचक पूल पार करून चेंबुरात शिरलो. उल्हासचं लहानपण दादर मधे गेलेलं होतं. त्यामुळे चेंबूर पुढे कसं जायचं हे उल्हासला माहीती असेल या समजुतीला धक्का बसला. एका दुकानात विचारून प्रवास सुरू झाला. दिव्यांचा लखलखाट, खूप गाड्या/बसेस आणि मोठे रस्ते पाहून 'आता पोचलोच की आपण' याचा आनंद झाला होता. त्यात, बाजुनी जाणार्या बस मधल्या प्रवाशांनी ओरडून आणि हात हलवून चिअरिंग सुरू केल्यावर आमचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. सगळे हिरीरीने सायकल मारायला लागले.. मक्याच्या गिअर टाकण्याला ऊत आला. प्रचंड चिअरिंग चाललय आणि आम्ही एखादी मोठी रेस जिंकत असल्यासारखे सायकली हाणतोय हे दृश्य आजही मनात ताजं आहे. सायकल नामक यंत्र त्यांनी कधी पाहिलं नव्हतं की काय कुणास ठाऊक. माझं इतकं चांगलं स्वागत मुंबईच्या लोकांनी त्या नंतर कधीही केलं नाही.
उल्हासचं अजूनही मधेच उतरून रस्ते विचारणं चालू होतं आणि आमचं चिडवणं पण! 'इतकी वर्ष मुंबईत शिकायला ठेवलं पण साधे रस्ते पण माहीत नाहीत तुला?' असली हेटाळणी एकीकडे चालू होती. पण दुसरीकडे 'आयला, अजून किती जायचय?' हा विचार पिंगा घालायला लागला होता. उल्हास सोडता आमच्या पैकी कुणालाच मुंबईच्या आकाराची कल्पना नव्हती हे खरं! शेवटी उल्ह्याला ओळखीची खूण दिसली एकदाची आणि आम्ही थोड्याच वेळात त्याच्या बहिणीच्या दारात उभे राहीलो. रात्रीचे सुमारे साडे-नऊ दहा झाले होते.
घरात अंधार दिसत होता. झोपले की काय सगळे? बेल दाबल्यावर कुणीच दार उघडलं नाही. परत एकदा बेल दाबून घरात कुणी नाही याची खात्री केली. उल्ह्याने शेजारच्या घरात चौकशी केल्यावर बहीण आणि तिचा नवरा सिनेमाला गेल्याचं कळलं. किल्ली त्यांच्याकडे नव्हती. परत एकदा उल्ह्याला 'फोन करून का नाही सांगीतलस?' म्हणून भोसडण्यात आलं. पण ते येई पर्यंत काय करायचं? मग उल्ह्यानंच दादर चौपाटीवर टीपी करायची आयडिया टाकली. सायकली तिथेच ठेवून पेडल मारत मारत चौपाटीवर आलो. मस्त गार वारं वहात होतं, आकाशात चंद्र तारे शायनिंग करत होते, लाटांनी खर्ज लावला होता आणि आम्ही प्रवासाच्या आठवणीत दंग झालो.
कुणीतरी कशाने तरी मला ढोसत होतं.. 'कॉलेजला जायचं नाहीये, आई!'.. मी बरळलो.. तरी ढोसणं चालूच होतं.. काय त्रास आहे च्यायला!.. वैतागून डोळे किलकिले करून पाहीलं तर एक पोलीस लाठीने ढोसत होता.. आयला पोलीस घरी येऊन का ढोसतोय? पूर्ण जाग आल्यावर आम्ही चौपाटीवर असल्याचा साक्षात्कार झाला.. रात्री १० नंतर चौपाटीवर बसायची परवानगी नसते, कोजागिरी आहे म्हणून आज १२ पर्यंत होती.. तो पोलीस सांगत होता.. अरेच्च्या! म्हणजे आज कोजागिरी होती? किती वाजले होते कुणास ठाऊक!.. आमच्या पैकी फक्त उल्ह्याकडे घड्याळ होतं. रात्रीचा १ वाजला होता. अर्धवट झोपेत पेडल मारत घरी गेलो.. नशीबानं बहीण आलेली होती. तिला अर्थातच आम्ही येणार असल्याची काहीच कल्पना नव्हती. जुजबी ओळख परेड होताच क्षणाचाही विलंब न लावता सगळे मेल्यासारखे झोपले.
सकाळी उशीराच जाग आली तेव्हा घरी फक्त बहीण होती, नवरा कामावर गेला होता. पाय आहेत की नाहीत याचा नक्की अंदाज येत नव्हता. काबाडकष्ट करून सकाळचे कार्यक्रम उरकले नि बिड्या फुकायला बाहेर पडलो. 'आपण घरी फोन करायला पाहीजे'.. कुणाला तरी अचानकपणे समंजसपणाची भरती आली. फोन फक्त माझ्या आणि मक्याच्या घरीच होता. घरच्यांना इतर घरी सांगायला पाठवायचं ठरवलं. उल्ह्याच्या घरी माहितीच होतं. बाबा घरी असण्याची शक्यता नसल्यामुळे हीच वेळ फोन करायला योग्य होती. पब्लिक फोनवरून फोन लावल्यावर अपेक्षेप्रमाणे आईने उचलला.
'आई! मी आज घरी येत नाहीये'
'बरं! का रे पण? अजून एक दिवस शेतावर घालवणार आहात का?'
'अं अं अं हो! नाही! मी शेतावर नाहीये'
'आँ? शेतावर नाहीयेस? मग कुठे आहेस तू?'.. आवाजातून रागाची छटा जाणवायला लागली होती.. पण खरं काय ते सांगणं भाग होतं.
'मुंबईत!'.. त्यानंतर तिकडे काय घडलं ते माहीत नाही.. सिनेमात जसं हातातून ट्रे पडून सगळ्या कपबशा खळकन फुटताना दाखवतात तसं काहीसं झालं असावं! नंतर मक्याच्या घरच्याही फुटल्या. बहुधा, नजिकच्या भविष्य काळात आमची टाळकी फुटण्याची ती नांदी असावी.
रात्री पायांना चांगलं तेल रगडून झोपलो.. दुसरे दिवशी परतीचा प्रवास सुरू केला. पाय दुखत असल्यामुळे प्रवास निवांतपणे रमत गमत चालला होता. घाट लागल्यावर मात्र बोंबाबोंब झाली. पेडलवर पूर्ण उभं राहीलं तरीही चाक एक मिलीमीटर पण पुढे जात नव्हतं.. असला भयानक चढ! कात्रजपेक्षाही भीषण! सायकलवर कात्रजचा चढ पुण्याच्या बाजूने देखील व्यवस्थित चढता येतो. मात्र खंडाळ्याच्या घाटाने पार वाट लावली.. ट्रकच्या साखळ्या धरून जायचा प्रयत्न केला जरा.. पण डावीकडे खोल दरी, उजवीकडे रँव रँवणारा ट्रक आणि मधे सायकल जेमतेम मावेल अशी रस्त्याची चिंचोळी पट्टी हे दृश्य एक दोनदा अनुभवल्यावर सगळा माज उतरला. सगळे हातात सायकल धरून मुकाटपणे चालायला लागले. बराच वेळ चालल्यावर शेवटी खंडाळा आलं. यापुढील प्रवास वेगाने होतो कारण खंडाळ्यापासून थेट पुण्यापर्यंत सतत थोडा थोडा उतार आहे. त्यामुळे परतीचा वेग आपोआपच वाढून तासाला सुमारे २०/२१ किमी पडतो.
रात्री ९ वाजता घरी ठेपलो. भीत भीत घरात पाऊल ठेवलं. 'पायात गोळे बिळे नाही आले का रे?'.. घरच्यांनी विशेषतः बाबांनी प्रेमाने चौकशी केल्यावर सगळं टेन्शन गेलं. 'तेल लावून चोळ पाय चांगले'.. 'गरम पाण्यात पाय बुडवून ठेव'.. मधेच एक प्रेमळ दटावणी आली.. 'अरे पण सांगून गेला असतास तर आम्ही काही नाही म्हंटलं नसतं!'.. त्यात काही तथ्य नव्हतं हे आम्हा दोघांनाही चांगलं माहीत होतं. दुतर्फा प्रेम ओसंडत असताना बाबांनी एकदम 'कुठली पुस्तकं घेतलीस ती दाखव बघू!' म्हणून ६.३ रिश्टर स्केलचा धक्का दिला आणि माझा चेहरा सूळी जाणार्या माणसासारखा झाला.
'तुला काय वाटतंय चिमण?' माझा हरवलेला चेहरा पाहून ऑफिसातला सहकारी पुसता झाला आणि मी भानावर आलो.
'अं अं, वि वेअर लकी'.. आता भंजाळायची पाळी त्याची होती.
तळटीपः
या सायकलवारीच्या उत्तुंग यशामुळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकला जायचं ठरवलं. तो सायकल प्रवास थोडक्यात पुढे देतोय...
या खेपेला एकही बंडल मारली नाही. कारण, आपला पोरगा काही तरी करू शकतो असा विश्वास कधी नव्हे ते घरच्यांना वाटत असेल असा विश्वास आम्हाला वाटला. परीक्षेचा रिझल्ट लागलेला नव्हता म्हणूनच परवानगी मिळाली. मक्या, मी आणि दिल्या असे तिघेच तयार झाले. पहाटे निघालो. त्या दिवशी मला थोडं बरं वाटत नव्हतं, तोंड पण आलेलं होतं. तरीही निघालो. मागच्या वारी पासून म्हणावा असा काही बोध घेतला नव्हता. म्हणजे बॅटरी किंवा पाण्याची बाटली असं काहीही या ही वेळेला बरोबर नव्हतं. सतत डावीकडून उजवीकडे आडवा वारा वहात असल्यामुळे सायकल रस्त्यामधे ढकलली जात होती. सायकल चालवणं अवघड जात होतं. तिच्या मुसक्या बांधून परत परत तिला कडेला आणावं लागत होतं.
चार साडे-चार तास सायकल मारल्यावर मंचर आलं. तिथल्या एस.टी. स्टँडवरच्या कँटीनमधे एक थेंब चाखला तरी १००० व्होल्टचा दणका देणारं पाव-शॅंपल ऑर्डर केलं. मला ते खाणं शक्यच नव्हतं.. इथेच माझा धीर खचला. मी कुठेही काहीही खाऊ शकेन असं वाटत नव्हतं. मी फक्त चहा बिडी मारली आणि परतीचा निर्णय घेतला. मक्या आणि दिल्यानं पुढे जायचं ठरवलं. मी एकटा नंतरचे चार तास सायकल मारत घरी परतलो. ते दोघे त्या दिवशी नाशिकला पोचू शकले नाहीत हे नंतर कळालं. वाटेत एका गावातल्या देवळात रात्रीचे झोपले आणि दुसरे दिवशी पोचले. येताना सायकली बसवर टाकून आले.
====== समाप्त======
Subscribe to:
Posts (Atom)